Monday, October 31, 2011

वारयाची येणारी प्रत्येक झुळूक

तू माझ्याशी कधीच बोलत नाहीस..
माझ्या कविताच तुझ्याशी बोलतात
ओठात अडकलेले शब्द तुझे मग
पापण्या हिसकावून सांगतात....

वारयाची येणारी प्रत्येक झुळूक
तुझ्या सुगंधाने दरवळते
मन माझे मग होई दिवाने
तुझ्या भेटीसाठी आतुरते....

तुझ्या आठवणींच्या सोबतीनेच
माझा काव्य प्रवास सुरु होतो ..
माझ्याही नकळत फक्त तुझ्यासाठी
मी कवितांच्या गावी जातो ...

तू सोबत नसतानाच नेमक्या
तुझ्या आठवणी स्मरू लागतात
होठ मुके मुके होतात
आणि शब्द कविता करू लागतात ...

आयुष्याच्या या वळणावरती मला तुझी साथ मिळेल का
माझ तुझ्या वर प्रेम आहे तुला कधी ते कळेल का??????

आता बंद डोळे तुझे खोल ना.....

इथे कल्पनांचे किती अस्त झाले
युगान्तास मी पाहतो हा आता
तुझ्या भोवती शेष अस्तित्व माझे
आता बंद डोळे तुझे खोल ना......

कधी रंग माझे न तू पहिले ते
जसे पहिले ना स्वतः मी कधी
आता रंग उडतात, गळतात माझे
तुझे सांग जपलेस ना तू तरी??

कसेही असो बोल अथवा नको हि
जिवातून ओळी तरी ऐक ना
तुला साथ देऊन थकल्या जीवाच्या
प्रीत्यर्थ अश्रू तरी ढाळ ना....
आता बंद डोळे तुझे खोल ना......

प्रत्येकाच्या कपाळावर.

प्रत्येकाच्या कपाळावर....
सटवीने सुंदर भाग्य लिहिलेले....
तरी प्रत्येकाने आपल्या कर्माने...
त्याला चूरघळलेले ...

पुन्हा जोडायचे ठरवतोय हृदयाला...

पुन्हा जोडायचे ठरवतोय हृदयाला...
येईल का जोडता पुन्हा...
जगायचे ठरवतोय आता मी..
येईल का ग जगता पुन्हा.. तुझ्याशिवाय...



आता मी माझ्या हृदयाला...
जपतोय माझ्याच हृदयाशी धरून ...
कारण आता ते हि वाहतेय ...
तुझ्या सोबतच्या क्षणांनी भरून....




प्रेम हा शब्दच आहे खूप लोभस
प्रत्येक जन ज्यास भाळतो
नकळतच म त्याच्या प्रेमात
प्रत्येकजण पडतो
म्हणे दिल्याने हे वाढते
आपण मात्र देत जाव
कधीतरी परतफेड म्हणून
आलेलही कवटाळून घ्याव ....

किती सहायचे तडाखे अजून

किती सहायचे तडाखे अजून
आणि कसं ते सांगा
दार उघडल नशीब म्हणून
अजून तटायचं किती सांगा !

रांगाच्या रांगा लागल्यात तिथं
पण कसल्या ते सांगा
राहू का मीही उभा त्यात
पण काय गवसेल सांगा !

चालून चालून चपला तुटल्या
थांबायचं कुठं सांगा
घाम नितळून पाणी आटलं
राबायचं किती सांगा !

सूर्या येतो रोजच त्याला
काळजी कसली सांगा .
सणाला पोरं वाट बघत्यात
त्यांना काय सांगू सांगा !

रेषा हातावरच्या म्हणत्यात आता
आमचंच नशीब सांगा ,
त्याच असं म्हणाल्या तर
गरिबांनी जगायचं कसं सांगा !

तू नाही माझी झालीस तरी.... तुझ्या साठीच जगायचे आहे

कधी तरी तू रुसाव
मी तुला मानवाव
असच आपल्या प्रेमाची
गोडी आपण चाखाव


दारूचे चार घोट घेतल्यावर
म्हणे लोक खर बोलतात
हाच गांधीवाद जपावा म्हणून
आमचे सरकार दारूबंदी उठवतात



दारूचे चार घोट घेतल्यावर
म्हणे लोक खर बोलतात
हाच गांधीवाद जपावा म्हणून
आमचे सरकार दारूबंदी उठवतात




आठवणीच्या खेळात
मीच सदैव जिंकाव
तू मात्र हरून हि
माझ्यावरच हसावं



काल तुटलेल्या हृदयाला..
आज पुन्हा जोडायचे आहे....
तू नाही माझी झालीस तरी....
तुझ्या साठीच जगायचे आहे...

अर्थ भरपुर आहेत, शब्द शोधतोय,

थोडा वेळ दे…

अर्थ भरपुर आहेत,
शब्द शोधतोय,
थोडा वेळ दे…
... ... तुझ्याबद्दल लिहायला.

रेघोटे ओढले आहेत,
त्यावर तुझ्या आपुलकीचा ओलावा.
थोडा वेळ दे…
चित्र हे सुकायला.

भाळलो मी असा,
पण तुझ्या बाह्यरुपावर नव्हे.
थोडा वेळ दे…
तुझं अंतरंग उलगडायला.

रंग नको ठरवु गुलाबाचा,
आत्ताच तर नाते जोडले आहे.
थोडा वेळ दे…
कळीला या उमलायला.

म्हणुन तर म्हणालो,
अर्थ भरपुर आहेत, शब्द शोधतोय,
थोडा वेळ दे…
तुझ्याबद्दल लिहायला.

का रे असा करतोस... हृदय तोडतोस माझं..

का रे असा करतोस...
हृदय तोडतोस माझं....
मी पण तुझ्या साठी....
पुन्हा हृदय जोडते माझं...


नकळत तुझ्या माझ्या.
हृदय आपले जुंपले होते...
माझ्याच हातावर ते...
काचे सारखे तुटले होते...



हृदय माझे तुझ्यापाशी....
धडधड मात्र छातीत माझ्या...
तुटेल का गं तुझ्याकडून...
हीच एक खंत मनात माझ्या...



पाहशील का ग वळून....
चारचौघात तू असताना....
मन मोकळे बोलशील का ..
कुणी सोबत नसताना




हृदय माझे तुटले तेव्हा...
तुझे हृदय तुला हसवत होते...
पण सत्य तर हे आहे कि...
तेव्हा तुझे हृदय तुलाच फसवत होते..




आज माझे हृदय तुटले तरी..
मन मोकळे आहे..
मी एकटा असलो तरी..
सोबत तुम्ही सगळे आहेत...



आभाळ रडताना तुझी याद येते
डोळे बरसताना तुझी याद येते
पक्षी पाहुनी घरट्यात तुझी याद येते
आठवे उधळली कि तुझी याद येते



सुंदरते वर तुझ्या मज प्रिये
स्वतास आवरू शकलो नाही
चंद्रावर पण डाग आहे प्रिये
जाणून त्यास पाहणे सोडत नाही




तुला लिहिलेले प्रेम पत्र...
अजुन ही माझ्या उश्याशी...
आता मी त्याच्याशीच बोलतो...
जे बोलयचे होते तुझ्याशी

Sunday, October 30, 2011

एक झाड वर होते एक घरटे

एक झाड वर होते एक घरटे
चिमणा चिमणी चे संसार तिथे थाटाचे
आम्ही दोन आमचे दोन अशी छोटी सी दुनिया
नजर लागण्या जोगी होत्या त्या चिमण्या
किती गोड होती त्यांची कहाणी
सुखी संसाराचे ते राजा राणी
.
.
पण कधी कुणाला कुणाचा सुख बघून होतो
देवाला सुधा तेव्हाच कोप येतो
हसणाऱ्या डोळ्यात आसवांचे ढग
त्या पाखरांच्या नशिबी काय
कुणाला त्याची उमग
.
.
वादळ कधी सांगून येत नाही
चाहूल दुखाची कधी होऊ देते नाही
मग कस सगळेच आधी सावरायचं
मोडताना घरटा हि बघावा लागत
क्षण क्षण आयुष्याच वेचाव लागत
.
.
मनाच्या कोपऱ्यात ज्यांना जपली जिवापलीकडे
तेच एक दिवस एकटे सोडून जातात
.
.
चिमणी पडली एकटी चिमणा गेला तिला सोडून
शिकाऱ्या ने घातली नजर आणि संसार दिला उधळून
मग ओउढे चिमणी लागली सगळ सावरायला
आपल्या लेकराचा काळजीत क्षण लागली घालवायला
पण नसीब कधी कुणास उमगले
त्या पिल्याच्या नशिबी होते पोरके होणे लिहले
.
.
उठत पळत उडत कशी तरी घरट्या ती पाहुचली
चोची आणलेला कवड प्रेमाने लेकरांना भरवली
डोळ्यात पाणी उरी वेदना
साभाळून हि श्वास आवरेना
यामला करत होती शब्दा शब्दात विनवनी
पण काही सार्थक नाही झाले
देह पडले , पंख पसरले,
पापण्या झापन्या आधीच
श्वासाने साथ सोडले
करून देवाच्या पदरी
ती चिमणी हि त्यना सोडून गेली..
.
.
झाड हे बघून फार दुखी झाला
त्याच्या घरट्याला त्याने आश्रय दिला
त्याच्या समक्ष हसता खेळता गोजिरवाणा संसार उध्वस्त झाला.......

.

.

शेवट कधी कुणी बघितल
जागून घ्या हे क्षण आज च
उद्या से घटका कोणी मोजल्या.......

सोबत माझ्या तू असताना.

सोबत माझ्या तू असताना....
सार जग हसायचं.....
आपण हि मग त्यांचा कडे दुर्लक्ष करून ....
आपल्याच नादात रमायचं...



माझ्या डोळ्यांतील अश्रु

का आज थांबत नाहीत

दुख माझ्या मनातल

मलाच का ते सांगत नाहीत ...........

एक अनमोल आठवन..

तुझ्या माझ्यात जगलेले
प्रत्येक क्षण
न बोलता एकमेकांचे
जानलेले मन
चांगल्या वाईट क्षणात
दिलेले हात
शेवटपर्यंत न सुटणारी
तुझी साथ
या सर्वांची केलेली एक
गोड़ साठावन
कदाचित हीच असते का
एक अनमोल आठवन....

धाडस नाही झाली तुला काही सांगायची

धाडस नाही झाली
तुला काही सांगायची
भीती वाटायची सतत
तुला मी गमवायची
नेहमी प्रयत्न केला
तुला मनातल सांगायची
कधी प्रत्यक्ष तर कधी
अप्रत्यक्षपणे भाव मांडायचे
पण तुला सांगायला
शब्द कधी सुचलेच नाही
न सांगता तुला कधी
मन माझ कळलेच नाही ....

वेडे माझे मन गं ! समजावु किती.....?

वेडे माझे मन गं ! समजावु किती.....?
सोडुन गेलीस मला मी झुरावं किती.....?
येशील ना गं भेटायला वाट पाहावी किती....?
नावरुप नसणारी असतात काही नाती.....
मग ती नाती टिकवताना समाजाची का भिती....?
समजुन का घेत नाहिस मला मी झुरावं किती.....?

आज येईन ऊद्या येईन गेली सुट्टी सरुन......
कधी येशील जेव्हा मी जाईन मरुन.....
प्रेम नाहिस करत माझ्यावर माहित आहे मला.....
जाण ठेवावी काही गोष्टींची भान आहे तुला......
झालीस तु दुसय्राची मी झुरावं किती......?

एक वेडा बसला लावुनी तुझी आस......
तीच आस बनु नये त्याच्या जिवनाचा फास......
तुच सांग ना मी विश्वास कुणावर ठेवु.....?
प्रत्येक क्षण , दिवस मी झुरावं किती.....?
दोन घटकेच्या आयुष्यात मी मरावं किती....?
मी मरावं किती.....?

नकळत मी आज... तुला पुन्हा आठवले.

नकळत मी आज...
तुला पुन्हा आठवले......
दूर गेलेले ते क्षण....
पुन्हा मनात साठवले ..



घेतली होती वचने आपण...
एकमेकाला साथ देण्याची.....
हातात हात घेऊन....
आजन्म जीन मरणाची

खोवशील ना मला माझ्याही नकळत

खोवशील ना मला माझ्याही नकळत
तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ुल व्हायचंय मला

भिजशील ना माझ्या अंगणात मनसोक्त
तुला आवडणारी सुखद श्रावणसर व्हायचंय मला

झेलशील ना मला हळूवार अलगद
तुझ्या अळवावरचा टपोरा थेंब व्हायचंय मला

देशील ना मला प्रेमानं आलिंगन
तुझ्या कुशीतली कापसाची ऊशी व्हायचंय मला

सावरशील ना मला नेहमी भरकटताना
तुझ्या साडीचा ढळणारा पदर व्हायचंय मला

शोधशील ना मला नितळ सागरकिनारी
तुला सापडणार्‍या शिंपल्यातला मोती व्हायचंय मला

पुसशील ना मला तुझ्या रुमालाने
तुझ्या गालावरुन ओघळणारा अश्रू व्हायचंय मला

घालशील ना हळुवार प्रेमाची फ़ुंकर
तुझ्या नाजूक तळहातावरला फ़ोड व्हायचंय मला

परडीत वेचशील ना मला न तुडवता
तुझ्या परसदारातल्या प्राजक्ताचा सडा व्हायचंय मला

बाळगशील ना मला नेहमी बरोबर
तुझ्या गळ्यातला लाडका ताईत व्हायचंय मला

पहाशील ना माझ्याकडे साश्रू नयनांनी
तुझ्या पाणिदार डोळ्यातलं काजळ व्हायचंय मला

झुलशील ना माझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
तुझ्या कानातलं झुबकेदार डूल व्हायचंय मला

न्याहाळशील ना मला रात्रभर एकटक
तुझ्या शयनगृहातील आरसा व्हायचंय मला

नाचशील ना माझ्या सप्तसुरी तालावर
तुझ्या पायातलं रुणझुणतं पैजण व्हायचंय मला

धरशील ना मला ह्रदयाशी कौतूकानं
तुझ्या पायात घोटाळणारं इवलसं पिलू व्हायचंय मला

पहाशील ना मला सारखं मागे वळून
तुझ्या पाठीवरला न दिसणारा तिळ व्हायचंय मला..

प्रत्येक शब्द तुझ्यासाठी.... शांतपणे लिहिलेला....

प्रत्येक शब्द तुझ्यासाठी....
शांतपणे लिहिलेला....
तरी का असा तो....
तुझ्याच साठी अडलेला...



जेवताना ताटात
एक घास होता उरला.
टाकून उठणार इतक्यात
तो चेहरा आठवला इवला .

प्लेट घेऊन सकाळीच
तो उपाशीच होता आला .
म्हणाला ,... माय...
भाकर दे ग मला ..
कालपासून जीव बघ
वाराच नुसता खाल्ला ......
टीचभर पोट माझं,
पण भरत नाही खळगा....
काम मागितलं कुणाला तर
म्हणत्यात ..पुढल्या दाराला जावा!
कसं सांग माये तू ,राहू मी उभा?
रस्त्याच्या पल्याड वाट बघतोय ,
हात पाय जोडून .... माझा बाबा !
एक घास दे माये ,
पुरवू अर्धा -अर्धा ..
तुझी पिल्लं जेऊन झाली कि
पुसून घेईन त्यांचा डब्बा .......
.............आठवून आलं पाणी
जीव केवढा तो बघा .....
उठून देऊन आले 'पल्याड '
भाकरीचा तो डब्बा !!!!!!!

अवचित... अनामिक... अचानक... अनाहूत....काहीतरी घडून जाते....

अवचित... अनामिक... अचानक... अनाहूत....काहीतरी घडून जाते....
ते जे घडते... सगळे काही ढवळून निघते.... वादळाने सारे काही क्षणात उडुनी जाते....
उरते फक्त एक आर्त भावना.. ती पण शुष्क... तिचे ते प्रतिबिंब न्याहाळत शरीरामध्ये उरलेल्या अस्थींना घेऊन जातो नदीकाठी....
पंचमहाभूतांत विलीन झालेला देह, विसर्जित अस्थी... अधांतरी तरंगत असतो फक्त आत्मा... शोधात तिच्या भटकलेला.. अनंतात विलीन होऊ पाहणाऱ्या प्राणज्योतीला तिच्यातच एकरूप करू पाहणारा....

कोणावरती प्रेम करणं हा वेडेपणां,

कोणावरती प्रेम करणं हा वेडेपणां,
कोणीतरी आपल्यावर प्रेम करणं ही भेटं,
जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करण हे कर्तव्य,
तर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने आपल्यावर प्रेम करणं म्हणजे "आयुष्य"....

तुम्हाला काय वाटलं ,मी काय प्याली असेन?

तुम्हाला काय वाटलं ,मी काय प्याली असेन?
ज्याची मला इतकी ही नशा चढली असेल ?

सत्तेचं सरबत पिवून मी
तब्बेत सांभाळली असेल ?
कि खुर्चीची उब घेऊन
मी 'अंडी 'उबवली असेन?
तुम्हाला काय वाटतं मी ,काय प्याली असेन?

