Saturday, October 20, 2012

तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन .

अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा, श्री सद्चीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय . तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन . साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्याने , साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान , साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // वाट असे ती वळणाची आले पायाला ते फोड , तुझ्या कृपेच्या छायेत फोड वाटती रे गोड , साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // माझी बाप आणि आई तूच विठ्ठल रखुमाई , तुझ्या शिर्डी नगरात पांढरी ती मी पाहीन , साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // पायी चालत येईन सुख दुख मी सांगीन साई बाबा माझी सारी ती दुख निवारीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //३ // तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन .//२// साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन //५ // श्री सद्चीदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय . आमोल घायाळ १२/१०/२०१२

Thursday, October 11, 2012

मैत्रीण Miscall देऊन वैताग आणणारी, नेहमी Blank Message पाठवणारी , हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल , वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out करणारी, मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून पोट दुखेपर्यंत हसवणारी , काही आगळीक घडली तर सणसणीत मुस्कटात ठेवणारी , आपण न सांगताच आपल्या मनातलं ओळखणारी , कोणाच्याही समोर थट्टा केल्यावरन चिडणारी, थोडीशी Short - Tempered , अशीही एखादी मैत्रीण असावी ..

sai baba old photo

sai nath maharaj ki jai

पण तू माझी नाहीये...... एक वेळ होती कि मी रोज नव्या नव्या मुलीच्या प्रेमात पडायचो पण आत्ता कळाले ते प्रेम नसून आकर्षण असायचं आणि आज मला खर खुर प्रेम झालय आकर्षण आणि प्रेम काय असतं ते कळू लागलय आकर्षण आणि प्रेम जरी वेगळे असले तरी प्रेम हे कायमचे आकर्षण असते ते समजू लागलय तूच आहेस आयुष्य माझ मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो हे आत्ता अनुभवलंय ह्यात तुझ काही चुकले नाहीये , मीच चुकतोय हे मला कळतंय पण काय करू ते कळत नाहीये माझ्या आजारावर औषध नाहीये जे औषध आहे ते माझे नाहीये जगायचं पण मरण अनुभवतोय आणि तुझ्या सोबतीची मागणी पण माझी नाहीये मी तर तुझा झालोय पण तू माझी नाहीये मला तुझ उत्तर माहित आहे पण ते उत्तर माझ्या प्रश्नाच समाधान नाहीये तू दुसर्याच्या घरात प्रकाश पसरवशील तुझ्या दिव्याच्या ज्योतीतली एक किरण पण माझी नाहीये तुझ समजावण अगदी बरोबर आहे पण ते समजण्याची समज माझ्यात नाहीये तुझ्या थांबव्ण्याने मी थांबलो नाही आणि आज सहन करण्याची शक्ती पण माझ्यात नाहीये मी तर तुझा झालोय पण तू माझी नाहीये श्री
फुलपाखर सारखं स्वच्छंद असो की परागकण सारखे बंधिस्त दोन्ही आपल्याच भावना त्या कशी लावायची मनाला ह्या शिस्त ? वार्या सारखं खोडकर असो की झऱ्या सारखे अवखळ जगताना आयुष्य हे सदा का नियमांची ठरते अडगळ? कुणी आपल्यावर प्रेम करावं की आपण त्याच्यावर करावं भल्या पहाटेचं स्वप्न ना ते मग का म्हणून ते अपूर्ण ठरावं ???? कळीचं उमलणं असो सये की असो फुलाचं कोमजणं खरचं किती कठीण असतं ना कुणाचं तरी मन समजणं ?.

कधी आठवण आली तर

रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जे बंध जुळतात, त्या "रेशमी" बंधाला "मैञी" म्हणतात... कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस. . जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस. . कधी भेटशिल तिते एक स्माईलदेउन बोलायला विसरु नकोस. . कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस.
मंतरलेला दिवस मंतरलेल्या त्या रात्री समाधानाची का आज देतायत अनुभूती ..... तेच घर तेच दार तीच चूल त्याच भिंती संसार घरकुलाची आज नवी परिमिती ... तीच पाने तीच झाडे नवे गाणे गाती पक्षी तीच फुले त्याच वेली दिसे मला नवी नक्षी ........ मावळतीचा तो दिन संधीप्रकाश न सांज भेटते का पुन्हा अशी लेवून नवा हा साज नवा दिन नवे स्वप्न राही निराशा ती दूर घडे आज काही नवे गवसला नवा सूर वैशाली
तुझे अन माझे नाते सागरात सामावणाऱ्या निर्मळ नदीसारखे, तुझे अन माझे नाते फुलास बिलगणाऱ्या वेड्या भुंग्यासारखे, तुझे अन माझे नाते चंद्रास एकटक पाहणाऱ्या प्रेमवेड्या चाकोरासारखे, तुझे अन माझे नाते झाडाला कवटाळनार्या कोवळ्या वेलीसारखे, तुझे अन माझे नाते उन्हात सुखावणाऱ्या थंडगार वाऱ्यासारखे, तुझे अन माझे नाते तसेच सर्वांसारखेच तरी निराळे, जमिनीवर राहून सुद्धा आकाशापर्यंत पोचणारे, मनाच्या कुपीत दडवून ठेवलेल्या प्रेमरूपी अत्तरासारखे, असे हे नाते तुझे अन माझे शिंपल्यात जपून ठेवलेल्या सुंदरमौल्यवान मोत्यासारखे....!
मजला आता डोळे तुझिया खुणवत होते स्वप्नामध्ये मला कुणी ते हसवत होते अवघड झाले मला निजाया निवांत आता कोलाहल हा याच मनाचा अशांत आता तिला तसे ते मोहक जगणे अवगत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते झरझर निर्झर असा वाहतो वाटेवर या सूर नवा हा असा छेडती तालावर या धुंदी जगणे मला कधी ना समजत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते तिथे कधी मी तुला भेटण्या आलो नाही या वाऱ्याचा दरवळ मी तर झालो नाही पुन्हा सारे मोह तुझे मज बोलवत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते आज जगाला तुझी कहाणी रुचली नाही मोहक सारी तुझीच काय दिसली नाही उगाच पण ते याच रूपावर भाळत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते लिहून झाल्या माझ्या साऱ्या त्याच कवीता या दुनियेच्या वळणावरती गिरवत कित्ता या शब्दांचे भान मला न राहवत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते निसर्ग ओला जगतो आहे आज दग्याने पाऊस अता पडतो आहे आज नव्याने मला मुक्त ते उडण्यासाठी फसवत होते स्वप्ना मध्ये मला कुणी ते हसवत होते
सवय अजूनही आहे...... तू निघून गेल्यावर तुझी वाट पाहण्याची, सवय अजूनही आहे...... बदललोय मी आता असं म्हणतात सारे विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची सवय अजूनही आहे……!!!! बदललाय मी माझा रस्ता शोधल्यात आता नव्या वाटा पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची सवय अजूनही आहे……!!! रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर आजही वाटतो फिका,चंद्र तुझ्यासमोर अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची सवय अजूनही आहे……!!!! माझा आणि देवाचा तसा छत्तीसचा आकडा आहे… पण गेलोच देवळात कधी तर तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची सवय अजूनही आहे……!!! आताही जागतो मी रात्रभर चांदण्यांनाही झोप नसते क्षणभर मग आमच्या गप्पा रंगल्या की चांदण्यांना तुझ्या गोष्टी सांगण्याची सवय अजूनही आहे……!!! एकटा-एकटा आता राहू लागलोय मी दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही तुझ्या स्वप्नांत जगण्याची सवय अजूनही आहे……!!!

