आभाळाच्या दारावर एकदा
टक टक कुणीतरी केली
दार उघडून पाहिलं
तेंव्हा दारात फुलं
त्याने पाहिली.
पांढरी शुभ्र फुलं सगळी
का गोळा झाली ?
काय काम असेल त्यांचं
म्हणून वर्षाही आली .
फुलं म्हणाली मग त्याला ,..
रंग पेरून तुम्ही देवांनी
सृष्टी केलीय हिरवी ;
का मग आम्ही फुलेच
राहू फक्त पांढरी?
विचार थोडा करून मग
वर्षा त्यांना बोलली ,
जाऊन झोपा आता तुमची
इच्छा होईल पुरी !
पण ठेवा लक्षात, उद्या
पहाटे रंग येतील दारी;
रंगतील रंगात तीच फुले
जागी असतील जी कुणी.
राहतील तशीच पांढरी जी
ऐकणार नाहीत कुणी !
पटून म्हणण तिचं सारी
फुल गेली झोपून
उठायचय पहाटे रंगासाठी
हे मनाशी ठरवून .
एवढ ठरवून मनी सुद्धा
कांही राहिली झोपून
उठून पाहिलं त्यांनी तेंव्हा
कांही रंगात बसली होती नटून.
कळली त्यांना चूक त्यांची
पण वेळ गेली निघून
म्हणूनच मोगरा ,जाई-जुई
राहिल्या पांढरयाच रंगाला पांघरून !!!!!!!!
No comments:
Post a Comment