माझ्याजवळचा पैसा मी
'स्विस ' केला असेन?कि
छताचं पोट फाडून त्यात
त्याला 'लॉक 'केला असेन ?
तुम्हाला काय वाटतं मी ,काय प्याली असेन ?

'पोरं' खोटी सांगताना मी
पाढा चुकली असेन? कि
अनुदान लाटताना मी
'पोषण आहार 'खाल्ला असेन ?
तुम्हाला काय वाटतं मी,काय प्याली असेन?

बंगले बांधताना मी
सिमेंट वापरलं असेल ?कि
झोपडीत तेल सुद्धा मी
त्यावर ओतलं असेल !
तुम्हाला काय वाटतं मी ,काय प्याली असेन?

धडे 'आदर्शाचे 'गिरवून मी
आदर्श झाली असेन ?कि
'खुदाईत' धन ओतून
त्याचा पाया भरला असेन?
तुम्हाला काय वाटतं मी,काय प्याली असेन?

या पायरीवर प्रत्येकाला ही
नशा चढली असेल ?
वाटून घेऊ आपण सारे जर
तुम्हाला हवी असेल !
तुम्हाला काय वाटतं मी ,काय प्याली असेन?
ज्याची मला इतकी ही नशा चढली असेल ?

शब्द शब्द जोडून तुझ्या साठी.. लिहितो काही प्रेम चिठ्या.

कुणी सुखात कुणी दु:खात...
प्रत्येकाच्या मनात काही ना काही...
नशिबाने लिहिले जे...
त्याला रोखेल का कुणी..


शब्द माझ्या लेखनीचा...
तुझ्याच भोवती घाली गिरट्या...
शब्द शब्द जोडून तुझ्या साठी..
लिहितो काही प्रेम चिठ्या..


तु माझी होणार नाहीस...
हे दोघांना ही कळून होते...
तरी एकमेकासाठी ते..
निरर्थक प्रयत्न का होते..

एक तर्फी प्रेम

एक तर्फी प्रेम
***********************
कधी तरी मनाच्या कोपऱ्यातून प्रेम करून बघा
एक तरफ का होईन कुणाच्या तरी स्वप्नात जागून बघा
त्याच्या एका smile ची वाट बघून बघा
त्याच्या एका शब्द साठी तुम्ही सर्वस अर्पण करून बघा.
=====================================================
प्रेमात पडताना विचार केला नाही
प्रेमच नशीब काय होईल
मग का आता इतका विचार
जगायला का आता प्रेमाचा आधार
======================================================
प्रेम करताना मी त्याला विचारले नाही
तू पण माझ्या वर कधी तरी करशील का प्रेम ?
आज जर तो स्वप्न आहे माझ्या जीवनात तर
न माझी न त्याची हे आहे फक्त भूल मनाची...
======================================================
का म्हणून वेदनेची साद त्याला देऊ
मी एक तर्फी प्रेम केला
मग प्रश नाही अपेक्षांचा
क्षण चा साथ जरी मिळाला
तरी सात जन्माचा उधार झाला
=======================================================
त्याची आठवण मी नेहमी जपून ठेवेण
पापण्याच्या कडा तून वाहणार नाही
काळजी याची घेण
फुलां सारखा ओंजळीत
असेल माझा प्रेम
जेव्हा हि तो येईल समोर
उधडेन त्यावर
फक्त हसणारे दोन नयन
कारण माझा आहे एक तर्फी प्रेम

कसे सांगणार मी त्याला भावना मनातली
कसे दाखवू त्याला ओलावली पापणी
त्याला कधी ते समजणार आहे
प्रेम तर दूर माझा सावली चा हि त्याला स्पर्श नाही
कसे घेऊ मी शब्दाचा आधार
एक तर्फी प्रेमाला फक्त वेदनेची मार

पण आज हि मी खुश आहे
जरी त्याच्या पासून दूर आहे
तो जगायला सांगून गेला
फक्त त्याच्या साठी जगले
तो हसत राहा बोलून गेला
माझ्या आज हि कडा नाही ओलावल्या
तो जपून राहायला सांगून गेला
मी आज हि एकटीच आहे.............

रोज मीच तुझी आठवण काढायचं

रोज मीच तुझी आठवण काढायचं
तू मात्र सर्रास मज विसरायचं
स्वहून तुझ्याशी बोलायला यायचं
तू मात्र सतत टाळायच
या डोळ्यांना फक्त तुलाच पहायचं
पण तू मात्र नेहमीच दुर्लक्षित करायचं
का अस करतोस का अस वागतोस
आवडत तुला म्हणून मला छळतोस
किती ते तुझ्या मागे मागे करायचं
दुरूनच तुझ्यासाठी झुरायचं
एखादया दिवशी मीही रुसेन
देशील तू आवाज पण
साद द्यायला मी नसेन
शोधशील जरी कुठे मला
दिसेल फक्त ती निजलेली शय्या तुला
छळ मग किती
छळायच तेवढ
जमणार नाही तुला
प्रेम केल मी जेवढ .........

यावे तुझ्या मिठीत... विसरून सारे जग....

यावे तुझ्या मिठीत...
विसरून सारे जग....
साम्वाशील जेव्हा मिठीत माझ्या तेव्हा...
एकदा हृदयात वाकून बघ..



लाजलीस ती कि...
चुकतो ठोका हृदयाचा ...
पळत येऊन मिठीत माझ्या...
घेतेस जेव्हा ठाव मनाचा...


पावसात तुझ्या भिजायला
मलाही खूप आवडतं
तू नसलास कि मात्र
एकटं एकटं वाटतं...

प्रत्येक सरीला तुझ्या
बिलगावं असं वाटतं
कानात येऊन कांही
सांगावसं वाटतं !

सरींचं पण थोडं
कधी ऐकावस वाटतं
भिजताना सोबतीला
तुला बोलवावसं वाटतं !

मनातलं.... मनाला
समजावं असं वाटतं
त्यासाठीच पावसात तुझ्या
भिजावं असं वाटतं !!!

सखे, कुठं मी चुकलो, कशास मुकलो..

सखे, कुठं मी चुकलो, कशास मुकलो...
सखे, कुठं मी चुकलो, कशास मुकल
रोज याचा हिशोब मी करायला बसतो
सगळी देणी-घेणी अगदी अचुक मांडतो
पण सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे, प्रेमाची वा मैत्रीची
मी कधीच कींमत करत नाही
पण तुझ्या दग्याची
मात्र मी कींमत करतो
सखे तुझ्या दग्याला
मी फ़क्त एका रुपयातच मोजतो
सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे जाताना तु मला
व्यवहारी जग दाखवुन गेलीस
त्याच व्यवहारी जगात आज
मी लाखोंची उलाढाल करतो
सखे, या दुनियेतला प्रत्येकजण मला
आज या पैश्यामुळेच सलाम ठोकतो
पण सखे, हा एक रुपया माझ्या
राज्याच्या हुद्दयाला रंक ठरवतो
मी जिंकलेल्या युध्दालाही
ह रुपयाचा एक अंक हरवतो

सखे, या रुपयाला ना
बाहेर कुणीच विचारत नाही
पण माझ्यासमोर मात्र
ताठ मानेने जगतो
सखे, लहानपणी मी गणितात
शिष्यव्रुत्तीने पास व्हायचो
पण या बेरीज-वजाबाकीच्या साध्या
गणितात आज मात्र मी नापास होतो
सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे, मला कधी कधी तुझी आठवण येते
तेव्हा मी या रुपयाकडे नजर रोखुन पाहतो
त्यातला तो एक आकडा
ना मला सारखा खुणावतो
की तु एकटाच आहेस, आणि एकटाच राहणार...
सखे, माझ्या डोळ्यांतुन ओघळणारा थेंब मग
त्या रुपयावर हलकेच विसावतो
सखे, तु दिलेला "दग्याचा" एक रुपया
नेहमीच सगळा हिशोब चुकवतो

सखे, माझा मित्रानं
मला एकदा विचारलेल
की "अरे तु आज ईतका
श्रीमंत तरी हा फ़ुटकळ
एक रुपया तुझ्याजवळ का असतो?"
सखे मी त्याला म्हणालो
"अरे हा "भाग्याचा" रुपया आहे
म्हणुन याला मी नेहमी खिशात ठेवतो"
आणि हो "हा फ़क्त ज्याच्या नशिबात आहे
त्यालाच मिळतो" फ़क्त त्यालाच मिळतो

ओठावरची लाली तुझ्या....

ओठावरची लाली तुझ्या....
माझ्या रंगात रंगलेली...
जेव्हा माझ्या गालावर ती...
हळूच येऊन उमटली...



मिठीत माझ्या आल्यावर....
तुझे ओठ माझ्या हृदयावर..
किती सहन करू मी...
हे कोमल आघात माझ्या मनावर...

तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....

तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....

भेटायच होत मला, म्हणून बघायची ओढ लागली,
पण उशीर झाला म्हणून ट्रेन पकडायची जास्त गरज भासली,
तिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय,

कशी जाउ शकते मला ती बघित्यला शिवाय,
तिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय,

खूप राग आला म्हणून नाही उचलला तिचा मी फोन,
पण मन सांगू लागल, "तुज्या शिवाय तिला या जगात आहे तरी कोण?"

पण तरीही ती कशी जाउ शकते मला भेटल्या शिवाय,
तिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय.....

टाळले साऱ्या दिशांनी

टाळले साऱ्या दिशांनी
टाळले साऱ्या दिशांनी
जाऊ कुठे हे भगवन?

दाटला अंधार सारा
पाहू कुठे हे भगवन ?

वेधले दु:खानी इतुके
साहू किती हे भगवन ?

कुठे दिसेना ठाव तुझा
धावू किती हे भगवन?

दाही दिशा दूर गेल्या
राहू कुठे हे भगवन ?

दाखव रे मार्ग तूच आता
तुजविण कोण भगवन ?

तुझ्या सहवासात माझा रात्रीचा दिवस होतो

सहवास
तुझ्या सहवासात माझा
रात्रीचा दिवस होतो
माझ्या मनी तव प्रेमाचा
गुलमोहर फुलतो

नुसत्या तुझ्या आठवणीनही
जीव माझा मोहरतो
तुझ्या सहवासाची मग
मी स्वप्ने पाहू लागतो

दोन घडीचा तुझा
सहवासही मला पुरेसा होतो
तुझ्या आठवणींचा नंदादीप
मग माझ्या मनी तेवत राहतो

कधी तू येतेस
कधी तुझी स्वप्ने येतात
स्वप्नातही मला तुझ्या
सहवासाची जाणीव देतात

तुझं येण माझ्यासाठी
नवजीवन घेऊन येतं
रात्रीच चांदणही मग
रुपेरी लेनं लेऊन येतं

तुझ्या मिठीतील सहवासाची
ओढ मला लागते
चांदण्याची रात्रही मग
आपल्यासावे जागते

तू जातेस प्रीतीचा
ओळ सुगंध ठेऊन
दिवस माझाही जातो मग
आठवणींना तुझ्या घेऊन ......................................

ती म्हणाली काल | जेव्हा तू येशील |

ती म्हणाली काल | जेव्हा तू येशील |
मलाही नेशील | संगतीने ||

खुळ्यावानी रोज | तुला मी जपते |
परी हरवते | आस माझी ||

तुझ्यासाठी सख्या | रडते छकुली |
पाहते वाटुली |निरागस ||

पुरे झाले आता | आम्हाला छळणे |
व्हावे आता येणे | लवकरी ||

छळतो सखे ग | मलाही दुरावा ||
वाटे संपवावा | आता वेगी ||

असेच उडोनी |वाटे आता यावे |
आणि विसावावे | मिठीमध्ये ||

परी नाही रजा | देतसे साहेब |
विचारितो जाब | सदाकदा ||

काळीज हलले | मन गलबले |
डोळेही भिजले | आसवात ||

जगण्याची आता | आशाही संपली |
अशी 'ती म्हणाली | काल जेव्हा '||

फक्त दे तू हात माझ्या या हातात

फक्त दे तू हात
माझ्या या हातात
राहो दिनरात
साथ तूझी ||

मिळूनिया पाहू
स्वप्न हे उद्याचे
गुज काळजाचे
ऐक सखे ||

दमलो सखे गं
धावूनिया मागे
जोड आता धागे
मनाशी या ||

कळेल तुलाही
वेदना मनाची
तुला या प्रेमाची
आण असे ||

आज मज वाटे
यावे तुझ्या पास
मिळे सहवास
आनंदाचा ||

विनवणी हेची
एक असे आता
फक्त दे तू हाता
हातात या ||

असाच आज विचार करत बसलो

असाच आज विचार करत बसलो
माझ्या आजवरच्या जीवनाचा
गोळाबेरीज मांडायला बसलो
माझ्याच आयुष्यातील शब्दफुलांचा
...बेरजेत सगळे माझ्या गोळेच गोळे आले
...कसेही सोडवले तरी,गणित माझे उणेच आले
...करू तरी काय मी,माझी काय चुक
...प्रत्येक गोष्टीला आज इथे एक नवा लुक

काल जे सोपे होते,तेच आज कठीण झाले
कठीण का झाले शोधता शोधता
आयुष्य माझे शून्य झाले.....
कळले जेव्हा शून्यातच धावतोय
अर्थच माझ्या जीवनाचे सारे तेव्हा अर्थहीन झाले
...उपदेशांच्या भडिमारांचा पिरयामिड रचला लोकांनी
...शपथेवर मला आणि अपेक्षांनाही जगवला लोकांनी
...पण साला पिरयामिड पत्त्यांचाच डोलारा निघाला
...माझ्याच खांद्यावर अपेक्षांचा तेव्हा छानपैकी'जनाजा'निघाला...
पण मित्रांनो,
तेव्हाही तिथे एक कुणीतरी नाचत होत
माझ्याच नावाने मनापासून साखर कुणी वाटत होतं
पालवीच्या पानांमागे चंद्र जेव्हा लपत होता
माझ्यासाठी कुणीतरी तेव्हा तीळ तीळ मरत होतं
...मग कळले तेव्हा मला,गणितात मी मध्यात होतो
...काही उण्या अंकाचीच बेरीज मी करत होतो
...मग म्हटले जाउदे साला,पेपरच कठीण आहे
...अजून बराच वेळ आहे,आपल्याला कुठे घाई आहे
आता मात्र ठरवलयं मी हसतच जगणार
मीही आता मनाने कुणासाठी साखर वाटणार
अश्यामध्येच मित्रांनो एक फायदा असतो
आपलं झाकून मनामध्येच सारया जगाला हसवण्याचा आनंद असतो..

झाडावरून ओघळताना प्राजक्त वाऱ्याला म्हणाला,

झाडावरून ओघळताना
प्राजक्त वाऱ्याला म्हणाला,
मातीत मिसळून जाईल रे
माझा सारा सुगंध ...
जाता जाता देईन म्हणतो
मी कुणाला तरी गंध .
इतकसं जीवन आहे
त्याला करेन म्हणतो धुंद .
कुणासाठी तरी
गंधित होऊन
जळेन म्हणतो मी मंद !!!!!!

प्रेम म्हणजे दूसर्यासाठी जगणे...

प्रेम म्हणजे
दूसर्यासाठी जगणे...
ती म्हणाली होती प्रेम
आहे माझे
तुझ्यावर
नाही उमजला अर्थ
तेव्हा तिच्या बोलण्याचा
माझ्याजवळं
ती नाही,
आता प्रत्येक
आठवण
सांधतो आहे

कळलेल्या प्रेमाचा अर्थ
बांधतो आहे
कदाचीत प्रेम
म्हणजे
आपुलकीच्या बोलांसाठी आतुर्लेले
कान
पावसात
शब्दांच्या चिंबं
विसरतातं
देह्भान
कदाचीत प्रेम
म्हणजे
भेटीच्या ओढीत
झुरणारी ती
का फक्त
एका कटाक्ष्यासाठी त्याने
ओवळून
टाकलेला जीव
कदाचीत प्रेम
म्हणजे
पाणीदार
बोलके डोळे
शब्द
नको तिला उसने,
ती डोळ्यातूनच
बोले
कदाचीत प्रेम
म्हणजे प्रत्येक
क्षणाला तीचा विचार
पहिला
आजही त्याने
अर्धा घास
तिच्यासाठी ठेवला
कदाचीत प्रेम
म्हणजे
पापण्यांमधे
जपलेला सागर
ठेचं लागतच
त्याला,
तीला फुटलेला अश्रुंचा पाझर
कदाचीत प्रेम
म्हणजे आठवणींचे
धूके दाटलेले
ती निघून
गेल्यावर
अश्रूंच्या दवबिंदूसंगे
मला वेढ
आता मात्र
शब्धही लागतात
अपुरे पडू
भावनांची गर्दी कशी कागदावर
उतरवू ?
पण आता कळतयं....
प्रेम म्हणजे
दूसर्यासाठी जगणे
आपले विसरून
दुसर्याच्या विश्वात
रमंणे
प्रेम म्हणजे
दूसर्यासाठी जगणे...
प्रेम म्हणजे
दूसर्यासाठी जगणे

कधी तरी वाटत मीच का अस जागाव

कधी तरी वाटत
मीच का अस जागाव
प्रत्येक नियम धरून
मीच का अस चालावं ?