कुणाची तरी सोबत हवी असते

कोड्यात पडले मन वेडे माझे ना विचारांचे उलगडले कोडे लिहिण्यास आज मजपाशी ना उरले होते शब्द मजकडे... कुणाची तरी सोबत हवी असते आपल्या एकाकी विश्वात या कुणाची तरी साथ हवी असते. कितपत हे विश्व वाळवंठ एकांतानेच चालायचे अडखळनार्या पावलांना कितपत स्वताच सावरायचे जळ फळीत ते उन्हाचे झोके कितपत एकट्यानेच झेलायचे आपल्यावर हि प्रेमाची सावली देणार्याला कितपत केवळ अपेक्षेने स्वप्नात पहायचे वास्तव कधी त्याचे होईल का ? स्वप्नात रेखाटलेले चित्र त्याचे सत्यात कधी उतरेल का आशा आणि अपेक्षानाच घेऊन आयुष्याला रेटायचे त्या हि संपत चाल्यात आता पुढ्यातले आयुष्य त्यांच्या शिवायच जगायचे.

जीवन सुंदर आहे जागून पहा

जीवन सुंदर आहे जागून पहा व्यर्थ जाऊ देऊ नका... अपयश आल तर खचू नका त्यातून सावरण्याचा प्रयत्न करा जर आपल माणूस रागवल तुमच्यावर तर लगेच मनवा त्यांना कारण EGO आणि PREMA च्या युध्दात बहुतेकदा EGO जिँकतो! दुःखाच्या विरहात दोघेही जळतात। आणि शेवटी पश्चातापाची राख उरते।

त्रास मला भोगावा लागतो

मनाला एकदा आसेच विचारले का इतका तिच्यात गुंततो ? नाही ना ती आपल्यासाठी मग का तिच ्यासाठी झुरतो ? कळत नाही तुला त्रास मला भोगावा लागतो आश्रूं मधे भिजून भिजून रात्र मी जागतो. ... मी म्हटले मनाला का स्वप्नात रमतो? तिच्या सुखा साठी तू का असा दुखात राहतो ? मन म्हणाले प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा आपण स्वता ला विसरतो सार काही तिच्यासाठी ईतकेच मनाला समजावतो..

मनातुन येणा-या आठवणी

ङोळयातुन येणार पाणी कोणीतरी पाहणार असाव, हृदयातुन येणार दुःख कोणीतरी जाणणार असा व, मनातुन येणा-या आठवणी कोणीतरी समजणार असाव, जीवनात सुःख-दु:खात साथ देणार एक कोणीतरी असाव.....♥ जगायचं असेल अतर सूर्या सारख जागा.. जो स्वतः जळत राहतो मात्र इत्तारांच्या जीवनात प्रकाश आणतो...

आसवांनी मी असा हा भिजत आहे

ठरवल होत खूप काही.... तुझ्या असण्यात मी मला जपाव तुझ्या मोहक रुपात मी मला पहाव ठरवल होत खूप काही.... तुझ्या कुशीत मी हलकेच याव नि तुझा हात धरून क्षितिजाकडे पोह्चाव तुझ्या रडण्यास सखे कधी नव्हते दुर्लक्ष माझ्या रडण्यासही काळोख आहे साक्ष आसवांनी मी असा हा भिजत आहे पावसाचे हे न काही घडत आहे....! स्वप्न माझी ही कुठे का हसत होती? भंगल्याने झोप माझी कण्हत आहे ! का नवे देतेस आश्वासन गुलाबी? हे कमी का रोज मी 'हा' बनत आहे? काय वाटे पाहता धूर जमलेला? मीच आतून हा माझा जळत आहे... काय होकारात काही बदल होते? मी न होकारास त्या हो म्हणत आहे ते कधी हो हारले जे रडत होते? शर्यतीला मी न त्यांच्या पळत आहे... bhannat

भावनांचे पीळ त्या नात्यातले

खरं सांगायचं तर..... आज-काल मैत्री करायचीदेखील खुप भीती वाटते । कारण.... कुणाशीतरी आपल्याला ती, नकळतच बांधून टाकते । बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या नात्यातले, काही केल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देऊन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेऊन जातात । ओलावा त्या डोळ्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली.. पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली मैत्री ही अशी...? हा प्रश्न मला सतावत राहतो । पण मी मात्र सदैव असाच, मैत्री प्रत्येकाशी करत राहतो ॥ आणि त्रास फक्त मलाच होतो .. जीव फक्त माझाच घुटमळतो. हृदय फक्त माझंच जळत ...

जोश्यांची पल्लवी.

एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबतबसला होता. समोरून एक वृद्ध माणूस येतो आणित्यामुलाला विचारतो, काय रे हीच का आपली संस्कृती? मुलगा म्हणतो- नाही आजोबा हि तर जोश्यांची पल्लवी.

पण तुला कसा विसरू

जीवनात अशा काही व्यक्ती येतात आणि अशी नाती बनवून जातात कि ती नाती विसरता येत नाहीत आपलं नातं हि याचपैकी एक आहे - प्रेमाचं मग मी तुला कसा विसरू शकतो! तुझ्या आठवणी हळुवार पावलांनी माझ्या हृदयाचे दरवाजे ठोकवतात माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर तुझीच स्वप्न राज्य करतात मग, मी तुला कसा विसरू शकतो! माझ्या ओठांवर सदैव तुझ्याच गोष्टी असतात डोळ्यात तुझीच स्वप्न हृदयात तुझीच मूर्ती मग, मी तुला कसा विसरू शकतो! तुझ्याविना जगणं, हा विचारच मला सोसवत नाही कारण, माझं अस्तित्व, माझं जीवन माझं आयुष्य, माझं सर्वस्व तुझ्यावरच अवलंबून आहे मग, मी तुला कसा विसरू शकतो! मित्रांसकट तुही म्हणालीस "मला विसर" म्हणून पण तुला कसा विसरू हेच मला कोणी संगत नाही मग, मी तुला कसा विसरू शकतो! तुझा विरह सोसनं म्हणजे माझ्यासाठी तर ती जीवघेणी शिक्षा आहे, तरीही तुझा विरह सोसेन मी पण, पुन्हा बोलू नकोस मला विसर म्हणून कारण मी तुला विसरू शकत नाही! तुला विसरणं माझ्यासाठी फारच कठीण आहे कारण माझं पाहिलं प्रेम तूच आहेस आणि पाहिलं प्रेम विसरणं इतकं सोपं असतं का? नाही ना...... मग तूच संग मला आता मी तुला कसा विसरू शकतो! ╰» श्री • » सर्वांचा लाडका ना मी -

वाट पाहतेय तुझ्या डोळ्यातले अश्रू संपण्याची

पहिल्या नजरेतील प्रेमाची गोष्ट अनेकदा कानावरी आली होती विश्वास बसला होता कथेवरी त्या माझ्याही कथेची सुरुवात आज होती... वाट पाहतेय तुझ्या डोळ्यातले अश्रू संपण्याची वाट पाहतेय विरहातील हूर हूर संपण्याची वाट पाहतेय तुझ्या भेटीची त्या निशब्द सहवासाची वाट पाहतेय त्या बेधुंद नजरेची गोड हास्याची अन न बोलता व्यक्त होणारया त्या विचारांची , वाट पाहतेय फक्त तुझ्यात गुंतून सर्व काही विसरण्याची ........~~ वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा खुपदा तू दूर असून जवळ असल्याचा भास होतो भास झाल्याचा कळल्यावर जीवास खूप त्रास होत

शेवटचे फक्त मला सजना

शेवटचे फक्त मला सजना तुला मन भरून बघायचंय तुझ्या कवेत क्षणभर येवून जगाला थोड विसरायचं आठवते का ग तुला माझी ती गच्च मिठी हळूच जवळीक साधताना ओठांची ओंठाशी झालेली गट्टी

एक जीवाभावाची मैत्रीण असावी,

एक जीवाभावाची मैत्रीण असावी, पण अर्ध्या रस्त्यात सोडून जाणारी नसावी समजून घेणारी, जीवाला जीव देणारी, पण विश्वासघात करणारी नसावी सुखात सामील होणारी, दु:खात धीर देणारी, पण स्वत:चा स्वार्थ साधणारी नसावी केलेल्या चुका समजून सांगणारी- वेळ प्रसंगी ओरडणारी, पण चुकांवर पांघरूण घालणारी नसावी थोडी मस्ती करणारी, लटकेच रागावणारी, पण खरोखरच भांडनारी नसावी संकटाना धैर्याने सामोरी जाणारी, त्याच्याशी लढणारी, पण धीर सोडणारी नसावी एक जीवाभावाची मैत्रीण असावी..............

सहज शब्दांसी गुंफणारा तू

खूप ओढ असते... लाटानाही किनार्याची .... नाही मानत मी त्यातला विरह समजतो रीतच अशी या सागराची होते तुझेच शब्द सारे वेड्या तुझ्याच मनाची व्यथा बोलायचे ना जाणले कोणी हुंदके मुक्या हृदयाचे शब्दच तुझे भाव व्यक्त करायचे... सहज शब्दांसी गुंफणारा तू स्वताच आज तू हरवलास जन्म घेतला होता कवीने त्या अन अस्तित्व स्वताचे तू विसरलास...

किती गोड आहे म्हणून सांगू ती..

किती गोड आहे म्हणून सांगू ती.. किती गोड आहे म्हणून सांगू ती.. एरवी अगदी खळखळून हसते, पण ????? मी हात पकडला की गोड लाजते.. ...जीन्स टी शर्ट रेगूलरी घालते, पण ????? पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते.. साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते, पण ????? मोबाईल मध्ये फोटो काढतो म्हणालो तर नाही म्हणते.. पिज्जा बर्गर सर्रास खाते, चहा मात्र बशीत ओतुनचं पिते.. लोकांसमोर खुप बोलते, मला I Love You म्हणताना मात्र फक्त Same 2 You चं म्हणते. :(

शब्द संपतात तिथे स्पर्श

वेड्या मनाला माझ्या, तुझ्याशिवाय.... आता काही सुचतच नाही... तू तू अन फक्त तूच, त्याच्याशिवाय दुसर काही दिसतच नाही... अबोल हि प्रीत माझी, तुला कधीच कळत नाही... अन वेड हे मन माझ, तुला पहिल्याशिवाय काही राहवत नाही... :) लाटांचे तर कामच असते समुद्रावर येऊन आद्ळायचं क्षणभर किनार्य्ला मिठी मारून जीवनभर विरहात जाळायचं जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करते... ही भाषा शिकावी लागत नाही.... अंतरमनाचे धागे जुळले ना की स्पर्शाची भाषा आपोआपच येते... भांडता भांडता तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर हळूच विसावलेले त्याचे होठ... अन त्याक्षणी एका अनामिक ओढीने त्याला बिलगून तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी तिची मिठी... ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णत्व द्यायची ताकद शब्दांत नाही... तिथे फक्त स्पर्शाचीच भाषा लागते... शब्द या सर्व भावनांना फक्त जन्म देतात... पण त्या खऱ्या अर्थाने "जगायला" ते स्पर्श अनुभवावेचं लागतात.

♥♥♥ फक्त तुझी आठवण ♥♥♥

अनमोल जीवनात साथ तुझी हवी, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा, आले - गेले किती हि, उन्हाळे - पावसाळे तरी हि, न डगमगनारा विश्वास फक्त तुझा हवा..... वेळ लागला तरी चालेल, पण वाट तुझीच पाहीन, विसरलीस तू मला तरीही, नेहमी मी तुझाच राहीन....... तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्या शिवाय माझं जीवन अपूर्ण आहे, तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच शेवट आहेस........ तुझ्या प्रेमाचा सुगंध मला देशील का ? विसरून सारे जग माझ्या पाशी येशील का ?? मला तुझे " प्रेम " हवे आहे, तू मला मरेपर्यंत " प्रेम " करशील का ??? आता तूच सांग या हृदयाचे काय करू, जे फक्त तुझ्या नावाने धडकते, तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण ते भेटण्यास तेवढेच तडपते..... कसे आहे हे जग, अजून समजू शकलो नाही, विखुरलेले स्वप्न एक वाटू शकलो नाही, कदाचित मीच वाईट असणार, जे तुझ्या हृदयात उतरू शकलो नाही....... ♥♥♥ फक्त तुझी आठवण ♥♥♥

किती म्हणून रे लिहावं

तुझी वाट बघून थकलेल्या डोळ्यांना निजवतो आहे, तुझ्या माझ्या भेटीसाठी स्वप्नांचा गाव सजवतो आहे.... किती म्हणून रे लिहावं माझ्या या मनातलं रात्रीला मांडत बसावं जसं चांदण उन्हातलं....... किती म्हणून रे लिहावं मी दुखः हे प्रारब्धातलं जाणून कोण घेतो इथे दुखः माझ्या शब्दातलं किती म्हणून रे लिहावं कागदावरी फक्त साज भेटला न अजुनी सये त्या जखमेवरी इलाज किती म्हणून रे लिहावं लिहायचं म्हणून लिहायचं शब्दांच्या वर्तमानातून का माझ्या भूतकाळात पाहायचं किती म्हणून रे लिहावं आज गुदमरला श्वास हात सुटला लेखणीचा अन डगमगला विश्वास k p bhannat

कांटो को चुबाना सिखाया नहि जाता,

खरी जर होती प्रित तुझी... का केली नाही तु व्यक्त... सदा वाट बघण्यात तुझी... आटले माझ्या देहाचे रक्त कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हाव लागत, दु:खाचे काटे टोचतानाही खळ खळुन हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत, दु:ख असुनही दाखवायच नसत... कांटो को चुबाना सिखाया नहि जाता, फुलों को खिलना सिखाया नही जाता, कोई बन जाता हैं खुद हि अपना, किसीको कहेकर अपना बनाया नही जाता..... दु:खा सोबत एवढी आता सवय झाली जगायची दैवालाही झाली सवय जणू दुखः मागायची

मुंबई त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान

एक होतं गाव. महाराष्ट्र त्याचं नाव. गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. मराठी भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते. त्याचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे. आल्या- गेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे, ते सुरेल करायचे. महाराष्ट्रात होता एक भाग. मुंबई त्याचं नाव. मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले, की इथलेच होऊन राहत होते. "अतिथी देवो भव!' या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. अतिथी जास्त आणि यजमान कमी झाले. मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली. सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. मराठी आपली वाटत नव्हती. प्रश्‍न मोठा गहन होता; पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती. त्यांना एक युक्ती सुचली. दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली. त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील. सर्वांचाच, अगदी महाराष्ट्राचाही विकास होईल म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली. आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली. आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली. आणि मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना, मराठी कोणीच बोलेना, बोली भाषाही बदलली. सगळ्यांचा नुसता काला झाला. शुद्ध, सुंदर मराठीचा लोप झाला. अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर- माफ करा हं- आपल्या मम्मीबरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात एका पुस्तकावर पडला. त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली. त्यांना वाटलं, चला निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल. इतक्‍यात त्या मुलानं विचारलं, (त्याच्या भाषेत) ""मम्मी, कोणत्या भाषेतलं पुस्तक आहे गं हे?'' मम्मी खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती. पुस्तक परत जागेवर ठेवत म्हणाली, ""अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या आजोबांच्या वेळेस मराठी भाषा प्रचलित होती; आता नाही कोणी ती बोलत.'' पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले; पण हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं.