चालताना हि नियमावली
सोबतीला धराव
स्वतंत्र देशाचा नागरिक
अस स्वतःच का बोलाव ?

रात्र दिवसा काम
करून मी घाम गाळाव
अन त्या घामाचा अर्धा हिस्सा
tax म्हणून मीच का भराव ?

माझ्या प्रत्येक कष्टाचा
हिस्सा असा मीच वाटावा
महिनाअखेरीस उसन काढून
मीच दिवाळी साजरी का कराव ?

जे चालत सर्वकाही
मला हि कळावं
मग उगाच का मी
तोंड दाबून बुक्याचा मार खाव ? .........

मी खरंच प्रेमात पडलो काय..?

तुला पाहून मी..
तुझ्या भ्रमात पडलो काय....?
असा काय होतंय मला...
मी खरंच प्रेमात पडलो काय..?



जगण्याची हाव
काही सुटत नाही
असेल जरी किती यातना
यमास सामोरी पाहवत नाही




जगणे तिचे आज जड झाले
वासनेस शरीर तिचे बळी पडले
इच्छा मरणाची हाक आज हि ती देते
ते मात्र सात वर्षाच्या वनवासातून सुटले




शरीराची लक्तरे तोडताना
लांडग्यांनी हि लाजावं
मनुष्य वेशातील त्या
नरधामान अस का माजव ?

Sunday, October 23, 2011

झाडावरून ओघळताना

झाडावरून ओघळताना
प्राजक्त वाऱ्याला म्हणाला,
मातीत मिसळून जाईल रे
माझा सारा सुगंध ...
जाता जाता देईन म्हणतो
मी कुणाला तरी गंध .
इतकसं जीवन आहे
त्याला करेन म्हणतो धुंद .
कुणासाठी तरी
गंधित होऊन
जळेन म्हणतो मी मंद !!!!!!

थेंब अश्रुंचे दोन गालावरती.

थेंब अश्रुंचे दोन गालावरती.. कसे पुसायाचे राहून गेले.. लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले.. . . सांगितले बरेच काही.. आनंदाश्रु अन काही बाही.. अर्थ सुकल्या आसवाचा परी लावायचा तो लावून गेले.. . लपविलेले जे दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे चाचपले कितिक मुखवटे मुखवट्याला चेहर्‍यावरती चढवायाचे आज राहून गेले . लपविलेले जे दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे वावरते जणू.. उनाड वारे हसताना पुन्हा भरले डोळे पापणीतून अश्रु वाहून गेले . लपविलेले जे दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले.. . . थेंब अश्रुंचे दोन गालावरती.. कसे पुसायाचे राहून गेले.. लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले.

गेलेल्या पावलांनी सांग ना परत येशील का

गेलेल्या पावलांनी सांग ना
परत येशील का
सुटलेला संग पुन्हा
जोडशील का ?
आजही तुझीच
वाट मी पाहत्ये
तुझ्या एका हाकेसाठी
आजही धावत्ये .........
सोबतीसाठी तुजीया
मन हे असुसलय
दुरावले म्हणून हृदय आता
मजवरच रुसलय .........
तासनतास ते तुझ बोलन
आवडते तुज म्हणून
मज ते छळण
उगाच क्षणिक ते भांडण
आवडतोस मज त्यातूनच
आडवाटेन ते सांगण .............
कळायचं तरीही ते विचारण
संग न ग करतेस का प्रेम मजवर ?
पण प्रत्येकवेळी माझ ते
हसण्यावर नेण......
आग्रह तुझा ठरौयात कि भेटन
माझ मात्र दरवेळीच टाळण
पुन्हा ते क्षण
हवेसे वाटतात
आठवणींचे ढग
पुन्हा पुन्हा दाटतात
संग न हरवलेत हे सारे क्षण कुठे
हसणेही सारे आता वाटतय खोटे
आजही बोलतो पण त्यात
फक्त औपचारिकता असते
दोहोंमध्ये एक खोल दरी भासते
सांग ना परत तू येशील का ?
तेच प्रेम मजवर करशील का ?
पुन्हा तोच प्रश्न विचारशील का ?
सांग ना न बोलता
होकार माझा ऐकशील का ?
सांग ना ......................

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल.......

एकदा एक झाड़
वेलीच्या प्रेमात
पडल....... .......
एकदा एक झाड़
वेलीच्या प्रेमात
पडल ,
तिला पाहताच
त्याला तीच वेड
लागल ,
वेलीला विचारू
तरी कस?
या प्रश्नाने
त्याला पछाडल,
पण, आपण
जरा धीर
धरावा अस
म्हणत त्याने
स्वतहाला सावरल,
वेल मात्र
आपली हसत ,खेळत
राहत होती,
ते पाहून झाडाने
तिच्याशी मैत्री केली होती ,
काही दिवसाने
वेल मात्र
जमिनीवर पसरू
लागली , ते पाहून
झाडाने
तिची विचारपूस
केली ,
वेल म्हणाली ,
झाडा मला तुझा आधार
हवा आहे ,
तू मला आधार
देशील का ??
यावर झाड़
म्हणाले , तू
माझी होशील
का ???
ते ऐकताच वेलिने
नकारार्थी मान
हलवली ,
ते पाहून
झाडाची निराशा झाली ,
हिरमुसलेले ते
झाड़ क्षणभर
विचारात पडले ,
विचार करून
त्याने
वेलीला आधार
देण्याचे
वचन
दिले ,
वचन देताच वेल
मात्र
झाडाला बिलगली ,
अन ,
हसता हसता त्याची आसवे
हळूच ओघळली ,
आसवे पुसत पुसत
त्याने
तिला आधार
दिला ,
कारन ....
तिला आधार देण
हा त्याच्या प्रेमाचा भाग
ठरला ..

एका मुलाची प्रेमकथा .....

एका मुलाची प्रेमकथा .....



एकदा माझ्या गर्लफ्रेंड ने मला तिच्या घरी बोलावले ,

मि तिच्या घरी गेलो आणि बेल वाजवली .. तिच्या छोट्या बहिणीने दर उघडले , ति

पण खूप सुंदर होती . ति हसून बोलली "तुम्ही खूप स्मार्ट आहात , आत्ता
घरी

तर कोणीच नाही . मि एकटीच आहे , आत
या ना . "

... ... मि हसलो आणि माझ्या बाईक कडे परत निघालो .. तेव्हा तिचा पूर्ण

परिवार बाहेर आला अन् ते माझ्या चांगले
पणावर खुश झाले अन्

म्हणाले .. आम्हाला तु पसंद आहे .

.

.

.

.

..

.

...

आता मि काय सांगू त्यांना ,



की ,

मि माझी बाईक लॉक करायला चाललो होतो म्हणून ...!!

सूर्य असतो प्रखर दिवसा अन रात्री भोळा चंद्र

तू म्हणतोस सृष्टीचं
सख्या चक्र असंच चालतं
विचार करून सांग मग
हे असं कसं रे होतं ?

कोसळत असतो पाऊस अन
पसरत असतं ऊन
इंद्रधनू सांग मग
त्यातून कसं फुलतं?

खाली असते जमीन अन
वर असतं आभाळ
तरी त्याचं क्षितिजावर
मिलन कसं रे होतं?

शब्द असतात डोक्यात अन
मनात असतात भावना
तरी त्याचं एकत्र येऊन
गीत कसं रे बनतं?

काळजात असते माया
अन र्हदयात असते प्रेम
सांग त्यांनी मिळून मग
नातं कसं रे जुळतं ?

हातात असतं नशीब आणि
डोळ्यात असतात स्वप्नं
तरी त्यांना घेऊन आपलं
जीवन कसं रे फुलतं?

सूर्य असतो प्रखर दिवसा
अन रात्री भोळा चंद्र
चांदणं बघून रात्रीच मग
आभाळ का रे सजतं ?

तुझ्या माझ्या नात्याला...

तुझ्या माझ्या नात्याला...
साथ आपली अशीच लाभु दे...
दुर असुनही हे नाते...
सदा असेच फ़ुलु दे...




मी पावसाला विचारले...
येशिल का रे घरी उद्या...
त्याला होति घाई म्हने...
विजे सोबत पहिली भेट आहे...




मला समजून घेणारी...
असेल का अशी कुणी...
रोजच स्वप्नात तिच्या....
रात्रंदिवस जपणारी....

सांग तू अशी कोणी असेल का?

सांग तू अशी कोणी असेल का?

माझ्या आयुष्याच्या नवीन वळणावर,

सहज माझा हाथ विश्वासाने पकडणारी,
...
सांग तू अशी कोणी असेल का?

माझ्या जीवनाच्या काटेरी रस्त्यावर,

आयु ष्यात प्रेमाचे फुल पडणारी

सांग तू अशी कोणी असेल का?

मी पावसात भिजताना,

पावसात पण माझे अश्रू पाहणारी,

सांग तू अशी कोणी असेल का?

माझ्या डोळ्यात पाहून ,

माझे निर्मल अन्तः करण ओळखणारी,

सांग तू अशी कोणी असेल का?

माझ्यातला मी शोधून देणारी,

आणि माझ सर्वस्व विश्व होणारी,

सांग तू अशी कोणी असेल का?

कळत नकळत झालेली माझी चूक,

हक्काने सांगून ती सुध्रावणारी,

सांग तू अशी कोणी असेल का?

मी कधी रडत असताना ,

बेशक स्वतः चा खांदा भिजवणारी,

सांग तू अशी कोणी असेल का?

आणि आणि मला माझ्या

ह्या स्वप्नातून सहज उठवणारी,

सांग तू अशी कोणी असेल का?

काल वहीची पाने चाळताना ..

काल वहीची पाने चाळताना ..
तुझ्या आठवणींच पण सापडलं...
भर भर उडणार चंचल माझ मन...
न जाने त्यात का अडकलं...

Wednesday, October 19, 2011

योगायोग बाकी काही नाही

* योगायोग बाकी काही नाही *

एक तो पहिला पाऊस . . !
ज्या पावसात मी माझ्या सखी सोबत
चिंब भिजलो होतो . . .

अन

एक हा परतीचा पाऊस . . !
ज्या पावसात मी तिच्या आठवणी सोबत
चिंब भिजलो होतो . . .

नसते ते भाव कधी डोळ्यात

नसते ते भाव कधी डोळ्यात
तरी हरवतो त्याच भावनेत
वेडावतो तुझ्या नकारात
तो माझा अहंकार कि पुरुषार्थ



मी चालतो एकटाच माझा
तो रस्ता टळून गेला
तरी वळणावर त्या एका
आत्मा घुटमळून गेला..

काय तरी मिळतं बर प्रेमात पडून

काय तरी मिळतं बर प्रेमात पडून
दु:ख, वेदना आणि पश्चातापाचा आहेर,
तरुण मन म्हणे हेच दिवस आहेत
कधीतरी पडा रे गैरसमजातून बाहेर..!!

उबग येत नाही का रे तुम्हाला
तेचं तेचं नखरे नि हट्ट झेलण,
जीव ओवाळून टाकण आणि
खोट वाटावं इतंक गोड बोलण..!!

सरळ सरळ प्रक्टिकल वागावं
का भाव द्यावा फुकटचा मनाला,
त्याला अक्कल नसते तेच तर
भाग पाडतं प्रेमात पडायला..!!

खूपचं उत्तम जर जमलं ठेवायला
रंगात रंगुंनी रंग आपला वेगळा,
मला तर वाटत सुखी होण्यासाठी
बिनधास्त वापरावा हाच फॉर्म्युला..!!

आधार मिळतो म्हणे एकल्या जीवाला
भावनिक संकटांच्या वेळी सावरायला,
लहान का असता तुम्ही येत नाही
स्वतःच्या गोष्टी स्वतःचं आवरायला..!!

खरंच असतं का प्रेम मैलाचा दगड
आणि टिकणार शाश्वत चिरकालं,
गेलेतं ते दिवस आता कायमसाठी
राहिल्यात फक्त आठवणी आजकाल..!!

एकचं तर जीव असतो आपल्याकडे
का तो कुणाला लावून फसायचं,
घरचंच का कमी असतं त्यात
दुसऱ्याचं घोडं फुकटचं पोसायचं..!!

धन्यवाद देतो बाप्पाला त्याने ठेवलंय
मला "पुन्हा" प्रेमात पडण्यापासून दूर,
पण बघून दोन चिमण्या जीवांना
आजही मनात का बर उठतो काहूर..!!

वेळ गेली निघून

वेळ गेली निघून
============
जगणे आयुष्याचे
हसणे रडणे क्षणिक असे
जरी उरी दाटे हुंदका
तरी ओठान वर स्मित बसे
फक्त अश्रूंची वाट नको
म्हणून गपली
पण का तिथेच
शब्दांची शृंखला संपली
हसऱ्या डोळ्यात हि
पहिले दुखाचे सागर
कसे हे जीवनाचे
अदभूत भवसागर
नाते जुडतात तुटतात
तोडणाऱ्याला त्रास नाही
पण तुटलेल्याचा हृदयाला
छन्नी करत तडा जाईल
मग का म्हणून असे
मातीचे मन असावे
बसरले पापण्या तर वाहणारे
ठेच लागली तर फुटणारे
पण काही हि असो कसा हि असो
प्रत्येक क्षण खोलात जपणारे
आठवांचा शहारा
क्षणो क्षणी जाणवणारे
फक्त हसताना बघायला
खोटा मुखवटा चढवला
पण नजरेने केली बैमानी
परत डोळ्याच्या कोपऱ्यातून
मनाचे भाव बोलला
खोटी नाटक हसण्याची
देखावा सुखाचा
कळत नाही का इतकं हि
कशाला पुरावा धोक्याचा
अंजन घातले डोळ्यात
तरीहि दिसणार नाय
जे आता पर्यंत कळले नाही
आता कळून उपयोग तरी काय....
वेळ गेली निघून............

इस दिये को देख आज कुछ याद आता है

इस दिये को देख आज कुछ याद आता है

मेरा वजूद भी इसकी जिन्दगी से जुड़ जाता है

रोशन करके जैसे ये बुझ जाता है

कुछ ऐसे ही मेरा भी हर सपना टूट जाता है..

सोनेरी सांजवेळ अथांग सागर

सागरातल्या बेधुंद वाटा
किनार्यास स्पर्शून
परतणाऱ्या लाटा
मऊ मऊ वाळूतील
ती पावुल खून
तुजवर जडलेल माझ वेड मनसोनेरी सांजवेळ
अथांग सागर
हातात हात तुझ्या
नजर तुझी मुखावर माझ्या
मिळून एक सुंदर स्वप्न पाहू
जोडीन प्रेमाच्या गावा जावु.............

खूप दाटून आलाय गडगडतय..

खूप दाटून आलाय
गडगडतय..
नक्की त्याच्या मनात
काय बरे सलतंय..?
ती खेळत आहे
त्याच्या अंगावर
वेदनेचा प्रकाश
त्याच्या मनावर...
तो तरी तिला
आपले म्हणतो
पोळून निघाला तरी
गडगडत राहतो...
ती येते आणि जाते
हा भरून येतो
ती लख्खं हसते
हा बेधुंद बरसतो....
रिकामा होत जातो
मातीत मिसळतो
वाहत जातो परत तिथेच
पुन्हा नव्याने बरसतो...

मै चिराग के जैसे जलती हु

मै चिराग के जैसे जलती हु
अंधेरे से डरती हु
आशा की लौं है हरदम रोशन
ख्वाबो की दुनिया में रहती हु
हकीकत से अंजन नहीं मै
हवाओ के संग चलती हु'
असमान से बाते करती हु
फूलो से रंग बटोरती हु
खिलती हु कलिओ की भांति
चंदासी शीतल है बाते
महकती हु मै चहकती हु
मै ROSHNI हु
रोशन हर पल रहती हु........

खुश रहा.....हसत रहा.....काळजी घे दादा..!

आज आपल्या ग्रुपचा आवडता दादा ह्याचा हैप्पी वाला बर्थ डे आहे
.....थोडंस लेट झालं समजायला पण चलो देर आये दुरुस्त आये
....दादाला मनापासून त्याच्या जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
गणपती बाप्पाकडे मी मनोभावे प्रार्थना करतो की
माझ्या दादाला सदैव सुखात थेंव आणि आलेल्या सगळ्या
परिस्थितींना समोर जाण्याची मानसिक शक्ती दे.
आणि हो आमच्या 'राजदीप' ला आणि वाहिनी आणि लाडक्या
पुतण्यांना पण सुखात ठेव.
जेवढ लाभेलं तेवढ आयुष्य सुखा-समाधानाचं जावो......
खुश रहा.....हसत रहा.....काळजी घे दादा..!

मी पहायचो तुला लपून..

मी पहायचो तुला लपून..
हे तु ही एकदा पाहीलेलं...
झाली होती एकदा आपली नजर भेट...
तेव्हाच डोळ्यात तुझ्या माझं प्रतिबिंब पाहीलेलं.



दाटलेले ढग बरसुन गेले कधीचे...
ओठातील शब्द मात्र अजून स्तब्ध तसेच...
त्यांना ही आता एकदा बरसुन जाऊ दे....
पुन्हा एकदा मग गारवा दाटेल तसाच..