फुला परी आहे रस्ता

जरी आपण दूर तरी प्रेम कमी होणार नाही जीवनात सोबत नसलो तरी मनाने दूर होणार नाही फुला परी आहे रस्ता तरी पाई रुते काटा, आठवणीना येऊ लागे, ओला रंग ओली छटा... दोन पाय किती विसंगत असतात.... एक पुढे नि एक पाय मागे... पुढच्याला गर्व नसतो.... मागच्याला अभिमान नसतो... कारण त्याला माहित असत..... क्षणात हे बदलणार असत... याचंच नाव जीवन असत ..

फकीर साईबाबा

फकीर साईबाबा *साईबाबांचे* मुळ नांव, त्यांचे आई वडील या विषयी कोणालाही माहिती नाही. त्यांचा कालावधी अंदाजे १८३८ ते १९१८ असा मानतात. बाबा कोणाचे आवतार आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. राम-कृष्ण-हनुमान-शंकर-गणपती-गु रु दत्तात्रेय, स्वामी समर्थ, माणिकप्रभू इ. संबंध श्री साईबाबांच्या अवताराविषयी पोचतो. साईबाबांची धुनी, उदी, त्यांचा हिंदु-मुसलमान भक्त परिवार, त्यांचे एकत्रितपणे वागणे, गोरगरीबांविषयी करुणा, हे ध्यानात घेता त्यांना दत्तावतारात स्थान देण्यात आले आहे. साईबाबा हे नाथपंथीय दत्तात्रेयांचे अवतार असल्याचे अनेकांना मान्य आहे. पुढे चांदभाईंच्या घरी लग्न कार्य झाले. त्यांचे वऱ्हाड शिरडीस येणार होते. त्या वर्हाडाबरोबर हा तरुण फकीर शिरडीत आला. प्रथम खंडोबाच्या देवळात गेला. तेथे वडाच्या झाडाखाली चिलिम फुंकत बसले असता देवळाचे मालक म्हाळसापती सोनार तेथे आले. त्यांनी फकीरास पाहून ।।आवो साई।। असे म्हटले. तेव्हापासून फकीर साईबाबा म्हणून ओळखू लागले. बाबांचे वागणे- बोलणे वरवर पाहता वेड्यासारखे होते. हातात पत्र्याचे टमरेल, मळकट कापडाची झोळी, अंगावर एखादी कफनी अशा वेशात बाबा भिक्षा मागत. खाण्या पिण्याची शुद्ध त्यांना नव्हती. काही दिवसांनी ते पडक्या मशिदीत राहू लागले. त्यांच्या वास्तव्याने हीच जागा पुढे ।। व्दारकामाई।। म्हणून प्रसिद्ध झाली

शरण मज आला आणि वाया गेला

परमात्म्याच्या १/१०८ अंशापासून शिवात्मे ,ब्रह्मा विष्णू आणि शंकर निर्माण झाले .परमात्मा म्हणजेच प्रजापतीब्रह्मा परमशिव ,आणि महाविष्णू . बाबा म्हणजे परमशिव ! शिव म्हणजे शुद्धता संपूर्ण पावित्र्य शरण मज आला आणि वाया गेला ,हे ज्याचे वचन आहे आणि मी तुला कधीच टाकणार नाही हे वचन देणारा सद्गुरू आपल्या भक्ताची भक्ती जरी १ अंश असेल तरी ती १०८ अंशापर्यंत कशी पोचेल हे पाहत असतो .

तुझ्या नजरेतून स्वतःला पाहिले..

आत्ता हि तू माझी आहे अन पूर्वी हि माझीच होतीस.. फरक फक्त इतकाच तू तुझ्या नजरेतून स्वतःला पाहिले.. अंदाज घेतला नाही आजूबाजूचा सावलीला स्वतः समजत होतीस.. शोधलेस जरी कितीही तरी तूच तू भेटशील असे हृदयात तुला जपले. नुसते तुझेमाझे करण्यात धन्यता काय कामाची ? इतरांसाठी झिजवताना आयुष्य खरी किंमत कळते घामाची ! ----------

शिर्डीचे श्री साईबाबा (इ.स. १८३६-१९१८)

शिर्डीस ज्याचे लागतील पाय l शिर्डीचे श्री साईबाबा (इ.स. १८३६-१९१८) श्री बाबांचा जन्म महाराष्ट्रातील पाथरी या खेड्यात भुसारी कुटुंबात झाला. पण ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन एका मुस्लीम फकिराने केले. नंतर बारा वर्षे त्यांनी योग्यांच्या सहवासात राहून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. साधना करण्यातही त्यांनी काही काळ व्यतीत केला. नंतर ते हुमणाबादच्या श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना आशीर्वाद मिळून शिर्डी येथे राहण्याची त्यांना आज्ञा झाली. माणिक प्रभू यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले होते. प्रभू हे प्रत्यक्ष परमेश्वरच होते. बाबा त्यांना मानत होते. औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावची चांदभाई ही एक श्रीमंत व्यक्ती. औरंगाबादची सफर करण्यास चांदभाई गेला असता त्याची घोडी हरवली. त्याने सर्व जंगल शोधले, परंतु घोडी त्याला सापडली नाही. निराश बनून खोगीर पाठीवर मारून तो परत जाऊ लागला. एवढ्यात ''चांदभाई !'' अशी हाक त्याच्या कानी आली. त्याने झटकन मागे वळून पाहिले. त्याच्या दृष्टीस एक तरुण फकीर दिसला. अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी. ''इकडे ये.'' अस म्हणून तो फकीर एका झाडाखाली बसला. 'याला माझे नाव कसे माहित? याला मी पूर्वी कधी पाहिलेलं नाही!' असा विचार करीत तो त्यांच्याकडे गेला. ''बराच थकलेला दिसतोस ! बैस जरा. चिलीम पिऊन जा. काय रे, हे खोगीर कसे तुझ्याकडे?'' तो म्हणाला, ''माझी घोडी हरवली आहे. ती सापडण्याची आशा उरलेली नाही ! सर्व जंगल धुंडाळले!'' बाबा म्हणाले, ''ते पलीकडे कुंपण आहे. तिथ जा. तुझी घोडी सापडेल.'' चांदभाई तेथे गेला. त्याची ती हरवलेली घोडी तेथेच चरत होती. ''या अल्ला, माझी घोडी सापडली.'' चांदभाईला आनंद झाला. ती घोडी घेऊन तो फकिराकडे आला. फकीर तंबाखू चुरीत होता. ''सापडली न घोडी! आता चिलीम ओढ!'' फकिराने चिलमीत तंबाखू भरली. ''पण ही पेटवणार कशी? इथे विस्तव कुठे आहे? शिवाय छापी भिजवायला पाणीही नाही.'' चांदभाई म्हणाला. फकिराने हातातील सटका जमिनीत खुपसताच आग उत्पन्न झाली. त्यातून रखरखीत निखारा बाहेर काढला. सटका जमिनीवर आपटताच त्यातून पाणी निघू लागले. छापी भिजवून ती पिळली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. चिलमीतील तंबाखूवर तो प्रदीप्त निखारा ठेवला. फकिराने चिलीम स्वतः ओढून चांदभाईला ओढण्यास दिली. चांदभाई स्तिमित झाला. त्याने त्या फकिराच्या पायावर मस्तक ठेवले. ''अल्ला मलिक !'' असे म्हणून बाबांनी चांदभाईला वर उठवले व ''अल्ला भला करेगा'' असा आशीर्वाद दिला. ''बाबा, तुम्ही माझ्या घरी चला !'' ''जरूर येईन मी !'' चांदभाई तिथून निघाला. दुसऱ्याच दिवशी तो फकीर धूपखेडे गावात गेला व चांदभाईच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. चांदभाई खुश झाला. फकिराचे त्याने आदराने स्वागत केले. उत्तम प्रकारे आतिथ्य केले. काही दिवस तो फकीर त्याच्याकडे राहिला. नंतर चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याची सोयरिक शिर्डीच्या एका मुलीशी झाली, तेव्हा तो फकीर चांदभाईच्या विनंतीला मान देऊन लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीस आला. वऱ्हाड घेऊन आलेल्या गाड्या खंडोबाच्या देवळापाशी असलेल्या मळ्यात थांबल्या. सर्वजण गाड्यातून उतरले. तो फकीरही उतरला व खंडोबाच्या देवळात गेला. तिथे म्हाळसापती खंडोबाचे भक्त पुढे आले व आदराने म्हणाले, ''या साई!'' तो तरुण फकीर म्हणजेच साईबाबा. बाबा शिर्डी येथेच राहत. शिर्डीमध्ये ते भिक्षा मागण्यासाठी फिरत. त्यांना कोणी त्यांच्याबद्दल विचारले असता, ''हम तो साई है, बहुत दूरसे आये है!'' असं ते सांगत. एकदा धुळ्याचे श्री. नानासाहेब जोशी शिर्डीस आले. त्यांनी बाबांना विचारले, ''तुमचे नाव काय?'' यावर बाबा म्हणाले, ''मला साईबाबा म्हणतात.'' बाबा कधी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसत, तर कधी तिथल्या पडक्या मशिदीत जाऊन बसत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना व चार वर्णांना तिथे सर्वच द्वारे खुली असतात. त्या परम पवित्र मंगल स्थानाला तत्त्ववेत्ते विद्वान 'द्वारका' म्हणतात. साईबाबा एक रात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकारी चावडीत राहात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत येत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. तेथे शिरताना समोरची जी भिंत दिसते ती कृष्णाची. गोपालकृष्ण गोकुळात गोपालांसह काल्याचा आनंद उपभोगीत. बाबासुद्धा नाना प्रकारच्या जिनसा आणून त्या एकत्र करून एका मोठ्या हंडीत चांगल्या शिजवून आपल्या भक्तांना स्वतः वाटीत असत. एकदा चुलीजवळ शंभराहून अधिक माणसांना पुरेल इतकी मोठी हंडी शिजत होती. चुलीखाली लाकडांचा जाळ धगधगत होता. बाबा आपल्या एका भक्ताला म्हणाले, ''अरे, बघत काय राहिलास? जरा ती हंडी ढवळ!'' तेव्हा तो भक्त उलथणे शोधू लागला. बाबा झटकन त्या हंडीकडे गेले व आपल्या कफनीच्या अस्तन्या वर करून आपला उजवा हात कोपरापर्यंत त्यांनी त्या हंडीत घातला व ते पदार्थ ढवळू लागले. बाबांच्या हाताला काही झाले नाही. बाबांचे जीवनकार्य हा एक चमत्कार होता. बाबांना दीपोत्सवाची मोठी हौस होती. बाबा टमरेल घेऊन दुकानदार वाण्यांकडे जात व त्यांच्याकडून तेल मागून आणत. पण त्यांना ते मनापासून देत नसत. बाबा ते तेल पणतीमधे भरी. चिंध्या काढून त्याच्या वाती वळीत. रात्री त्या मशिदीत पेटवित. त्या रात्रभर जळत असत. दिवाळीचा सण होता. बाबा नेहमीप्रमाणे सर्व दुकानदार वाण्यांकडे गेले. त्यांना कुणी तेल दिले नाही. ''आज तेल नाही. संपले.'' असेच त्यांना सर्वच दुकानदार वाण्यांनी सांगितले. बाबा निमूटपणे मशिदीत आले. आता हा फकीर मशिदीत कशा पणत्या पेटवतो हे पाहण्यासाठी ते सर्वजण मशिदीसमोर जमले. बाबांनी त्यात पाणी ओतले. आणि कांडे ओढून ते एक एक पणती पेटवू लागले. मशिदीत दीपमाळा उजळली. मजा पाहण्यासाठी आलेले दुकानदार बाबांच्या चरणी लीन झाले. आजारी माणसे, रोगपीडित माणसे बाबांकडे येत. बाबा त्यांना वनस्पतींपासून स्वतः बनवलेली औषधे देऊन बरे करीत असत. जेव्हा जास्तच गर्दी वाढू लागली, तेव्हा बाबा औषधाऐवजी धुनीची उदी सर्वांना देऊ लागले आणि आलेले बरे होऊ लागले. भक्तांचे दुःख आणि दुखणे आपल्या अंगावर ओढून ते स्वतःच भोगीत असत. पुष्कळदा ते अनेक व्याधींनी जर्जर असत. भक्तांचे दुर्धर असाध्य रोग आपल्या अंगावर घेऊन ते भयंकर शारीरिक दुःख स्वतःच भोगीत. दाह व वेदना ते सहन करीत व भक्तांना वाचवीत. बाबा भक्तांना त्यांच्या स्वप्नात आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना उदी लावीत असत. बाबा भक्तांच्या संकटसमयी त्यांना सहाय्य आणि दिलासा देण्यासाठी दिशा आणि काळाची बंधने तोडून हजारो मैलांवर तत्क्षणी प्रकट होत. आपल्या असंख्य भक्तांना निरनिराळ्या रूपांनी प्रकट होऊन बाबांनी वाचविले आहे. पुढे बाबा आजारी पडले. त्यांचे दुखणे प्रबळ झाले. भक्त तळमळू लागले. १५ ऑक्टोबर १९१८ हा दिवस उजाडला. त्या दिवशी विजयादशमी होती. बाबांची अवस्था कठीण होती. काही क्षणानंतर बाबांनी जवळच बसलेल्या बयाजी अप्पा कोते यांच्या अंगावर डोके टेकले. संपले सारे ! शिर्डीस ज्याचे लागतील पाय l टळती अपाय सर्व त्याचे ll माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे ll मी साई चा सेवक आहे माझ्या सर्व शुभ कामात साई चा आशीर्वाद आहे

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे गालातल्या गालात हसणारं, भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं, कुणीतरी असावे पैलतीरी साद घालणारं, शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं, कुणीतरी असावे, चांदण्यांच्या बरोबर नेणारं, अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं, कुणीतरी असावे, फ़ुलांसारख फ़ुलणारं, फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं, कुणीतरी असावे आपल्या मनात रमणारं, पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणार

शिर्डीचे साईबाबा की सोन्याचे साईबाबा ???