शब्द गालावरल्या खळ्या खुलणाऱ्या

शब्द नित ऋतू बदलाचा
शब्द कधी 'ठग' असतात
काळ्या,निळ्या शाईने भरलेले
पांढऱ्या आकाशातील 'ढग' असतात

शब्द गोठता गारवा कधी
शब्द कधी पेटती 'धग' असतात
पांघरून घेतलेल्या मनावर
पाळत ठेवणारे 'खग' असतात

शब्द कधी कळ्या उमलणाऱ्या
शब्द गालावरल्या खळ्या खुलणाऱ्या
शब्द कधी भर भरून देणाऱ्या
शब्द कधी होती झोळ्या मागणाऱ्या

शब्द कधी डोंगरातला, दरीतला
शब्द कधी त्या उपाशी शिदोरीतला
शब्द कधी आजचा,आताचा
शब्द कधी स्वप्नातल्या परीतला

शब्द कधी मोकळा,बांधलेला
शब्द ठिपका रेषेत मांडलेला
शब्द कधी एक धडपड मनाची
शब्द कधी ताठ उभा राहलेला

शब्द कधी शेवटीही एक सुरवात असतात
शब्द विजयाच्या धुंदीत दिलेली मात असतात
शब्द कधी कधी तुझ्या माझ्यात असतात
शब्द कधी मन मोकळे कधी मौनात असतात

भूक लागली म्हणून हाताने ताटातला घास घ्यावा ,

तुझ्या मोहक हास्यामध्ये
माझे मीपण हरवून बसलो
मला न माहित कधी न कळले
कसा कुठे न केंव्हा फसलो !!!!



भूक लागली म्हणून हाताने
ताटातला घास घ्यावा ,
तोंडापर्यंत न्यावा ..आणि
तेंव्हाच त्या घासाने तोंडाला सांगाव...
..हिची भूक हि नाहीय..
तिला काय हवंय,
ते तिच्या डोळ्यांना विचार .
कुणासाठी वाहताहेत ,
ते त्या अश्रूंना विचार !
वाट पाहताहेत कुणाची ,
ते त्या थांबलेल्या
श्वासांना विचार....
कुणी ठेवलंय उनात
ते त्या कोमेजलेल्या मनाला विचार!
उत्तर मिळालं कि मला सांग,
म्हणाला तो घास .
आणि मग त्यानेही
रोखून ठेवला ...
ताटातला तो श्वास !!!!!

भूक लागली म्हणून हाताने

भूक लागली म्हणून हाताने
ताटातला घास घ्यावा ,
तोंडापर्यंत न्यावा ..आणि
तेंव्हाच त्या घासाने तोंडाला सांगाव...
..हिची भूक हि नाहीय..
तिला काय हवंय,
ते तिच्या डोळ्यांना विचार .
कुणासाठी वाहताहेत ,
ते त्या अश्रूंना विचार !
वाट पाहताहेत कुणाची ,
ते त्या थांबलेल्या
श्वासांना विचार....
कुणी ठेवलंय उनात
ते त्या कोमेजलेल्या मनाला विचार!
उत्तर मिळालं कि मला सांग,
म्हणाला तो घास .
आणि मग त्यानेही
रोखून ठेवला ...
ताटातला तो श्वास !!!!!

तू अशी हसलीस कि

पुन्हा पुन्हा भेटण्याची
इच्छा मलाही होते
आठवणींच्या गावात
एक फेरी माझीही होते



तू अशी हसलीस कि सखे
काळजाचा एक ठोका चुकतो
सावरण्याचा करतो प्रयत्न ...
तुला पाहण्याचा मोका हुकतो....



मावळतीचा सूर्यही
जेव्हा प्रेमरंगी रंगतो
नाद तुझ्या आठवांचा
हळूच कानी गुंजतो

एकदा तू रुसलेली माझ्यावर,

एकदा तू रुसलेली माझ्यावर,
मी तुझ्या कविता केल्या नाही म्हणून...
आता प्रत्येक शब्द सजतोय...
दोघे आठवणीत मी भिजतोय म्हणून.... :'(




भेटतेस ना सखे तू
आठवणीत पुन्हा पुन्हा
मिलनाची आसही कशी
जागते पुन्हा पुन्हा .....






शब्दांसही ठावूक आहे
कुठे अन कसे बोलावे
भाव मनाचे दडलेले
कुणा सांगावे अन
कुणापासून लपवावे .............



पुढारयाचा जन्म घ्या
आणि आणखी पुढे जा
पोटभरून खाल्यावर
गरीबाच पोटतोडून खा

बेभान रसाळ तारुण्य

बेभान रसाळ तारुण्य
जेव्हा मन कशालाच,भीत नाही,
मानत जे कोणतीच,रीत नाही;
सगळ्याच ग...ोष्टी जेव्हा,वाटतात नगण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

जेव्हां हर ऋतू,रोमांचच खडावतो,
गर्मितही काटवून,थंडी वेडावतो;
जेव्हां बगीचा वाटतं,अभय अरण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

जेव्हां कोणत्या नवीनच,बीजाला फुटतं रोप,
आणि रात्रं जागवून,दिवसा येते झोप;
जिथे दिसतं कुरुपतेतही,रुपेरी लावण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

जेव्हां रहावसं वाटतं,मनाशीच एकाकी,
सुकल्या त्वचेलाही,चढते लकाकी;
जेव्हां हर पापच,वाटतं मोठ पुण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

जे हर्णावतं बागडून,पूर्व असलं पाडस,
सगळ्या स्तिथीत,जेव्हां शुरावतं धाडस;
चुकीचीच वाट वाटते,ओळख-जाण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

जे दव असूनही भासत,पळस पांनी काच थेंब,
चंचलून निसटतं,न थाम्बता जेम तेम;
आयुष्य स्तिथीत जे,सर्वात परमाग्रगण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

जे कितीही वाटलं तरी,जड करणं जतन,
कोणत्याही नाजूक क्षणी,उतवतं पतन;
घडलेल्या गोड गुन्ह्यास,सदैव अजाण्य ;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

जेव्हां अंगी बहरतो,सुगंधून मधु मास,
एक अधर स्पर्शही,वेडावतो मिलन-आस;
अंगी हर बहरत्या,शहार्ण्याचही नाविण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

ज्या अवस्थी निसर्गही,ओतून टाकतो सर्व रंग,
इंद्रधनुष्यी रंगून,खुलवून टाकतो टप्पोरून अंग;
सर्व जीवनावस्थेत ज्याला,सर्वगुणी प्राविण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

जेव्हां रहावसं वाटतं,मनाशीच एकाकी,

जेव्हां रहावसं वाटतं,मनाशीच एकाकी,
सुकल्या त्वचेलाही,चढते लकाकी;
जेव्हां हर पापच,वाटतं मोठ पुण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य ||

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा
हसत हसत तू काबुल कर
तुझ्यामध्ये आहेत ज्या जाणीवा
ओरडून ओरडून त्यांना जागं कर !!!!!!

झोपलं आहे तुझं जे भाग्य
डोळ्यांवर पाणी ओत खडबडून त्याला जागं कर
हेवा असेल प्रत्येक मनी तुझा
शत्रूवरही जगावेगळं प्रेम तू कर!!!!!!!

जर दिलासा शब्द तू कुणाला
त्या शब्दांचा तू आदर कर
शास्त्रशास्त्र पारंगत असलास जरी तू
तुझ्या अमोघ शब्दांनीच शत्रूला तू पराजित कर !!!!!

असेल जीवन तुझे वादळ वाऱ्यापरी
असेल जीवनी तुझ्या दु:ख आभाळाएवढं
असेल आयुष्य तुझं सदा संघर्षमय
जीवन इतरांचं मात्र प्रकाशित कर

स्वप्न पुर्ण झालं नाही

स्वप्न पुर्ण झालं नाही
तर रडायचं नसतं...
रंग उडाले म्हणुन
चित्र फाडायचं नसतं....
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसतं.....
आपल्या दुःखात (कदाचित)
दुसऱ्याच सुख असतं.




बा॓लताना जरा सांभाळून
शब्दाला तलवारीप॓क् षा धार असत॓,
फरक फक्त एवढाच की,
तलवारीन॓ मान तर,
शब्दांनी मन कापल॓ जात॓
जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त
आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू
य॓त असल॓ तरी,
दा॓घांपासू न होणारी व॓दना मात्र सारखी असत॓

सहज एक दिवस विचारल तिला

सहज एक दिवस विचारल तिला
सखे मी तुला काय आणु ?
थोडीशी फुल,थोडेसे मोती
आणि चांदण आण ओंजळ्भरून

मनात म्हणालो स्वतालाच
प्रेम भलतच महाग असत
जमल तर वार्याची झुळुक
नाहीतर जाळणारी आग असत

ओंजळभरून फुल
एक दिवस तिला नेउन दिली
काय सांगू आनंदाने
सखी मझी हरकून गेली

आज फुल दिली
उद्या मोती देइल
ओंजळ्भरून चांदण
माझ्यासाठी घेउन येइल

शेवटी एक दिवस सांगितल तिला
चांदण तर खूप दूर आहे
मी तुला मोतीही देउ शकत नाही
तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून
पूर्ण होउ शकत नाही

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आल
माझ चांदण माझ्या समोर
रीमझीम रीमझीम बरसून गेल

किती रे वेडा आहेस तू
प्रेम कधी काही मागत का?
प्रेमाला प्रेमाशिवाय
दुसर कधीकाही लागत का?

स्वतालाच विसरून स्वतालाच
प्रेम म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम अस गाण असत
मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का?

वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेछ्या

वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेछ्या

गारठलेल धुकं, कोकिळेचे गाणे,
सर्वत्र हिरवळ , वाऱ्याचे बहाणे ,
फुललेला गुलमोहर सोबती स्वप्नांचा मळा,
एक टवटवीत दिवस आणि मायेचा लळा.......

तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला ......

सर्व ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख मनस्वी शुभेच्छ्या

वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेछ्या

वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेछ्या

गारठलेल धुकं, कोकिळेचे गाणे,
सर्वत्र हिरवळ , वाऱ्याचे बहाणे ,
फुललेला गुलमोहर सोबती स्वप्नांचा मळा,
एक टवटवीत दिवस आणि मायेचा लळा.......

तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला ......

सर्व ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख मनस्वी शुभेच्छ्या

जीवनाच्या प्रवाहात

जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसे भेटतात ,
काही आपल्याला साथ देतात,
काही सोडून जातात .............
काही २ पावलेच चालतात ,
आणि कायमची लक्षात राहतात .
काही साथ देण्याची हमी देतात ,
गर्दीत हरवून जातात .................
नाती जपता -जपता तुटणार ,
नवीन नाती जुळत राहणार ,
आयुष्य म्हटले तर ,
हा प्रवाह असाच चालत राहणार ...............
पण ,कुणी दूर गेले तर ,
जगणेही थांबवता एत नाही
कारण या अथांग सागरात ,
एकटे पोहता हि येत नाही
आमोल घायाळ

स्पर्श तुझा हवा हवासा..

नकोत मला ती बुळचट स्वप्नं
सत्य मी स्वीकारतो
तुझ्या प्रेमावाचून जगण्याला
हसत मुखाने कवटाळतो...


स्पर्श तुझा हवा हवासा..
तरी होता का तो दुरावा.
तू माझ्या समोर होतीस...
अन तोच क्षण जीवन भर पुरावा...



नाजूक नार उभी अशी...
कमरेत लचक भरेल गं....
चेहऱ्या वरच हसू तुझ्या...
कुणाला तरी घायाळ करेल गं...

कवेत तुझ्या मी आलो...

कवेत तुझ्या मी आलो...
अन स्वतः विसरून गेलो ...
तू मिठी घट्ट करताच..
तुझ्यात सामावून गेलो...


आयुष्य थोड असाव पण आपल्या माणसाला ओढ़ लावणार असाव
आयुष्य थोड जगाव पण जन्मोजन्मी प्रेम मिलाव,
प्रेम अस द्याव की घेण्याची ओंजल अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी ह्रुदयात नित्य प्रेम जागवानरी असावी
दोरी तुटताना रेशिमगात सुतल्याची जाणीव व्हावी

तू न्हवतास जवळ तेंव्हा

तू न्हवतास जवळ तेंव्हा
सोबतीला माझ्या आभाळ होतं
भरलेलं असलं म्हणून
काय झालं ,
आपलं त्यात गाव होतं !

तू न्हवतास जवळ तेंव्हा
मनात तयार घर होतं
रिकामंअसलं म्हणून
काय झालं ,
त्यावर तुझंच तर नाव होतं !

तू न्हवतास जवळ तेंव्हा
डोळ्यात एक स्वप्न होतं
पुसट असलं म्हणून
काय झालं,
ते तुझंच तर चित्र होतं !

तू न्हवतास जवळ तेंव्हा
जवळ एक गीत होतं
समजत नसलं म्हणून
काय झालं ,
ते तुझ्यासाठीच तर गात होतं !

तू न्हवतास जवळ तेंव्हा
रात्रीला एक भय होतं ,
पौर्णिमा असली म्हणून
काय झालं ,
चांदणं तर.. चंद्राजवळ होतं !

Friday, October 14, 2011

एक खरी प्रेम कथा...

एक खरी प्रेम
कथा...
एक मुलगा आणि मुलगी मोटारसायकल वरून
जात होते,
मुलगा खूप वेगाने मोटारसायकल चालवत
... ... होता,
मुलगी घाबरली तिने त्याला हळू
चालवायला सांगितले.
मुलगा : मला आई लव यु बोल...
मुलगी : आई लव यु, आता तरी हळू चालव.
मुलगा : आता मला घट्ट मिठी मार...
मुलीने त्याला घट्ट
मिठी मारली आणि म्हणाली आता तरी हळू
चालव.
मुलगा तिला बोलला कि आता माझे
Helmet काढ आणि ते तू घाल.
मुलीने ते Helmet घातले
आणि त्याला मोटारसायकल हळू
चालवायला सांगितले.
दुसरा दिवशी पेपरात
बातमी आली कि तो मुलगा अपघातात मरण
पावला पण ती मुलगी Helmet मुळे
काहीहि इजा न होता वाचली..
कारण त्याला माहित होते
कि मोटारसायकलचा Break fail
झाला होता....

चिंब पावसात भिजत होते.......

चिंब पावसात भिजत होते........भिजताना क्षण क्षण तुलाच आठवत होते....तू येणार नाहीस हे,मन जानातही होते.....तरीही नयनांचे मन,तुलाच शोधत होते....चिंब पावसात भिजताना,एक मात्र बरे असते...तुझ्या आठवणीतल्या आसवांना,कोणीच ओळखत नसते....चिंब चिंब भिजताना,तुझी सोबत हवी-हवीशी वाटते...तुझ्या शिवाय जगताना,मला जगणेच उमगत नसते.

प्रेम .. म्हणजे जीवनातील एक सुंदर

प्रेम ..
म्हणजे जीवनातील एक सुंदर
अनुभव प्रत्येक जण कळत
अथवा नकळत प्रेम करतोच .
पण समझा तुम्ही प्रेम करत
असलेली व्यक्ती तुम्हाला हवा तसा प्रतिसाद
देत नाही ..
हे तुम्हाला कळून
चुकलाय ..तरी सुद्धा तुम्ही समोरच्या व्यक्तीवर
पूर्वी इतकच प्रेम कराल
का ???

चंद्र हि झोपला तारे हि झोपले,

चंद्र हि झोपला
तारे हि झोपले,
झोपले सारे आभाळ,
आभाळाची त्या चादर घेऊन,
झोपले बाग ते शहाणे बाळ...

शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना

आजचा दिवस आनंदाचा आणि मौज मस्तीचा जावो ही सदिच्छा..!!

आजचा दिवस आनंदाचा आणि मौज मस्तीचा जावो ही सदिच्छा..!!

सकाळच्या प्रहरात मैत्रीची आठवण
मनोमनी होते आपलेपणाची साठवण,
सूर्यकिरणांची प्रभा खऱ्या नात्यावर
करतात मैत्रिमय जाणिवेची पाठवण..!!

आनंदाचा दिवस आज खास आहे माझ्या मैत्रिणीचा बर्थ डे,

आनंदाचा दिवस आज खास
आहे माझ्या मैत्रिणीचा बर्थ डे,
खूप दिवसापासून मनात आस
आज आलाय खरा हा हैप्पी डे..!!

ऑर्कुटची ओळख जुनी आमची
गावही आहे गावा जवळचं,
नात मग लहान-मोठ्या बहिणीच
सहजीच झालं मना जवळचं..!!

वाटतो मायेचा आधार मला
ताई कमी भरून निघाली,
खूप इच्छा होती मोठ्या ताई ची
ने पूर्ण झाली..!!

प्रार्थना बाप्पाला आयुष्य लाभो ताई ला
सुखाची सकाळ रोजचं तिच्या जीवनी,
मायेची उब अशी सतत तेवत राहू देत
गोडचं असावी तिच्या आयुष्याची कहाणी..!!

विसरणार नाहीस कधी तरीही सांगतो
गरज आहे तुझी कायम ह्या भावाला,
झळाळी जशी जीवनात येईल तुझ्या
नव्हाळी चढत राहूदेत आपल्या नात्याला..!!