शिर्डीचे साईबाबा की सोन्याचे साईबाबा ???
पडक्या मशिदीमधे फाटक्या चिंध्याने बांधलेले फळकुटावर झोपणारे , अत्यंत साधी रहाणी असणारे साईबाबा आणि आता कथाकथीत भक्तांनी त्यांना सोन्याने मढवुन टाकलेले त्यांचे रुप. बसायला सोन्याचे सिंहासन, सोन्यानी मढवलेला महाल, सोन्याची छत्रचामरे, सोन्याच्या पादुका, वेळ बघायला सोन्याचे ११ लाखाचे घड्याळ, सोन्याच्या पादुका आणि फिरायला सोन्याची पालखी. तरी नशीब चांगले अजुन तरी साईबाबांची संपुर्ण सोन्याची मुर्ती करण्याचे कोण्या धनवान भक्ताच्या मनात आलेले नाही. एक जमाना असा होता, शिर्डी एक खेडेगाव होते, अगदी तुरळक भावीक मंडळी यायची आणि त्यांची रहाण्याची सोय चक्क समाधी मंदिरात वरच्या मजल्यावर असलेल्या खोल्यांमधे केली जायची. आणि मग हळु हळु देवस्थानाचे रुपांतर संस्थानात, एका साम्राज्यात होत गेले. म्हणतात ना @शिर्डी वोही जाते हे जिन्हे साई बाबा बुलाते हे@ एक साईभक्त

हर एक फ्र्येंड जरुरी होता है ....

दोस्त प्यार से भी बडा होता ही हर सुख और गम मे साथ होता ही तभी तो क्रिष्ण राधा के लिये नही तो सुदामा के लिये रोता है........ क्योंकी हर एक फ्र्येंड जरुरी होता है ............. इसलिये दोस्तो प्यार मत करो दोस्ती करो ......... वही जिंदगीभर साथ देती है ..... आमोल घायाळ ११/१०/२०१२

लाज वाटते मज आता

अनाथ मुलीचे मनोगत) ... झाले मी मोठी आता कळले मज सारे काही पण ममता ,आपलुकी तुझी कधी मिळालीच नाही कशी सोडलीस तू मला इवलीशी मी असताना काहि कसे वाटले नाही रडणे माझे ऐकताना लाज वाटते मज आता तुजला आई म्हणताना काय माहित तुला, कशा भोगल्या मनाच्या यातना नको आई, नको बाबा नको मला कोणीही अनाथ आहे मी तरी पाठीशी आहे माझा हरी .

मैत्रीचे प्रेम मिळवण्यासाठी

कोणी म्हणत मी खूप कठोर स्वभावाचा आहे तर कोणी म्हणत मी खूप मृदू भाषिक आहे Attitude म्हणतात ज्याला तुम्ही सर्व जन इंग्लिशमध्ये जाणून बुजून त्याला दूर सारून जगतो मी "त्याच" धुंदीमध्ये करत आलो नवनवीन प्रयत्न मित्रांना आपले करण्यासाठी प्रेमाचा स्वार्थ साधला मीही मैत्रीचे प्रेम मिळवण्यासाठी हटके असतात निर्णय माझे सहजच त्याला एकमत मिळतो तुटत असेलही मन एकाचेतरी समजावण्याचाही प्रयत्न मी करतो मीच कधी जाणून घेतला नाही कसा आहे माझा स्वतःचा स्वभाव तुम्हीच आजवर सांगत आलात आपलेसे करतात तुझे हरेक हावभाव कवितेतून सागण्याचा माझा मित्रांनो हा पहिलाच केलेला आहे प्रयत्न दाद मागण्याची अपेक्षा नाही करणार कारण स्वतःस मानत नाही मी रत्न ;) एम.डी.♥

हृदयात नाव माझे आहे.

गळ्यात मंगळसूत्र जरी त्याचे असेल, तरी डोळ्यात काजळ माझे आहे. ओठावर नाव जरी त्याचे असेल, तरी हृदयात नाव माझे आहे. सहवास त्याचा असला, तरी प्रेमाचा सुवास माझाच आहे. राहत असली जरी त्याच्या सोबत, तरी प्रेमाच्या आठवणी माझ्याच आहेत
काय असतात ना ही नाती काही मनापासुन जोडलेली तरं काही सहज तोडलेली…….. काही जिवाभावने जपलेली तर काही नुस्तीच नावापुरती उरलेली…….. काही नितळ प्रेमासाठी जगलेली तर काही बांन्डगुळासारखी दुस-याच्या जिवावर वाढलेली…….. काही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली तर काही भितीपोटी गुपितासारखी लपवलेली…….. काही मैत्रीच नाव दिलेली तर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव असलेली…….. काहि ओझ्यासारखी वाहीलेली तर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी जपलेली…….. काहि नकळत मनाशी जुळलेली तर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली…….. काहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली तर काही उराशी जिवापाड सांभाळलेली…….. काहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली तर काही मान-अपमानाच्या ओझ्याखाली दबलेली…….. काही मोत्याहुन अनमोल ठरलेली तर काही भंगारासारखी विकाया काढलेली…….. काय असतात ना ही नाती काही मनापासुन जोडलेली तरं काही सहज तोडलेली…..
आमोल घायाळ १०/१०/२०१२
भन्नाट च्या प्रगतीचे पुढचे पाऊल पडले... आणी मौज-मजा करायला सगळे भन्नाट कर खंडाळ्याला जमले. नवीन ओळखी, भरपूर उत्साह आणी मिटिंगची हौस... या साठी ठिकाण ठरले लोणाव्लाची कार्ले भाजे लेणी नाच-गाणी - धूम-धडाका - मस्ती सगळ्यांनी केली... त्यातच रविवार दिवस , पूर्ण उलटून निघणार अंताक्षरी -नाटक खेळून सगळ्यांना लागली खूप भूक... पण tension not! कारण बाग मध्ये होता खाऊ पोटोबा भरल्यावर खेळ पुन्हा रंगला... दुर्गेश नि दर्शना च्या नाटकांनी stage परत एकदा सजला. एक-एक करत सगळे stage वर जमले... आणी प्रत्येकाला वेगळे-वेगळे steps सुचू लागले. टीपी करता करता रविवारचा दिवस संपायला आला सूर्य पण भन्नाट चा उत्साह पाहून परतीला निघाला जरी पहिल्यांदाच जमले होते सगळे at खंडाळा... तरी सकाळी फिरायला जायचा नव्हता कोणाला कंटाळा. रविवारी सकाळी लोणावला स्टेशन वर सगळे जमून आले... त्यानंतर लगेचच सर्वांनी फोटो काढण्यास पोज देऊन उभे राहिले बघता बघता वेळ झाली सगळ्यांना bye - bye म्हणायची... आणी झकास ग्रुप फोटो काढून आप-आपल्या घरी परतायची. भन्नाट चा ग्रुप हळू-हळू वाढतो आहे... पुढची ट्रीप कधी ठरते...त्या मेलची आतुरतेने वाट बघतो आहे एक भन्नाटकर आमोल घायाळ;

प्रेमाचे फुललेले प्रेम फुल..

प्रेम... एक छान संवेदना.... त्यात तुझ्या नि माझी गुंतल्या भावना, प्रेम... वाळक्या लाकडाला फुटलेली नवी पालवी.. माझी प्रत्येक रात्र तुझ्या आठवणीत जावी... प्रेम... निर्जल झऱ्याला आलेली पाणवल.. तुझ्या माझी प्रेमाचे फुललेले प्रेम फुल.. प्रेम... ओसाड जमिनीवर आलेली एक हिरवळ ... तुझ्या माझ्या प्रेमाची अशीच फुलत राहो कातरवेळ

तुझे नि माझे मिलन सख्या

दु:खा सोबत एवढी आता सवय झाली जगायची दैवालाही झाली सवय जणू दुखः मागायची तुझे नि माझे मिलन सख्या या जन्मी शक्य नाही पुढचा जन्म तुझाच असेन देवाला दुसरे मागणे नाही नव्हते वावडे माझे कधी त्या फुलांशी जोडली नाळ नाही कोणती त्या जगाशी... तू मला सांग मी कोठे भरू भूक माझी? मी जिथे जाय येती हे तिथेही उपाशी....