प्रेम अस द्याव की घेण्याची ओंजल अपुरी पडावी,

आयुष्य थोड असाव पण आपल्या माणसाला ओढ़ लावणार असाव
आयुष्य थोड जगाव पण जन्मोजन्मी प्रेम मिलाव,
प्रेम अस द्याव की घेण्याची ओंजल अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी ह्रुदयात नित्य प्रेम जागवानरी असावी
दोरी तुटताना रेशिमगात सुतल्याची जाणीव व्हावी

मिठीत मी अन तू... विसरून जाऊ स्वतःला...

मिठीत मी अन तू...
विसरून जाऊ स्वतःला...
जग माझे मिठीत तुझ्या...
अन तूझे विचार तुझ्या मनाला...



गजरा जळून गेला.....

तो चेहरा तेथे हलकेच वळून गेला
मैफिलीत त्या नजरा खिळून गेला

बदलत्या स्पंदनांचा अहवाल काय देऊ
हातातला सुंगंधी गजरा जळून गेला

त्या मृग नयनी काजळात कैफ होती
काळजात भोळ्या,प्राण तळमळून गेला

चालता ऐसी,कटेवर नदी वळून जावी
भिजल्या जख्मांचा पहा बहर झडून गेला

भिरभिरत्या पापण्या स्पर्शत्या दिशांना
शब्द स्वातंत्र्य मागणारा ओठात जळून गेला

चांदनित गुंतल्या मना,आकाश ठेंगणे होते
हिरमुसला चंद्र तो, पहा क्षणात ढळून गेला

हृदयात ठासून चित्र ते झिंगतो मी निजेत
सत्यातल्या नशेचा शीण स्वप्नात पळून गेला

आज कुठे मी हरविलो आहे...*

आज जगायचे आहे मला...
तुझ्या आठवणींना जागवत...
तूझ्या विना जगून बघतो...
तुझ्या आठवणींना आठवत...


आज कुठे मी हरविलो आहे...*

वास्तवात असूनही आज
मन स्वप्नं गुंफित आहे,
न जाणे वेड्या मनासवे
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

शब्दांचा अर्थ शोधतांना
शब्दच आज विरत आहे,
बेलगाम मनाला आवरता
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

ग्रीष्मातल्या प्रहरी
आज मेघ बरसत आहे,
मन चिंब भिजले असतांना
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

आज वाटाड्या वाटेला
वाट दाखवीत आहे,
मनाला मार्ग दाखवीतांना
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

उत्तरालाही आज प्रश्नांनी
ग्रासून सोडलं आहे,
मनाचे प्रश्नचिन्ह सोडवितांना
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

मेघाचा पहिला पाऊस
धरणीची तहान भागवित आहे,
मनाची तहान शमावितांना
न जाणे आज मी कुठे हरविलो आहे...

दिशाही तूच,ध्यासही तूच माझ्या
प्रत्येक शब्दात तुझेच अस्तित्व आहे,
कदाचित तुलाही असच वाटत असेल
" न जाणे आज मी कुठे हरविलो आहे..."

कवेत तुझ्या मी आलो... अन स्वतः विसरून गेलो ...

कवेत तुझ्या मी आलो...
अन स्वतः विसरून गेलो ...
तू मिठी घट्ट करताच..
तुझ्यात सामावून गेलो...[[[


नको, नको दावू वाकुल्या जीवनाsss
जिद्द हाये उरी,जरी मोडका कणाsss

लागे लागे तू पुढ पुढ चालला
कवा झाला मुका कवा बोलला
डोये वटारुनी धाक दावू नको
जीव वाटे तुले हातचा बाहुला
सुख धाडून,परती घे दुखाचा पाहुणाsss
नको ,नको दावू वाकुल्या जीवना sss

धड झिजवुनी म्या गड राखला
नया बदलाचा गावेना दाखला
दिस पालटून जावू दे रे माये
धाय मोकळून अता गया सोकला
आज घामा घामाचा,हिशेब होवू दे जुना sss
नको ,नको दावू वाकुल्या जीवना sss

ढेकला ढेकलात तू मुरला
पोटा लपवून घास चोराला
पैका तयनी जसा बुड बुड्यावाणी
एका सदरयात जन्म झाकला
दम लागते आता,सोबती तू चालनाsss
नको,नको दावू वाकुल्या जीवनाsss

एखाद्याला जर अंधार पहायची सवय असेल

एखाद्याला जर अंधार पहायची सवय असेल तर त्याला लख्ख प्रकाशातही अंधारच दिसतो...

डोळेबंद करून परिस्थितीला टाळण्या पेक्षा उघड्या डोळ्याने स्वतःची अधोगती पाहणे कधी हि चांगले ..

किती हि दुःख असो पण चेहऱ्या वर नेहमी स्मित असावे म्हणजे दुःख बोध राहात नाही ...

राग मनात ठेवून वागल्याने स्वतःला त्रास होतो म्हणून ज्याच्या वेदना त्यालाच द्याव्या....

नको जावूस त्या क्षणात

नको जावूस
त्या क्षणात
राहू दे त्यास सख्ये
आठवणीच्या कप्प्यात


जगतोय
दमतोय
शीणतोय
रेटतोय....
पाहतोय
हळहळतोय
रडतोय
पुसतोय...
बोलतोय
ऐकतोय
मुकतोय
बरसतोय...
लिहितोय
वाचतोय
धरतोय
सोडतोय...
आयुष्य
जगणे
मरणे
मुक्ती...

छंद जडवा तुज नसे नवे त्यात काही

चंद्राचे काम छळण्याचे
तुझी आठव देवून
चांदण्या सवे सख्ये
ह्या पामराची मजा पाहण्याचे


छंद जडवा तुज
नसे नवे त्यात काही
निरखुनि पहा रातीचा अस्मान
ते चंद्र तारे तुलाच पाही


तेच हास्य माझ
काळीज चिरत
चंद्र तो भोळाभाबडा त्याची
नजर तुलाच शोधात फिरते



किती ना रे खोल
या सागराचा तळ
त्याला मी म्हंटल ,
तू हो ना थोडा उथळ !

टाकून तुझ्यात गळ मला
पाहायचाय तुझं मन .
दडी मारून बसलंय,
त्याच्यात माझही मन !

पाहू दे रे भरतीत मला
तुझं माझ्यावरचं प्रेम ;
ओहोटीवेळी पाझरणारे
ते डोळ्यातील थेंब !

घेऊ दे रे खारट तुझ्या
मला आसवांची चव ;
त्यातूनच कळेल मला
तुझी माझ्याकडची ओढ !

करू दे ना भावनांची
तुझ्या मला सफर ;
आठवण ठेवीन त्याची मी
प्रहर आणि प्रहर !!!!!!!!!!!

क्षणाचाही विलंब न करता मी बोलून टाकले,

क्षणाचाही विलंब न करता मी बोलून टाकले,
काळजात धकधक होतीच...तरीही...
तशी ती शांतच होती... मला वाटणारे भय त्यामुळे थोडेसे शिथिल झाले...
एकीकडे मन मोकळे केल्याचे सुख तर एकीकडे पुढे काय हा प्रश्न...
तिच्यामधून स्वतःला दूर करायचे असे स्वतःला सतत समजावयाचे....
आणि तिच्याबरोबर असताना, बोलताना आणि नसतानाही तिच्यातच गुंतून पडायचे...
कदाचित ह्यालाच प्रेमाची करून सीमा म्हणतात, कदाचित.. बावरा मन समझ न पाये, प्रेम कि आहट गीत में गुनगुनाये...
ऐसे मोहे राधे कि प्यास, कैसे बुझाऊ मेरे श्याम रे....



हृदयाचा ठोका चुकतो
मनात एक भाव दाटतो
हळूच गालात हसतो
तेच भाव शब्दात मांडतो



चंद्र हि माझ्यावर रागवतो
का तुझ्या सख्येला माझी उपमा देतो
गुपित हे आज माझे मांडतो
तुझ्या पियेला पाहून आजकाल मी हि कविता करतो

लव्ह मॅरेज असो की अरेंज

लव्ह मॅरेज असो की अरेंज.. लग्नावेळी मुलाकडून अनेक अपेक्षा ठेवल्या जातात. मुलगी मिळवती असली तरी घर, नोकरी, गाडी अशा गरजाही मुलानेच पूर्ण करण्याची

पद्धत आजही दिसतेय. संसार दोघांचा असेल तर, मुलींनी या पारंपरिक अपेक्षांवर एकदा नक्कीच विचार करायला हवाय.

नम्रता वय वर्षं २० आणि आदित्य वय वर्षं २२ फक्त... दोघंही एकमेकांसाठी प्रेमात वेडी झालेली. समजून उमजून वागणाऱ्या कपलमध्ये फक्त गफलत होत होती ती अपेक्षांमध्ये... विशेषत: नम्रताकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांमध्ये. स्वत:चं घर, शक्य असल्यास एकुलता एक, उत्तम मासिक उत्पन्न या लग्नापूवीर्च्या बेसिक अपेक्षा मुलाकडून केल्या जातात. त्या सगळ्याच पूर्ण करण्याचा तो परोपरीनं प्रयत्नही करत असतो. आदित्यचीही अशाच प्रकारची ओढाताण होत होती. आदित्यनं नोकरीच्या ठिकाणाच्या जवळच वन बीएचकेचा ब्लॉक घेतलेला. स्वत:च्या जिवावर... पण त्यानं थोडं लांब घर घेतलं असतं तरी चाललं असतं. ब्लॉक थोडा मोठा मिळाला असता. ही तिची तक्रार.

लग्न व्हायच्या आत त्याचं सेटल होणं मुलींच्या पालकांबरोबरच तिलाही गरजेचं वाटत होतं. समवयस्क असल्याने प्रगतीचा आलेख एकाच रांगेने जाणं साहजिक आहे. मात्र केवळ तो मुलगा आहे म्हणून त्याचं सेटल होणं गरजेचंच आहे असं तिचंही मत होतं.

- काही पारंपरिक अपेक्षा

दरवेळी मुलांनीच आधी घर घेऊन ठेवायचं. त्यांनी लग्नाआधीपासूनच सेटल असलं पाहिजे हा अट्टाहास ठेवणं खरंच कितपत योग्य आहे? मुलीही तितक्याच कमावतात. क्वचितप्रसंगी मुलांपेक्षा जास्तही. मग मुलींनीही घराच्या उभारणीसाठी हातभार लावला आणि त्या घराला 'त्याचं' न ठेवता 'आपलं' म्हटलं, तर बिघडलं कुठे? अर्थात, मुलाच्या वाडवडिलाजिर्त घरातच राहाण्याची तिची तयारी असेल, तर काहीच प्रश्न नाही. मात्र, वेगळं राहायचं ठरवलं असेल, तर तेवढाच पगार स्वत: मिळवत असतानाही घर केवळ त्याचंच असावं ही अपेक्षा असायलाच हवी का?

- 'गर्ल कॅन ऑल्सो बी ए मॅन इन द फॅमिली' असंही असू शकतंच की. स्वत: ठामपणे निर्णय घेण्याची क्षमता असलेली एखादी मुलगी नवऱ्याच्या घरच्यांना सांभाळूनही महत्त्वाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडू शकतेच की. मात्र, आपणहून घेतलेल्या निर्णयांना नवऱ्याचा पाठिंबा असावा, (अगदी पूवीर् बाबा देत असत तसा) अशी अपेक्षा मुली ठेवत असतील, तर अर्थातच त्यात काही गैर नाही. फक्त हे मुलांनीही समजून घ्यायला हवं.

- मुली किंवा मुलंही जर लवकर कमिटेड स्टेटसमध्ये आली, तर अनेकदा हे अडथळे जाणवतात. किंवा मग मुला-मुलीच्या वयातलं अंतर कमी असेल, तरी त्यांना अडचणी सोडवताना त्रास होऊ शकतो. एकमेकांना अभ्यास, करिअरमधली स्टॅबिलिटी या सगळ्या व्यापात वेळ देणं कठीण होऊन बसतं आणि अगदीच छोट्या-मोठ्या कारणांवरूनही क्वचितप्रसंगी भांडणं व्हायला लागतात.

प्रत्येकाचं रिलेशनशिप स्टेटस वेगळं असतं. तरीही मुलांकडूनच अनेकदा बक्कळ अपेक्षा ठेवल्या जातात. कोणत्याही क्षेत्रात मुली जेव्हा मुलगी म्हणून मला वेगळा न्याय लावता कामा नये असं म्हणतात तीच बाजू संसारात मात्र, तशीच ठेवायला त्यांची ना असते (अर्थातच, अपवाद वगळता). गाडी त्यानं खरेदी करायची. घरंही त्याचंच हवं. कापड खरेदी त्याच्या पैशानं हवी. यापेक्षा दोघांचा एकत्र संसार आहे, या विचारातून अनेक गोष्टी सहज सोप्या होत जातील, नाही का?

तु कविता झालीस तर... मला ही आवडेल तुझी ओळ व्हायला...

तु कविता झालीस तर...
मला ही आवडेल तुझी ओळ व्हायला...
तुझ्यात गुंतून मग..
नव नव शब्दांची माळ ओवायला..


माझ्या प्रत्येक शब्दाला...
तुझीच ओढ आहे..
माझ्या प्रत्येक ओळीला..
तुझ्या आठवणींची जोड आहे.

कोई प्यार से बुलाये तो हम भी हाजीर है

कोई प्यार से बुलाये तो हम भी हाजीर है
पर कम्बख्त आज कल कोई याद करता हि नाही
लगता है market मे भूलने का trend काफी प्रचलित है ..

क्यू कोई चला जाता है हँसाने के बाद

क्यू कोई चला जाता है हँसाने के बाद
क्यू आंखे नम होती है उसके जाने के बाद
सिर्फ एक बार देखले मुड़कर जाते हुए
यही ख्वाइश होती है बिछड़ने ने बाद..

जन्म माझा कशासाठी याचा अर्थ अजून हि गुपित

वेदनेला कस कळतं
कुणासाठी ठसायचय?
का तिलाही असं वाटतं
आठवण जपायचीय!



जन्म माझा कशासाठी
याचा अर्थ अजून हि गुपित
भोतिक सुखात रमलेला
असा मी एक शापित



जगाव तर ......किती प्रश्नांनी उभा रहाव ??
ताठ मानेने जगाव कि मान झुकवूनी रहाव
ताठ मानेने जगाव तर समाजाच्या विरोधात जाव
मान झुकून जगाव तर समाजाच्या ताटा खालच मांजर व्हाव

एक प्रश्न सुटाव तर .... दुसऱ्या प्रश्नाने का म्हणून उठाव
विरोध पत्करून जगाव कि विरोध करत जगाव
विरोध पत्करून जगाव तर समाजाच्या मनात भराव
विरोध करत जगाव तर स्वताच्याच मनातून उतरावं

प्रश्नांनी प्रश्न बनूनच का रहाव .....कधी तरी हे प्रश्न सुटाव
प्रश्न सोडवावं कि प्रश्नांना तसच राहून द्याव
प्रश्नांना सोडवावं तर दुसऱ्या प्रश्नाची निर्मित व्हाव
प्रश्नांना तसच राहून द्याव तर आपणच आपली असमर्थतता दर्शाव

का मी असा विचार कराव .... सार काही नशीब वर सोडाव ?
नशिबावर सोडाव तर .. आपणच हीन ठराव
नशिबास उत्तर द्याव .... आपल नशीब दीन ठराव

आज पाऊस बेभान बरसला.

प्रेम करताना
वासना भडकली
अन ...प्रेमाला कालिक
पोसून गेली



आज पुन्हा आभाळ
अतोनात भरून आलंय
कसले हे उफळलय दुख
काय त्यास झालंय
आज पुन्हा बेभान
धारेवर बरसणार
पुन्हा अश्रुंचे थेंब
चिंब चिंब भिजवणार ..................



कधी कधी तुला सोडून जाव असे वाटत
पण पाऊल पुढे टाकताच
मन मागे वळून बघतो..


आज पाऊस बेभान बरसला...
प्रत्येक थेंब मला तरसावून गेला...
त्याच्या स्पर्शात होती आठवण तुझीच...
जाता जाता जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला...

धावणारे ते क्षण कधीतरी थांबावे

धावणारे ते क्षण
कधीतरी थांबावे
मागे वळून त्याने ..अलगद
त्याने तुला माझी आठवण करून द्यावे



आसमंत आज दरवळला
मनोसक्त आज बरसला
निचेत ह्या मनास सख्ये
आज पुन्हा बहरून गेला


सुखाचा धावा घेतला
दुखणं मनाशी कवटाळून
रडताना वेचले फुल सुखाची
हसत्ना काटे पडले दाराशी

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

का माणसाला प्रत्येक क्षणात कुणाची तरी जराच असते ?

का माणसाला प्रत्येक क्षणात कुणाची तरी जराच असते ?
का सावली पडायला प्रकाशाची साथ लागते ?
का चंद्राला चांदणी इतक प्रेम करते ?
दिवसा मग रात्री चा खेळ कसा चालतो ?
असे का होते का कुणाची तरी साथ भासते ???



धन्य माणू ह्या
धरतीवर जन्म माझा
कि मान्य करू
शुद्र सहभाग ह्या समाजाचा




उफराटे हिशोब माझे
कोणाला कळले होते
मन ओले होते माझे
अन् म्हणून जळले होते

मी वजा जमेतून होतो
अन्‌ जमा वजेस्तव होतो
हे गणित समजले तेंव्हा
आयुष्य निवळले होते

नवनीत सुखाचे आले
शब्दांच्या पात्रांवरती
मी आईच्या हातांनी
बघ दुःख घुसळले होते

जगण्याच्या पानावरती
स्वप्नांशी जमल्या गप्पा
मग मुहूर्त मरणाचेही
कंटाळून टळले होते

दुसर्‍या दिवशी दुःखांचा
बघ वासही आला नाही
नयनांचे पेले माझ्या
रात्रीच विसळले होते

कधी बोललो मी उशीरा उशीरा, कधी दान पडले उशीरा उशीरा

कधी बोललो मी उशीरा उशीरा, कधी दान पडले उशीरा उशीरा
आयुष्य अवघे चुकामुक आहे, मला हे समजले उशीरा उशीरा

मला मागते ती दटावून आता, तिचे चित्र माझ्या खिशाआतले ते
तिने पहिले हे तिचे श्रेय नाही, जरा मी लपवले उशीरा उशीरा !!

जिवा गुंतवू पाहिले मी अवेळी, नको त्या स्थळी अन नको त्या प्रसंगी
तिला सर्व वेळीच लक्षात आले, मला फार कळले उशीरा उशीरा

अता प्राक्तनाचा उजाडेल तारा, किती जागुनी वाट मी पाहताहे
कधी ना कळे नीज लागून गेली, सितारे झळकले उशीरा उशीरा

किती पाहिली स्वप्न मी बेईमानी, अता खेदखंती कराव्या कशाला?
मला सत्य आधीच ठाऊक होते, पुरावे गवसले उशीरा उशीरा !

गड्या, जिंदगी हाय जमलीच नाही, तिला मी-मला ती उमगलीच नाही
जिण्याचा कधी पीळ गेलाच नाही जरी दोर जळले उशीरा उशीरा !!

मुलींशी तसं माझं कधीच पटलं नाही ;

मुलींशी तसं माझं कधीच पटलं नाही
;
;
पटवून घेन त्यांच्याशी मनाला गठलं नाही
.
.
हृदय प्रेमात पडतं म्हणे आणि तुटतही....
.
.
माझ्या हृदया साधं कधी खरचटलं सुद्धा नाही

जा जा जा दिले दिले मन तुला

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…॥धृ॥

फुल मनाचे खुडून…दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ पिकल्या फुलांना..देठ पिकल्या फुलांना…देठ पिकल्या फुलांना..
भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥१॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

तुला द्यावे मन.. असे काही कारण नव्हते…
एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..
पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..
ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥२॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही..वाटे आश्चर्य सखेद
मला एक मन भारी..मला एक मन भारी..मला एक मन भारी..
तुला दोन्ही जड नाही..
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही… ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही… दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही…

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...(५)

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...(६)

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...(९)

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....

वजा केले आयुष्य माझे

वजा केले आयुष्य माझे
सुख दिसणार नाही
मांडलेच दुःख माझे
बाकी उरणार नाही...


चारोलीतच मज भाव
मनाचे मांडता येतात
त्यापुढे जाताच ते
शब्दही आपसूक अडतात



भग्न अवस्थेत मी वावरतोय
नग्न समाजाची प्रथा राबवतोय
सर्व काही कळून हि
बस बघ्याची भूमिका बजावतोय

आभाळाच्या दारावर एकदा टक टक कुणीतरी केली

आभाळाच्या दारावर एकदा
टक टक कुणीतरी केली
दार उघडून पाहिलं
तेंव्हा दारात फुलं
त्याने पाहिली.

पांढरी शुभ्र फुलं सगळी
का गोळा झाली ?
काय काम असेल त्यांचं
म्हणून वर्षाही आली .
फुलं म्हणाली मग त्याला ,..
रंग पेरून तुम्ही देवांनी
सृष्टी केलीय हिरवी ;
का मग आम्ही फुलेच
राहू फक्त पांढरी?

विचार थोडा करून मग
वर्षा त्यांना बोलली ,
जाऊन झोपा आता तुमची
इच्छा होईल पुरी !
पण ठेवा लक्षात, उद्या
पहाटे रंग येतील दारी;
रंगतील रंगात तीच फुले
जागी असतील जी कुणी.
राहतील तशीच पांढरी जी
ऐकणार नाहीत कुणी !

पटून म्हणण तिचं सारी
फुल गेली झोपून
उठायचय पहाटे रंगासाठी
हे मनाशी ठरवून .
एवढ ठरवून मनी सुद्धा
कांही राहिली झोपून
उठून पाहिलं त्यांनी तेंव्हा
कांही रंगात बसली होती नटून.

कळली त्यांना चूक त्यांची
पण वेळ गेली निघून
म्हणूनच मोगरा ,जाई-जुई
राहिल्या पांढरयाच रंगाला पांघरून !!!!!!!!

प्रेम नसेल तर उगाच प्रेमाचे नाटक करू नकोस

प्रेम नसेल तर उगाच प्रेमाचे नाटक करू नकोस,
माझा तुझ्या वर आहे म्हणून फक्त माझ्या साठी हे नात जोडू नकोस,
मनात असेल तुझ्या हि होकार तर कबुल कर,
उगाच भावनांशी खेळून मन दुखवू नकोस...
plzzzzzzz, हे खोटे प्रीती चे नाते जोडू नकोस......




+++न रडले कधी वृक्ष ते
जरी कोमेजून पर्ण गळले
हा खेळ असे जीवनाचा
सोड तेथे जे घडले ते घडले

जन्म मीळो पानाचा
किवा मिळो त्या झाडाचा
नित सुखात उमलते नवे
दुख हि एक अंक काळाचा



धगांचा गडगडाट..
विजांचा कडकडाट..
दुखले असेल मन कुणाचे तरी...
म्हणूनच हा निसर्गाचा तडफ़डाट..

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥

भेट क्षणांचीच खरी ओढ चिरंतन राही

भेट क्षणांचीच खरी
ओढ चिरंतन राही
क्षणभराच्या भेटीची
किनाराही वाट पाही

किनाऱ्याची ओढ अशी
बेभान सखे लाट होई
येई वेगे वेगे अशी
अन फक्त गळाभेट होई

सोडून देता लाटांना
किनाऱ्याचे राही काय
किनारा सुटता असा
लाटांना फुटती पाय

सुक्या किनाऱ्याचे प्रेम
ओल्या वाळूतून पाझरे
हर्ष होता भेटीचा असा
किनाऱ्याला फुटती झरे

का कोण जाणे पण , आज नजर जागली?

सांज जाहली सख्या, आठव आली
का कोण जाणे पण , आज नजर जागली?

दुपार सरली ,तिला नीज आली
का कशी तरी ,अजून उन्ह थांबली ?

सर आली,तीही चिंब जाहली
तरी कशी मनात ,एक तहान राहिली ?

मेहंदी रंगली,ती लाजून खुलली
का तरीही मग ती, अशी रुसून राहिली ?

कळी फुलली, रंगीत फूल जाहली
का तरी गंधात ती , अशी लपून राहिली ?

मने जुळली ,जुळुनी साथ चालली
तरीही का मग ती अशी , अबोल राहिली?

काल मी एकटीच होते त्या झाडाच्या सावलीत

काल मी एकटीच होते त्या झाडाच्या सावलीत
किती तरी प्रश्नांचा शोध घेत
तप्त माझ्या मनाच्या भूमी वर
त्या झाडाच्या पानांचा वार घेत
एक पान सहज गळला माझ्या पुठे
जसे आश्रू कोसळतात आठवणी मध्ये
पण त्या पानाची दशा बघून
वाटले प्राण गेले हरवून माझे
मी निशब्द निर्विकार विचारात फसले
कधी मी त्या झाळाचे मन गवसले
किती दुखांचा होता माढा
तरी तो कसा तटस्थ उभा
उन्ह असो कि पाऊस
किती हि निसर्ग चा खेळ
पण तो तटस्थ होता नेहमीच
कधी कशी हि असुदे वेळ
त्यंव सवाली दिली उन्हात
आणि पाऊसात आसरा
पण कधी नाही परती ची अपेक्षा
पान फुल फळ फांदी
सगळ्याची त्याला काळजी
मला पान झाड व्हायचे
निस्वार्थ सेवेसाठी
निस्वार्थ प्रेमा साठी .....

मी फक्त मागितले होते..... नाते या जन्माचे ....

आठवायच्या आठवणी...
साठवायच्या साठवणी...
आठवणी अन साठवणी ...
यात गुंतले कि खुपतात मनी...




तू जे दिलेस मजला
ते तुलाही नकळत होते
पण मला जे मिळाले
ते स्वप्नांपलीकडे होते !



मी फक्त मागितले होते.....
नाते या जन्माचे ....
तूच जाता जाता दिलेस.....
वचन पुढल्या जन्माचे...



असे का होते
प्रत्येक हसण्या मागे एक दुख का लपते
येणारे सुख का अश्रू देऊन जातात
स्वप्नात असलेले का वास्तव्यात होते नाही
असे का होते काहीच कळत नाही

एखाद्या गोष्टीला महत्व देन्यापुर्वी,

एखाद्या गोष्टीला महत्व देन्यापुर्वी,
हे जानुन घेण खुप महत्वाच आहे की,
त्या व्यक्तीच्या जीवनात आपल काय महत्व आहे,
नाहीतर उगाचच मनामधे आस लागुन राहते आणि
जगन कठिन होउन जात,
म्हणुन भ्रमात जगण्यापेक्षा सत्यात जगन चांगल,
थोड कठिन वाटेल पण अशक्य नाही आहे,
कारण जीवन खुप सुंदर आहे,
फक्त जगण्याचा दृष्टिकोण बदलावा लागेल इतकच.

ती "टाटा" म्हणून जाते .

प्रेम हि एक भावना आहे
एक मनाची संवेदना आहे
केली तर खूप जिव्हाळ्याची
नाहीतर फक्त एक कल्पना आहे ...........



ती "टाटा" म्हणून जाते ................

मी म्हणता तिला गुलाब,ती मज काटा म्हणून जाते
मी नित करता 'हाय' 'हलो',ती मज टाटा म्हणून जाते

रचतो कविता,चारोळ्या,रंगवतो प्रेम चित्र नव नवे
वाचतो जेव्हा पुढ्यात तिच्या,ती बोभाटा करून जाते

उसने दे म्हणालो प्रेम काही,जीवन सार्थकी लागेल माझे
खऱ्या मागणीस माझ्या,ती नेहमी खोटा म्हणून जाते

रात्रीत भेटते ती,रोज नवी,गाते बिते,निवांत बोलणे होते
मी नीज खर्चुनी,ती स्वप्नातही तिचा वाटा मागून जाते

अजुनी आशेत मी,तो गुलाब,माझ्या बागेत रोवण्यासाठी
हृदय गुंतवणुकीस माझ्या,ती स्पष्ट तोटा म्हणून जाते

रात्री राजस चंद्र नव्या नवतीसारखा

रात्री राजस चंद्र नव्या नवतीसारखा
विलक्षण सुकुमार तेजात झळकला,
लाजेची लाली त्याच्या मुखड्यावरची
ठेवणीतला त्याचा इशारा ओळखला..!!

भुलवतो चंद्र शुक्ल-कृष्णाच्या कलेकलेने
नेहमीचाचं त्याचा हा संमोहनाचा डाव,
मनही मग उचंबळून त्याला भिडलं
धडधडणाऱ्या काळजाचा घेतला ठाव..!!

शेजारची अवखळ चांदणी खुदकन हसली
म्हणे माझ्या चंद्रावर हा देखील भाळला,
उत्तरलो मी तुझ्या मंगलमय प्रियकराने
कोजागिरीत पापाचा अंधार बघ जाळला..!!

तारकांच्या गुजगोष्टींनी कमाल तेव्हा केली
प्रकाशाच्या सोहळ्यात सखीची याद आली,
एकलेपणाची हुरहूर क्षणात मनी ह्या दाटली
रम्यतेची भावना तेव्हा आपसूक बाद झाली..!!

युगानुयुगे जगाच्या प्रेमाचा जो उद्घाता
खट्टू झालेलं माझं मन त्याने जाणलं,
प्रितीचं तेज माझ्या ओंजळीत ओतून
मी प्यायलेल्या चैतन्याने सुख भिनलं..!!

मनी जोपासलेल्या प्रीतीच्या चंद्राचा
अधिकचं खुलला रंग छान गव्हाळी,
चंद्राच्या इष्काचा अमृतप्याला रिचवून
माझ्या चंद्रकोरीला लाभली नव्हाळी..!!

कुणा दुसऱ्या मुलीच्या नजरेला नजर

कुणा दुसऱ्या मुलीच्या नजरेला नजर
द्यायलाही आता भीती वाटते
कुणाच्या नजरेतल प्रेम पाहून
माझ्या प्रेमात मलाच उणीव वाटते

... तू दिलेल्या विरहाच्या अग्नीत
मी अगदी होरपळून गेलो आहे
तुझ्या आठवणीच्या वादळात आता
सरवस्व झोकून दिल आहे

प्रिया जाता जाता येवढच करून जा
माझ्या प्रेमातली उणीव मला सांगून जा
उणीव संगीतलीस तर,
परत कुणाच्या प्रेमात तरी पडणार नाही
ती उणीव शोधण्यासाठी आयुष्यभर झुरणार तर नाही

मरेपर्यंत दोन दिवस कधीच विसरणार नाही
पहिला म्हणजे तू हो बोललेला ज्यांनी
माझ आयुष्याच पालटून गेल,.. आणि
दुसरा म्हणजे तू निघून गेलेला ज्यांनी
आयुष्यभर तुझ्या बरोबर जगण्याच माझ स्वप्न
अखेर संपून गेलं...........

सांजवेळ झाली की प्रत्येक पक्षी आपापल्या घरट्याकडे जातो
दावणीच सोडलेलं वासरू गाईच्या ओटीतच विसावतो
तस माझ मन किती काही केल तरी सावरत नाही
तुझ्या आठवणीशिवाय त्याला काहीच सुचत नाही

जातेस तर जा पण जाता जाता येढच कर तू
दिलेल्या आयुष्य भराच्या दुखातल थोडस दुख कमी कर
ते तेव्हाच कमी होईल फक्त .......
मी शेवटचा निरोपघेण्या आधी त्याच ,,,,,
प्रेमळ नजरेनी मला तुझ्या डोळ्यासमोर धर .........

आता फक्त येवढच कर ,,,
तेव्हा तरी नजर चुकवू नकोस
कारण मी जाणार असेन

मी जात असताना येवढच कर

मनतले अश्रू मनात सुकू देऊ नकोस
त्यांना डोळ्यातून वाहुदे.....
मरता मरता का होईना
माझ्या प्रियाला माझ्यासाठी रडताना पाहूदे....

मरता मरता का होईना
माझ्या प्रियाला माझ्यासाठी रडताना पाहूदे

दुःखाची वेस ओलांडल्यावरचं

दुःखाची वेस ओलांडल्यावरचं
हव्याशा सुखाचं लागत गाव,
पण वेशीशिवाय का कधी कुठे
त्याला गावपण राहत राव..??





गंधाळलेला तो शब्द हि
आज आपली सीमा सोडतोय
प्रत्येक शब्द आज भाव आपला
तुझ्या साठी दान करतोय

आंबेगाव तालुक्यात महाळुंगे नंबर १ आहे ;

आंबेगाव तालुक्यात महाळुंगे नंबर १ आहे ;

भीमाशंकर च्या पुण्य भूमीत, सह्याद्री च्या कुशीत,
लेण्याद्री,शिवनेरी ओझर च्या शेजारी,
पुणे जिल्यात एका हुतात्म्याचे गाव आहे ,
गावचे नाव भले "महाळुंगे पडवळ" असु दे,पण ,
" महाराष्ट्र " राज्यात प्रसिद्ध ओळख आहे.
हुतात्मा बाबु गेनू सैद याच गावचे सुपुत्र आहेत ,
१२ डिसेंबर हुतात्मा बाबु गेनू यांचा पुण्यतिथि दिवस आहे .
गांधी टोपी या गावात प्रसिद्ध आहे ,,
.२० वाड्या वस्त्यांचा असा हा गाव आहे ,,.
५ दुध डेअरी ,८ केश कर्तनालय ,६ हुंडेकरी .
३ ट्रान्स पोर्ट ,३ मराठी शाळा ,२ सोसायटी .
ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय ,बँक, गावात आहेत .
डिंभे कॅनॉल ने सारा गाव हिरवा गार दिसत आहे
मुंबईकर ,पुणेकर गावच्या महान व्यक्ति आहेत
गावची वेस,सभा मंडप,भली मोठी मंदिरे गावची शान आहे,
बाबु गेनू हायस्कूल आमची मान आहे.
बैल पोळा गावचा सन खास आहे ,
दत्त मंदीर,शिवाई मंदिर आमची आस आहे..
"दहितुले ची ’ मिसळ "लोखंडे "आवटे ,,ची भेळ . ,
"शिवाजी " वडापाव प्रसिद्ध आहे.
साहेब, दादा ,आण्णा यांचे आशीर्वाद आम्हास लाभले आहेत ,
म्हणूनच तर "महाळुंगे पडवळ" आमचा खास आहे..
यालाच २ रे नाव हुतात्मा बाबू गेनू नगर आहे ,
म्हणूनच आंबेगाव तालुक्यात महाळुंगे नंबर १ आहे ;
गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा.
आमोल घायाळ

जन्माला आली तरी स्वागत होत नाही,

जन्माला आली तरी स्वागत होत नाही,
कन्या आहे म्हणून आनंद होत नाही,

परक्याचे धन म्हणून पिता उदास होई,
वंशाचा दिवा नाही म्हणून आई उदास होई,

शिकून यमुनेची निर्मलता गंगेची धार होते,
कमावती म्हणून घराचा आधार होते,

लग्नाच्या बाजारात उभे राहावे लागते,
कन्या आहे म्हणून टोमणे सहन करावे लागते,

आई वडिलांना होते लग्नाची घाई,
सतत वर पक्ष विचारतो लग्न करता का ताई??