Thursday, August 23, 2012

टाळले साऱ्या दिशांनी

टाळले साऱ्या दिशांनी
जाऊ कुठे मी भगवन

दाटला अंधार सारा
पाहू कसे रे भगवन

वेधले दु:खाने इतुके
साहू किती हे भगवन

कुठे दिसेना तुझा ठाव
पाहू किती हे भगवन

दाही दिशा दूर गेल्या
धावू किती हे भगवन

दाखव रे मार्ग तूच आता
तुजविण मज कोण रे भगवन

रंग माझा तुला, गंध माझा तुला

रंग माझा तुला, गंध माझा तुला,
बोल काही तरी, बोल माझ्या फुला
सांग लाजूनही नाव आता तरी
एक खोळंबले गीत माझ्या उरी
अन वसंतास शब्द मी माझा दिला
वेळ जादू भरी ही गुलाबी हवा
ही न मेंदी तुझी रंग माझा नवा
भास झाला खरा, श्वास झाला खुला
हाय माझी-तुझी भेट झाली अशी
शीळ यावी पुढे चांदण्यांची जशी
सांग सोडू कसा हात हातातला
बोल काही तरी बोल माझ्या फुला
आमोल घायाळ

मी तुझ्या प्रेमात पडलेय रे.

पण मला असं का होतेय?
लक्ष लागत नाही, झोप येत नाही,
तुझी नुसती आठवण जरी आली,
तरी गझल ऐकावी वाटते? का?
हे आकर्षण नाही हे तर प्रेम आहे.....
होय हेच मी तुला सांगतेय बुद्धू मी तुझ्या प्रेमात पडलेय रे.

कर मला , ती परत ,माझी कविता

वेदनांचे बारसे झालेच नाही...
दु:ख माझे अजुनी व्यालेच नाही...

हुंदक्यांची मागणी,पूरऊ कशी?...
आसवांचे मोर्चे निघालेच नाही...

तू मला दिलेले,संपले सर्वकाही....
गंध पण श्वासातले,उडालेच नाही...

वाचले तुझे डोळे,ऐकले शब्द हि.....
तुझिया मनातले पण कळालेच नाही...

कर मला , ती परत ,माझी कविता ,
शब्द माझे जे कधी कुरवाळलेच नाही!!!

देईन तुला माझे,सूर्यहि उगवायला....
ये परत मजकडे, जर उजाडलेच नाही....

ग्रंथ त्यांनी तुक्याचे,पाण्यात सोडले...
'अभंग' पण तयाचे बुडालेच नाही....

दारावरीच माझे,लाख सत्कार झाले...
पण 'आत ये' कुणीही म्हणालेच नाही...

थांबलेली ज्यांसाठी,माझी अंतयात्रा...
निरोप आला,ते घरून निघालेच नाही....

क्षण चालले, दिन चालले, अन् चालले आयुष्यही

क्षण चालले, दिन चालले, अन् चालले आयुष्यही
जगणे न हे जगणे मुळी, ना खेदही ना खंतही

आकाश हे माथ्यावरी, आहे जसे, होते तसे
येतात अन् जातातही, घन सावळे, घन शुभ्रही

इतुके कसे हे एकसे , दिसतात सारे सोबती
हे चेहरे आहेत अन् हे चेहरे नाहीतही

या चुंबनातुन कोण ते, तू जहर हे आहे दिले ?
फुलते कसे गाणे पुन्हा, ह्या पोळल्या ओठातही ?

क्षण चालले, दिन चालले.... पण थांबलो मागेच मी
आता नको, ठेऊस तू, मजला तुझ्या स्मरणातही

सुप्रभात.

दंवात चिंब भिजलेली पायाखालची हिरवळ बकुल, जाई,
सोनचाफ्याचा मंद, नाजुक दरवळ इवल्या पाखरांना झुलवणारा
लेकुरवाळा औदुंबर जरतारी शेला पांघरलेला लोभस गुलमोहर
मोती पोवळे प्राजक्त रांगोळी, कोवळं सोनेरी ऊन

रात्रीच्या स्वप्नांचा आस्वाद अजूनही
डोळ्यांच्या कडेवर रेंगाळतोय मन अजूनही त्या प्रदेशातून
बाहेर पडायला कानकुण करतंय रात्रभर उशाशी बसलेला हवाहवासा
अंधार आता रजा घेतोय आणि तेवढीच हवीहवीशी सूर्यकिरणं ...

आमोल घायाळ

आज तुझा वाढदिवस आहे

आज तुझा वाढदिवस आहे,
प्रत्येक श्वास माझा,
देई शुभेच्छा तुला,
कोमेजुनी न कधीही,
जायचे तू फुला, हीच प्रार्थना ईश्वराला....
जरी दूर तू ग तरी न दुरावा,
तुला आठविता तुझा गंध यावा,
सुखाचा तुझा गोड संसार व्हावा,
हीच प्रार्थना

आमोल घायाळ

Wednesday, August 1, 2012

मनात लपलेले गुपित

असे कसे जीवन देवा भलतेच खेळ खेळते, कंटाळून मग माणसाचे लक्ष तुझ्याकडे वळते मनात लपलेले गुपित नेमके पावसालाच कळावे आठवणीच्या या सरीत अश्रूनीच पावूस व्हावे

दानात दान श्रेष्ठ ते

लिहिले किती फलक तू तुझ्या मोतियाच्या अक्षरी बोल थोर ते जयांचे आणिले त्यासी तू दारी दानात दान श्रेष्ठ ते रक्तदान या भूवरी केलीस तू सुवर्णजयंती दानाची या आजवरी घेतले बोध कितीकांनी सद्विचार मनी बहु धरी जगले कितीक रुग्ण ते तुझ्या रक्ताच्या थेंबावरी धन्य तुझी ही निष्ठा बांधिलकी समाजापरी आठवेल पहाता फलक आता तू चाललास तरी घेशील वाहून पुन्हा तू नव्याच कुण्या कार्यावरी कृपा राहो अशीच प्रभूची सदा राजेंद्रा तुजवरी

बहाणे हवे असतात जवळ येण्यासाठी,

मनी भावनांचा कल्ळोळ.. हृदयात सामावली सखी.. अंगणी चांदण्यांचा सडा.. तरी एक चंद्र एकाकी. नात्याला आजमावताना... अविश्वासाने साधला डाव... तुझ्या माझ्या नात्यावर.. मारला एकच घाव.. बहाणे हवे असतात जवळ येण्यासाठी, नाहीतर कारण काय भांडण होण्यासाठी ?? गणेश हसण्यात मजा आहे

जीवघेणा खेळ तुझा लावून जीव गेला

जीवघेणा खेळ तुझा लावून जीव गेला जाणून अमृत लावला ओठी विषाचा पेला रोजचेच सखे तुझं.. वेड्यासारखं असं वागणं.. माझ्यावर रागावून मग.. रात्र रात्र जागणं.. तू सोबत नसलीस.. तुझ्या आठवणी सोबत असतात.. क्षणोक्षणी त्या देखील.. तुलाच शोधत असतात.. माझ्याच सावली ने जेव्हा.. माझी साथ सोडली.. तेव्हाच मला सखे या जगाची रित कळली..