पसंत केले जाते ती शिकली म्हणून,
तरी हुंडा मागणी होते वर पक्षाकडून,

लग्न होई थाटात , येते सासरी हसत ,
पैशासाठी मात्र छळली जाते सतत,

एके दिवस जीवनाला ती खूप कंटाळते,
जीवन संपवण्यासाठी मृत्यला कवटाळते ,

अशी हि व्यथा आहे भारत्देशातील कन्येंची,
तरीही बदलत नाही विचारधारा समाजाची ..................

तुझ्या येण्याची वाट पाहत आहे

तुझ्या येण्याची वाट पाहत आहे
अजून किती पाहशील माझा अंत,
तू आलीस कि येईल कि जगण्याला अर्थ
तुझ्याविना माझे जीवन आहे व्यर्थ,
तुझ्यामुळे मला मिळेल एक नवीन दिशा
तूच दिसतेस मला नेहमी चारही दिशा,
सांग तू येशील ना ???????????????





तारुण्याची झाक ढंगदार
जीवाला प्रेमात रमवते,
एकाचं जहरी कटाक्षात
शरीर दिलाला गमवते..!!



आज वाटले मला.....
तुला मनातून मिटवावे...
मिटवताना तुला वाटले.....
एकदा तुला पुन्हा आठवावे...

कशी असेल ती अता ? असेल का ती ठीक ??

कशी असेल ती अता ?
असेल का ती ठीक ??
अता तिला जून सर्व आठवत असेल का??
आठवल्या क्षणामध्ये परत ती जाऊ पाहेल का??
गेलीच तरी तर ,त्या क्षणात मला पाहिलं का??
पाहिलं जरी मला तर , एकदा तरी मला परत बोलवेल का??
बोलावले तरी माझ्यासंगे प्रेमाचे २ शब्द म्हणेल का??
माझ्यासाठी तीच मन परत,माझ्या मनाशी हितगुज साधेल का??
साधल तरी मनातले प्रश्न,सुख दुख माझ्यासमोर मांडेल का??
मांडले तरी ,मी दिलेल्या त्या उत्तरांचा ती विचार करेल का???
माझ्यासाठी परत ,सर्वांसाठी ती झगडेल का???
दिलेल्या आठवणीत परत मागण्याचा देवा कडे हट्ट करेल का??
प्रत्येक क्षणी नाही पण दिवसातून एकदा तरी आठवण काढेल का???
काढलेल्या त्या वेळात फक्त मलाच ती पाहेल का??
मी नाही होऊ शकलो तिचा ,तरी ती आनंदात राहील ना???
माझ्यापेक्षा हि जास्त प्रेम देणारा तिला मिळेल ना???
त्याच्या सहवासात राहून सर्व दिलेले क्षण विसरून ती आनंदी राहेल ना
मी दिलेले सर्व क्षण ,आठवणींची जळमट मनाच्या गाभार्यातून काढून टाकेल ना???
आयुष्याच्या तिच्या सुंदर वळणावर एकदा तरी माझी आठवण तिला येईल ना??
आली तरी माझ्यासाठी ,तिचे डोळे पाणावतील ना ??

सुखाची व्याख्या आता करवत नाही

सगळे गोठलेले
श्वास मंद आहेत
शांत राहूनही आज
मनात द्वंद्व आहेत...


सुखाची व्याख्या आता करवत नाही
झालं गेलं भोगलेलं सारंच सुख,
प्रीतीच्या व्यवहारातला मापदंड तोचं
सौदा करून पदरात कमावलेलं दु:ख..!!



चंद्र चांदण्यांच्या मिठीत,
आले अंगावरी शहारे
आज मी पांघरले ,
सुख हे झोंबणारे......!
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छ्या..!

Monday, October 10, 2011

तुला पाहताना देहभान विसरुन गेलो...

सांगायचे होते ते सांगायचे राहून गेले.
जगायचे होते तुझ्या सवे काही क्षण ते जगायचे राहून गेले..
मी पाहत होतो वाट तुझ्या शब्दांची...
अन मला जे बोलायचे होते तेच राहून गेले...


मी एक दवबिंदू अळवावरचा..
काही काळ माझं अस्तित्व...
जराशी वारयाची झूळूक येता...
पडून विरुन जाईन मी या मातीत...



तुला पाहताना देहभान विसरुन गेलो...
मी माझा न राहून तुझ्यात विरुन गेलो..
तु मात्र हसत होतिस माझ्या असण्यावर...
अन मी नकळत तुझ्या हृदयात राहून आलो..



अडगळीच्या खोली मधलं.
दप्तर अजूनही जेव्हा दिसतं.
मन पुन्हा लहान होऊन...
हळूच बाकावर जाउन बसतं



पावसाळी ती संध्याकाळ...
रिम झिम पाऊस बरसत होता...
तुझ्या सोबत भिजायला...
जसा पाऊसही तरसत होता..


तु गेल्यावर नजर...
तुझी वाट निहारत असते...
जाता जाता एकदा तू..
वळून पाहतोस का बघते.




मी लिहितो खुप काही..
पण ओठावर काहीच येत नाही...
तुला कळावे माझे हे शब्द...
या शिवाय काहीच मी मागत नाही..

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील....

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील...................

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
... माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

एक मिठी.. तुझ्याचसाठी रिकामी..

एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..

एक जीव..
तडफडणारा..
असहाय्य..
तुझ्याविना..
तुझ्याचसाठी....

एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,....

प्रेम तुझं मनात वसलय़ं...

प्रेम तुझं मनात वसलय़ं...

प्रेम तुझं मनात वसलय़ं...
प्रेम तुझं हृदयात घूसलयं..
प्रेम तुझं प्रत्येक श्वासात...
प्रेम तुझं माझ्या नसा नसात...

प्रेम तुझं सोबत माझ्या..
प्रेम तुझं स्वप्नांत माझ्या..
प्रेम तुझं आहे प्रत्येक क्षणात...
प्रेम तुझं आहे कणा कणात...

प्रेम तुझं या भिरभिरत्या वारयात..
प्रेम तुझं या निरभ्र आकाशात...
प्रेम तुझं त्या वाहणारया झरयात...
प्रेम तुझं या अथांग सागरात...

प्रेम तुझं माझ्या या शब्दात...
प्रेम तुझं या कोरया कागदात..
प्रेम तुझं दडलयं हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात
प्रेम तुझं भिनलयं माझ्या रक्ता रक्तात...

असे हे आमचे प्रेम अधुरे... :

प्रीतीच्या पाखराची गरुडझेप आकाशी
संकटांचे ढग जोमाने पायदळी तुडविशी,
अंगचीचं ताकत प्रेमाच्या ह्या पंखांत
अजिंक्यतेचा धडा प्रेमगरुडाचा जगाशी..!!



एकदा तिच्या मिठी विसावलो ..
कि वाटायचे हे जग अधुरे.....
ती न झाली माझी मी न झालो तिचा...
असे हे आमचे प्रेम अधुरे... :'(



दे जराशी साथ अशी
चंद्र हि पाहिलं ती कुशी
ह्या मिलनाचा खेळ पाहुनी
चांदण्या हि जातील लाजुनी



रातराणीचे अत्तर घेवून सये
पसरला चोहीकडे गंध
आठवणीचा पदर धरून
वारा बघ वाहतो मंद मंद

आज तुझ्या मिठीतच... मला बिलगून राहू दे...

एक कविता लिहीन म्हणतोय...
आपल्या या नात्याला जोडायला...
शब्दच आता मला म्हणतात...चल जाऊ,
पुन्हा आमच्या राज्यात कविता करायला...


कवेत तुला घेताना...
सुचली एक कविता...
ओठावरच्या शब्दाला तुझ्या...
टिपले मी तुला न सांगता...


तुझ्या कवेतल्या कविता...
कवेत तुझ्या विरून गेल्या ...
मी पाहत बसलो तुला अन...
साऱ्या आठवणी भर दिवसा येऊन गेल्या..


मिठीतला मी तुझ्या..
तुझ्यात विरून जायचो...
तू अजून घट्ट मिठी मारलीस कि...
मी मलाच विसरून जायचो...


तुझ्या मिठीत आल्यावर....
सर जगच तिथे भासायचं...
तू मिठीत आलीस कि...
सार आभाळ मनात दाटायाचं ...


आज तुझ्या मिठीतच...
मला बिलगून राहू दे...
साऱ्या जगाला आज..
मला विसरून जाऊ दे...

चार इंचाच्या पोटासाठी

कुंपण खातंय जगात आज राजरोसपणे शेत
आजकाल प्रेमात आणि सत्तेत सगळंच माफ,
प्रेयसीने केला घात आणि बाईंनी दिली लाथ
पानिपतातले विश्वासराव पुनच्छ एकदा साफ..!!


अंत ना चुकला कुणाला
तरी जगण्यासाठी धडपडला
त्या धडपडीचा सख्ये
जरा लवकरच शेवट झाला


समाजाच्या वेशीवर
इज्जतीची लक्तरे मांडली
पाषाणाने हि त्यासाठी
थोडीशी असावे वाहिली


चार इंचाच्या पोटासाठी
तिन आपल इमान इकल
अन क्षणीक भोगासाठी
त्यान ते इकत घेतलं


तिच्या भोवताली
पाश वासनाचा
जंगलाच्या कायद्यात
जय जयकार लांडग्याचा

हर पल जलता है आदमी क्यू ??

हर पल जलता है आदमी क्यू ??
-----------------------------------

सब कुछ खोखला है इस दुनिया में
आदमी के विचारो से पार ये जहाँ है
क्यों खोजते है हम खुद को वहा
जहा कभी हमारा वजूद ही न रहा है.........
शून्य से निर्मित होता है सब
और शून्य ही अंत में बचा है
फिर भी सारी जिन्दगी
बटोरने में जुड़ा है...............
सपनों के घरोंदे है
खयालो की टहनी पर
जब खुली आंख तो
न टहनी न घरोंदा बचा है............
सब कुछ पाने के लिए
न सोता न जगता है
पैरो में भवरा लगाकर
चाहत के पीछे भागता है.............
कल जो तेरा दिन निकलेगा
न जाने तू इस दुनिया मे होगा
फिर आजकी जिन्दगी के पल
क्यों कल के सुकून के लिए गवता है........
तेरे अरमानो के पंख अभी
उड़ने के लिए तड़प रहे
कितना भी फडफडएगा तो भी
समय के हातो में ही मुकद्दर फसा है.................
कर बरोसा खुद पर
किस्मत भी साथ रहेगी
आज की जिन्दगी तो जी ले पहले
कल फिर नयी शुरवात रहेगी...................

छोटी छोटी बातो की ये कहानी है
छोटी सी बात है पर पूरी जिन्दगी की रवानी है ....

प्रेम,

प्रेम,
याचा अर्थ आज वेगळाच लावला जातो
सखीला जो काखेत घेऊन फिरे
तो तिचा छावा म्हणवला जातो...!
माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणे
आणि वन फोर थ्री असे लेबल लावतात
चार दिवस मजा करून
नंतर त्यांनाच आय हेट यु म्हणतात...!
प्रेम,
आज फक्त गर्लफ्रेंड असणे एवढेच उरले आहे
मनात एक असताना
अन दुसरीच्या देहावर डोळा आहे...!!
प्रेम,
तिच्या आणि त्याच्या भावनांचा आदर असणे
एकमेकांना जपणे...
विश्वास आणि प्रामाणिकपणे वागणे..
एकाला दुःख झाले तर दुसऱ्याने आपसूकच रडणे
एक हसला तर दुसऱ्याने आनंदी होणे..
कदाचित, हेच प्रेम असणे....!!

माणसाने मनमोकळे जगावे

म्हणतात, माणसाने मनमोकळे जगावे, समस्या काय प्रत्येकाच्या जीवनात असतात, आणि तो प्रत्येकजण समस्येला आपले म्हणत त्यावर मात करत असतो...
म्हणतात, उगाच माणसाने दुसरयाची चिंता करू नये, तो दुसरा समर्थ असतो पेलायला अनेक संकटे...
म्हणतात, फुकटची काळजी दाखवू नका, जसे काही ती काळजी ही नुसता दिखावा आहे आणि शुष्क वाळवंटात मृगजळ दाखवून तहानेला अधिक तीव्र करणे आहे..
. . . . . . . . . . . .. . . .
जगापासून कितीही अलिप्त राहावे म्हणाले तरी आपण ह्या जगाचा एक भागच असतो, हे विसरतो आणि स्वतःच्या कल्पनेला प्रतिक मानून जगतो.. सगळ्या लोकांना दूर सारून...
आणि अशा माणसांना काय बोलावे मला नाही कळत... जेव्हा ती खासकरून जवळची असतात.

पाहून मज उदास

पाहून मज उदास तो
फक्त स्वच्छ मनाने हसला
धुके सारून वाटेवरचे
मज नवीन मार्ग दिसला...
क्षणात मी मांडले
गणित त्या वाटेवरचे
उलगडल्या पायऱ्या त्याने
नियतीचे प्रमेय घेतले...
चुकत जाईन मी
वाट जिथे मिळेल
शिकत जाईन मी
नवीन जे जे कळेल ...
रात्र सरून पहाट
हा खेळ प्रत्येक वाटेचा
हृदयात सूर्य असता
नव प्रकाश तो चेतनेचा...
चालतो मी वाट माझी
कधीच न थांबण्यासाठी
शोधतात पाय माझे
नवीन वाट जगण्याची...

ती म्हटली - ?ते आलेच ओघाओघाने...

.ती म्हटली - ?ते आलेच ओघाओघाने...?
मी म्हटले - "तू कधी येणार ?-
- ओघाओघाने जाऊ दे
निदान एखादी बारीकशी धार ?"

...ती म्हटली - ?तुला काय ? आता खुश्शाल
झोपशील...?
मी म्हटले - " आमेन ! -
- अजून बरीच रात्र आहे शिलकीत...
मेणासारखा चटके खात
मेणबत्तीभोवतीच जमेन !!"

...ती म्हटली - ?कळतच नाही काय बोलतोस...
मी जातेच कशी !?
मी म्हटले - "ते आलेच ओघाओघाने...
आता रात्रीच्या मिठीत मी
आणि माझ्या मिठीत उशी !

गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा..

नाव भले "महाळुंगे पडवळ" असु दे, पण "आमेरिका " सारखी ओळख आहे.
हुतात्मा बाबु गेनू सैद या गावचे सुपुत्र आहेत.
१२ डिसेंबर हुतात्मा बाबु गेनू यांचा पुण्यतिथि दिवस आहे.
मुंबईकर ,पुणेकर मित्र मंडळ यातील गावच्या महान व्यक्ति आहेत.
गावची वेस,सभा मंडप आमची शान आहे,
बाबु गेनू हायस्कूल आमची मान आहे.
बैल पोळा गावचा सन खास आहे.
दत्त मंदीर,शिवाई मंदिर आमची आस आहे..
"दहितुले ची ’ ची पावभाजी, "लोखंडे " चा वडापाव, "शिवाजी " चा चायनीज आहे.
म्हणूनच तर "महाळुंगे पडवळ" आमचा खास आहे..
गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा..
..... आमोल घायाळ.....

Sunday, October 9, 2011

आपण पोरका झालो मला तेव्हा कळाले

डोळ्यातील भाव जाणुनी
मनात उतरवतो
मन हे वेडे सख्ये तेच
भाव लेखणीत मांडतो


पावसाला पण फसवायची सये
मी अवगत केली आहे कला
तू भिजू नये सामोरी माझ्या
नयनात साठवले आहे त्याला



उरफाटं तत्वज्ञान
टाहो सत्याचा
घूमा कालायुगकाल
माणुसकीच्या हत्येचा....


ka aajkal diwas
kantalvane jhalet
man kitihi ramvnyach mhantl
tari sagal kas nisthabd jhalet ...........




वेदनेच्या प्रहरी
तिन्हीसांज ती रडली
तिच्या विरह मार्गावर
रात्र माझी कोमेजली





भूतकाळाचा जो तुकडा
असह्य होऊन गळाला
भविष्यात मज तो
अश्रू रूपाने मिळाला


ओलांडण्या उंबरठे पापण्यांचे सये
कारणे भोवताली पाहू लागले
विरहाचा सागर दिसता सामोरी
आसवे दुधडी भरून वाहू लागले



एकदा प्रश्न केला आसवाने सये
मी नेहमी का रडताना बाहेर पडतो
मी म्हटलं शिंपल्यात नाही रे किमत
बाहेर आल्यावर तो मोती आहे हे कळतो ?





जेव्हा तिला फोन केल्यावर
कोण बोलतंय..? असे उत्तर मिळाले...
आपण पोरका झालो
मला तेव्हा कळाले

कोणाची वेदना मोठी
ह्यात एकदा स्पर्धा झाली
मी जिंकलो कारण
एकटेच जगण्याची पाळी आली...

मदहोश होऊनी बेहोष होतो

मदहोश होऊनी बेहोष होतो
का तुझ्या रूपाच्या जादूत विरतो
तरी मी असा वेडा सख्ये
ह्या दिलास काबू ठेवू पाहतो



अचानक खूप खाली खाली वाटतंय,
आठवण येते तरीही स्वतःला सावरण्याच्या प्रयत्न करतोय,
का इतका हळवा होतो, का इतका अगतिक,
उत्तरे शोधताना तिच्यामध्ये गुंतत जातो,
आता काही दिवस तसेच राहणार..
सभोवतालचे सगळे जग सुने सुने आणि माझे चित्त फिके

आहे माझ्या मराठीत असा गोडवा ओवीचा

आहे माझ्या मराठीत
असा गोडवा ओवीचा
असे सजले अंगण
धुंद सुवास फुलांचा

आहे माझ्या मराठीत
सारी गाथा अभंगाची
व्यथा विसरती सारे
साथ मिळे मृदंगाची

आहे माझ्या मराठीत
मजा भारी लावणीची
शब्द शब्द लयदार
चाल भारी ही ढंगाची

आहे माझ्या मराठीत
बोल रांगडा मातीचा
जसे उजळे आकाश
स्फोट होताच विजांचा

आहे माझ्या मराठीत
शारदेचं वरदान
साहित्याच्या वर्षावाने
जणू फुलले अंगण

आहे माझ्या मराठीत
समूह हा कवितेचा
डंका विश्वात अवघ्या
वाजे आज मराठीचा

सांजवेळी सोबतीला सखे तुझी आठवण

मनामनातून गुंफले होते स्वप्नांचेच धागे
एक पवित्र नाते जुळले होते शब्दांच्याच मागे ,
प्रेमसागरतीरी मी एक स्वप्नील दुनियाच साकारली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली .....



सांजवेळी सोबतीला
सांजवेळी सोबतीला
सखे तुझी आठवण
लोचनांत आसवांची
होते मग साठवण

सांजवेळी सोबतीला
सखे भास स्पर्शातले
पाहशील कधी प्रिये
भाव माझ्या डोळ्यातले

सांजवेळी सोबतीला
आठवांची होई दाटी
नको असा सूड घेऊ
किती धावू तुझ्यापाठी

सांजवेळी सोबतीला
सखे तुझी वाट आहे
ये न आता लवकरी
चढायचा घाट आहे

मैत्री विरुद्ध प्रेम

मैत्री विरुद्ध प्रेम

================

एका मुली - मुलात कधी

निखळ मैत्री का हो नसते ?

नेहमी त्यांच नात काहो

प्रेमा वरती येवून फसते ?

मैत्रिणी -मैत्रिनित गप्पा

आणि मित्रा -मित्रात मजा

मुली -मुलाच्याच मैत्रीला

प्रेमाची व्हावी सजा ?

विरुद्ध लिंगी आकर्षण

आणि खो घालतो सहवास

हळू हळू वाढते जवळीक

अन सुरु प्रेमाचा वनवास

उनाड पोरांच्या घोलक्या मधून

तो थोडा वेगला होतो

प्रेमाच्या त्या जादुपोटी

कावळ्यांमध्ये बगळा होतो

तीही नंतर दूर होते

चिव चिवनार्या सखिंपासून

त्या बिचार्या पाहत रहातात

तीच वागन आ वासून

त्या दोघांच बोलन मग

विषय विषायानी वाढत जात

मैत्री सारख पवित्र प्रेम

आकर्षणवर थांबत जात

दोघे नंतर वेगळे होतात

निरोप देतात मैत्रीला

विराम पडतो त्यान्च्याशिवाय

हास्यविनोद अन मस्तिला

मित्र फक्त मित्र बनतात

औपचारिकतेने बोलायला

सख्या फक्त सख्या रहातात

खोट्या गप्पा तोलायला

त्या घोलक्यातिल मुला मुलित

दरी पडत जाते खोल

प्रत्येकाला मिलते साथ

ढासळत जातो मैत्रीचा तोल

मैत्री मधली शुद्धता

प्रेमामुळे झिरपत जाते

प्रेम आणि मैत्रीमध्ये

मैत्री तेवढी विखारत जाते

हेवा वाटावा अशी दोस्ती

हळू हळू फ़स्त होते

फटकळ अशा प्रेमासाठी

खरी मैत्री पण स्वस्त होते

पावसाचा एक थेंब.. तहान या चातकाची...

प्रत्येकाच्या मनात असते एक विसरभोळा सैतान
झाल्या उपकाराची कृतघ्नतेत कशी नसते त्याला जाण,
करंटा तो विसरतो अप्पलपोटी दानवतेत मानवता
आत्मकेंद्री होऊन रया घालवतो नात्यातली महान..!!




पावसाचा एक थेंब..
तहान या चातकाची...
जगभर पसरला हा सागर...
तरी तहान ना भागे याची...


नात्यांचे रंग सख्या आत्ता
हळू हळू उडत चालले
प्रक्टीलकल पणाचा लेप लाऊन
भावनानांचे इथे खेळ मांडले.....

अजाणतेपणी बोलुनी गेलो,

अजाणतेपणी बोलुनी गेलो,
मनी दाटलेल्या त्या गुजगोष्टी..
नंतर कळले होतेच ते व्हायचे,
खेळता खेळता काढून नेते नियती सगळे काही..
हरलेलो आपण, दुःख पचवीत जातो,
पुन्हा एकदा समोर येते एक लावण्या,
उलगडत जाते सत्य जे जाणिले कधीच नाही...
प्रेम ह्या संकल्पनेवरच करीत होतो प्रेम मी आजवरी

तुझ्या माझ्या आठणींना.. आता उरली नाही सीमा..

तुला मला सोबतीला...
आहे भास आपलाच..
क्षण हे वैराचे...
त्यांना ध्यास आपलाच...

मी एक किनारा...
तू वाहती लाट...
क्षण हे वैराचे...
बघ करुन बसलेत थाट...

तु तिथे मी इथे...
स्वप्नात गुंतलेले..
क्षण हे वैराचे...
कसे आहेत मंतरलेले..

तुझ्या माझ्या आठणींना..
आता उरली नाही सीमा..
क्षण हे वैराचे...
लादतात विरहाची परीसीमा..

पुन्हा पुन्हा आठवतो मंद हळव्या क्षणांना

विसरलो मी कालचे
माझे किती श्वास होते
हात तुझा हाती अन
सारे तुझे भास होते

पुन्हा पुन्हा आठवतो
मंद हळव्या क्षणांना
माझ्यासाठी जसे काही
जगण्याची आस होते

लाविलेस वेड मला
परी आता शोधू कुठे
चोहीकडे पाहीले मी
तुझ्याविना ओस होते

आठवाने जेव्हा तुझ्या
झंकारते काळीज हे
एकेक ती आठवण
माझ्यासाठी खास होते

तूच माझ्या जीवनाची वाट

तूच माझ्या जीवनाची वाट
तूच माझ्या अबोल प्रेमाची साथ
तू नशील तर जीवनाला नाही काही अर्थ
आहे तुझ्यासाठी मी आणि माझ्या साठी तू.......अमु



सुर्य मावळू लागला...
कि संध्याकाळ आपले सामाज्य पसरवते...
ती दिवसा वर हावी होणार...
तेवढ्यात रात्र तीच्या वर मात करते...


तुझे ते शब्द मला..
क्षण क्षण टोचतात..
मी केलेल्या चूका म्हणे...
तुला त्रास देतात..

तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
आडकले आहे माझे मान
तुझ्या सहवासातील क्षणाची केली साठवण
आता तीच साठवण बनली आहे माझी
फक्त आणि फक्त आठवण.....अमु

Thursday, October 6, 2011

कधी तरी वाटत द्याव बंधन सारे तोडून

कधी तरी वाटत
द्याव बंधन सारे तोडून
पण नंतर कळते आपणच घेत
आहोत आपले हात पाय मोडून


माझ्या पहिल्या प्रेमाची साठवण आहेस तू
केले आहे प्रेंम तुझ्या वर जीवापाड
मान दुखवले जाईल असे करू नकोस काही
कारण माझ्या जीवनीची पहिली पायरी आहेस तू



मखमली तिची काया
चालते कशी अलगद बया

अंगूरची चव होठास
डाळीम्बच्या दाण्याचा रंग गालास

मोजक्याच व्यासात
मटकवतेस कंबरेस

पाहुनी तुजी ही अदा
मोहिनीचा विसर इंद्रास

तू अशीच जवळ राहा

तू अशीच जवळ राहा
माझ्या नाही तरी माझ्या मना जवळ राहा

जेह्वा कधी वाटेल मज एकाला मी
तेह्वा अशीच मनातून बोलत राहा

साथ सोडलेल्या अश्रुना पापण्यातच
थोपावण्यासाठी पदर घेवून सज्ज राहा

त्या सांजवेळी आठवेल जेव्हा ती कातरवेळ
तू अशीच तुझी प्रतिमा डोळ्यात ठेवून जा

जाशील तू जेह्वा मात्र तू
एक उपकार कर ,,,,, हा जीव ही सोबत घेवून जा

नादान हैं हम सनम जरा समझो इस दिल को

नादान हैं हम सनम जरा समझो इस दिल को
बेपनाह हैं चाहत अब पाना हैं तेरे साथ मंझिल को,
मत करना कभी शक मेरी वफ़ा पर ऐ दीवानी
खुद जलकर रोशन करूँगा चाहत की महफ़िल को..!!

सांग ना रे मना

सांग ना रे मना
जीव का वेडावला
तिच्या वाटे येणारा
पर्त्येक वारा भारावलेला


तुमच्या प्रत्येक शब्दामी असाच निशब्द राहिलो
बघ्याची भूमिका बजावत गेलो
काही बोलावस जरी वाटल
आपलेच शब्द गिळत गेलो

ना सामर्थ्य माझ्यात
लढण्याचे समाजाशी
नसेल जरी काही तरी
आपलीच चूक मनात गेलो

स्वतःच्या मनास मारत
स्वतःशीच खेळत बसलो
ह्या लपंडावच्या खेळत
मीच का हरत गेलो

म्हणू नये कोणी नामर्द
स्वतास कठोर करत राहिलो
स्वतःचे च आसवे
स्वतःच लपवत गेलो ला..

मती आणि हृदय

घायाळ हृदयास
आज कोरत बसले
रक़्ताचे आसवे लपावे
म्हणून पापण्यास आड केले



हे मना शिक जरा
पापण्याकडून काही
तू दिलेल्या वेदनास
एक अश्रूही जावू देयेना वायी



मती आणि हृदय
त्या दिवशी जुंपले
घायाळ करून ह्रदयास
मती ने जंग जिंकले

संपता संपेचना ही रात्र अंधारी किती?

संपता संपेचना ही रात्र अंधारी किती?
एक शोधाया कवडसा, रोज बेजारी केती?

पांगळा ठेचाळतो मी, मार्ग क्रमिता जीवनी?
धष्टपुष्टांना सजवली, खास अंबारी किती?

वस्त्र माझ्या आवडीचे, हुंदक्यांनी बेतले
रंग पक्का वेदनांचा, पोत जरतारी किती?

आठवेना जन्मलो मी, तारखेला कोणत्या
श्वान सजले वाढदिवशी, जश्न शेजारी किती?

पुण्य का धास्तावलेले, वळचणीला बैसले?
पापियांची चाल झाली आज सरदारी किती?

चावडीवर का न यावे, सांगण्या अन्याय तू?
व्यर्थ डोळेझाक करती, मूक गांधारी किती?

शोषितांच्या फायद्यास्तव, योजना बनल्या तरी
अल्प पदरी दुर्बलांच्या, खर्च सरकारी किती?

वाव द्यावा नवपिढीला, वृध्द नेते सांगती
"वारसांना द्याच संधी" ही तरफदारी किती?

आमदारांना विचारा, आज मतदाना अधी
मांडले तू प्रश्न अमुचे, राज दरबारी किती?

कोण येइल चार गजला ऐकण्या "निशिकात"च्या?
पण तमाशाच्या दिशेने सांग रहदारी किती?

क्यूं झुकाती हो आँखे ज़रा टकराने दे

चाहत हैं तेरे चाहत की
अब चाहत में बस खोना हैं,
बेशुमार चाहत लुटाकर अब
चाहत से तेरा ही होना हैं..!


क्यूं झुकाती हो आँखे ज़रा टकराने दे
इशारों का खेल अब थोडा रंग जाने दे,
प्यासा हैं तीर- ए-नजर तेरी इक झलक का
खुशनसीब होऊँगा बस तेरे संग होने दे..!!

मी एक वेडा अन हे जग शहाण्यांचे

मी एक वेडा
अन हे जग शहाण्यांचे
डोहाळे मज लागले होते
त्या वांझोट्या गुन्ह्यांचे...
नग्न प्रेमाची मी
फाडली खोटी वस्त्रे
नग्न होऊनी मी स्वतः
डागतो हि शब्दास्त्रे ..
भिकार ती नाती मी
तुडवीत गेलो पायदळी
विसर्जित केली कुजलेल्या
त्या भावनांची राखरांगोळी ...
गांडुळे ती समाजातली
शोषून रक्त जगतात
रक्त भिनते भरारीचे तिथे
मज बांडगुळ होण्यास सांगतात...
गवसेल मज आकाश
मी सोडीन धोपट वाट
मुक्त मी जागून दाखवीन
ह्या करंट्या समाजात....
वेडा होऊन जगताना
मज शहाणे व्हायचे कळले
हौस ती मज जगण्याची
जिथे अनेक धुरंदर जळले...

गर्द निळ्या रंगात.

तू इन्कार केलास
मी जगत राहिलो तरी
उगवेन मी नवीन गुलाब
माथी राख असली जरी..



गर्द निळ्या रंगात...
आज उजळल्या दिशा...
माते तुझ्या आगमनाने...
सर्वांच्या मनात संचारल्या आकांक्षा..

एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले.......

मजबूर करतात हे मज
वेड्यासारखे वागायला
बंद पिजारयात डांबून
मज सांगतात उडायला....



तुला आणि मला
नुसते जगायचेच ना..?
मग ह्या फकिराला जरा
प्रेमाची भिक घालून बघायचेस ना..


एक
दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले.......

........

जगात मी असताना तू
कशाला आलीस???
...
तेव्हा मैत्री म्हणाली.......
"जिथे जिथे तू अश्रु
देऊन जाशील ते पुसायला

बस तू ही नहीं मेरे दिलबर

बस तू ही नहीं मेरे दिलबर तेरे लफ्ज़ भी तो हैं नशीले
शायरी के मैखाने में छलकने दे मतलब से प्यारभरे जाम,
नजाकत तेरी लाजवाब रंग ढाती हैं इस आशिक दिल पर
आज जरा चख़ कर देखने दे तेरी लिखावट के अंजाम..!!

आवाज हुंदक्यांचा, ओठात दाबलेला !

चिता आणि चिंता
चिता आणि चिंता या दोन शब्दांमध्ये केवळ एका अनुस्वाराच फरक आहे
परंतु या दोहोमध्ये जर श्रेष्ठ कोण असेल तर चिंता होय .
कारण चिता हि निर्जीव देहाला जाळते तर चिंता हि सजीवाला जाळते
म्हणूनच चिंतेचा सर्वथा त्याग करावा



आवाज हुंदक्यांचा, ओठात दाबलेला !
ओथंब आठवांचा डोळ्यात दाटलेला !!

छळते किती-कितीदा ही रात्र पावसाळी..
रंध्रात विरघळावा मृदगंध साठलेला !!

बघ आवरु कसा हा आवेग स्पंदनांचा...
होता सुगंध श्वासा- श्वासात माळलेला !!

तो तीळ जीवघेणा खांदयावरी सख्याच्या...
मग चंद्र पौर्णिमेचा फ़िकाच वाटलेला !!

भाळावरी सख्याच्या सजतात घर्मबिंदू...
पडता मिठी खुलावा शृंगार राखलेला !!

गालांवरी उमटली होती पहाट लाली
प्राजक्त देठ तेव्हा भाळून लाजलेला !!

कल्लोळ भावनांचा जाणेल रातराणी
भावार्थ मौनतेचा ओठात आटलेला !!