प्रेमाबाद्ल्यात प्रेम मिळो

ठावूक आहे मला तू, माझा कधी होणार नाही ; तुझ्यावर जडलेल्या मनाला आत्ता मी वळवणार नाही प्रेमाबाद्ल्यात प्रेम मिळो नाही कसलीच अपेक्षा जिथे असशील सुखी रहा हीच ईश्वरचरणी इच्चा घायाळ शब्दांनी कधी व्यथा माझी मांडली होती फाटलेल्या कागदावर थोडी शाई त्यांनी हे सांडली होती

ती आली आयुष्यात की

विचार आला मनात झाड लावायला हव, त्यासाठी कोणते तरी कारण मग शोधायला हव. वाढ दिवस ठरला मग पण तो वर्ष्यात एक वेळ, हिशोब करता झाडाचा त्याचा चुकत होता मेळ. मग म्हणल रोजची गोष्ट काय बर असेल, प्रियसीची पहिली भेट छान वेळ ठरेल. ती आली आयुष्यात की अंब्याच झाड आम्ही लावलं, तुटल जेव्हा प्रेम त्यावेळी तिने कडूनिंबाच रोप आणल. अस करत वर्ष्यात एका एक वनराई माझी बनली, पाणी अडून झाडामुळे झरे वाहू लागली. विधान सभेत गेले नाव म्हणे याला पुरस्कार द्यावा, नावासोबत पेपर मध्ये फोटो पण एक हवा. फोटो पाहून पेपर मध्ये पोरी अजून इम्प्रेस मग झाल्या, भेट झाली आमची की आठवणीचे झाड लावू लागल्या. लोक म्हणली मनात मग आईला....हें कारण लई मस्त, रोज रोज नव येत आयुष्यात अस फक्त प्रेमच तर असत....

रंग उडालेले आयुष्य माझं...

रंग उडालेले आयुष्य माझं... तु पुन्हा रंग भरशील का.? त्या साठी तरी निदान.. तू पुन्हा येशील का..? सरली ती वेळ.. पुढे सरकला काळ.. प्रत्येक रात्री मागुन.. उजाडते रोज नवी सकाळ... नात्याला आजमावताना... अविश्वासाने साधला डाव... तुझ्या माझ्या नात्यावर.. मारला एकच घाव.. तुझ्यावरचं माझं प्रेम... ओठांनी जरी सांगत नसलो... त्याच प्रेमापायी मी... या शब्दांच्या जाळ्यात फसलो... आज माझ्या शब्दांना.. बघ कशी मिळाली चालना.. मी रोजच बोलतो गं... आज तू काही बोलना..

त्या आठवणी..

त्या आठवणी...... सखे मी प्रयत्न खूप केले, यश कधीच नाही लाभले. कायमचं विसरून जाणे, मज कधीच नाही जमले. सखे खूप अशक्य आहे ग, तुजला मनातून दूर लोटणे. जणू माझ्या या श्वासानीच, बंद करावे आज श्वास घेणे. कधी विसरू नाही शकणार, या सहवासातल्या क्षणांना. जाग्या होतात त्या आठवणी, मी एकांतात कुरवाळताना.

Monday, May 14, 2012

एकदाच मला भेटशील का....थोडं ऐकून घेशील का..

वेळ असेल तुला तर एकदाच मला भेटशील का.... दोन शब्द बोलायचे होते थोडं ऐकून घेशील का...?... पूर्वी तू माझ्याशी खुप काही बोलायचीस वेळ नसला तरी माझ्यासाठी खुप वेळ काढायचीस तासन तास माझ्याशी खुप गप्पा मारायचीस नसले विषय तरी नविन विषय काढायचीस... काही ही बोलूंन मला खुप खुप हसवायचीस माझा फ़ोन एंगेज असला की खुप खुप रागवायचीस आता कशाला आमची गरज पडेल असं म्हणून सारख चिडवायचीस, माझा चेहरा पडला तर खुप नाराज व्हायचीस मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचीस... आज ही मला तुझा प्रत्येक क्षणी भास होतो का गं अशी वागतेस का देतेस त्रास नाही पुन्हा भेटणार एकदा बंद पडल्यावर माझा श्वास शेवटचं एकदाच भेट मला पुन्हा नाही देणार त्रास... वेळ असेल तुला तर एकदाच मला भेटशील का दोन शब्द बोलायचे होते थोडं ऐकून घेशील का... शेवटचं एकदाच मला भेटशील का....?

प्रेमाचा सुगावा

प्रेमाचा सुगावा पहिल्या प्रेमाचा मज लागला सुगावा सांगा कुणी कांगावा का केला नसावा घास प्रीतीचा कुणीच भरवला नसावा खाल्ल्या मिठाला तो जागला असावा विसावला हि इथंच कुठ तरी असावा ठसा पावलाचा, मजलाच का दिसावा डाव नियतीचा असा उधळला असावा सांगावा कुणी का मज धाडला नसावा आशेचा घेऊन किरण उगवला असावा निशब्धच पाहून तो हि हसला असावा माझाच विषय मजला कळला नसावा आशय धुंडाळताना देह गळला असावा मज सम अभागी मीच एकटा असावा नाशिबाने जगी दुसरा कुणी ही नसावा

तुझी आठवण येते तेव्हा..

तुझी आठवण येते तेव्हा.. देवा एकाच मागणी तिची पापणी भरू दे माझ्या नावाचा एक तरी थेंब तिच्या नयनी तरु दे.. रात अशी ही तंद्रित पापणिहि बघ लवते आहे ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे तुझी आठवण येते तेव्हा तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो तु येणार नाहीस माहित असतं डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो.. एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल, असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत असेल तू समोर असतेस तेंव्हा बोलू देत नाहीस | तू समोर नसतेस तेंव्हा झोपू देत नाहीस || तो ढग बघ कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही. जोपर्यंत त्या गीताला तुझ्या ओठांचा स्पर्श नाही. येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही. आज सारे विसरली तू नावही न येई ओठांवर..... कसे मानू तू कधी खरे प्रेम करशील कुणावर...... तेव्हा सागर किनारी साक्षीने तू घेतल्यास किती शपथा..... किती मारल्यास मिठया तू तो चंद्र ढगात लपता........ नजरेत जरी अश्रू असले तरी ओठावर हास्य असाव ओठावरच्या हास्यामागे नजरेतल्या अश्रूना लपवाव. कसे करू माफ़ तुला जे घाव तू मला दिले...... घेऊन माझी फूले तू काटेच मला दिले...... डोळे पुसण्यास माझे पाऊस धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच कळेना म्हणाला. आज पुन्हा तुझी आठवण आली आणि मी उगीच हसु लागलो खोटं खोटं हसताना... कळलेच नाही, कधी रडु लागलो... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर मनातला प्रत्येक क्षण ओठांवरती येईल का? ओठांवरील प्रत्येक शब्द मनातच राहील का?

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो , ती एक देवाची सुंदर कलाकृती असते . तो अंधारावर मिळविलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते . आणि आपल्या आयुषातल्या नव्या दिवसाची आणि नव्या ध्येयाची सुरवात असते .ll शुभ प्रभात ll

***आठवतेय ती शाळेची घंटा...

***आठवतेय ती शाळेची घंटा... घंटा वाजली की मन असे फिरायचे, जाऊन बसावे परत त्या बाकांवरती असा हट्ट करायचे, ती वेळ आणि ते वय परत नाही येणार कधी, मग एकटेच ती खंत करत बसायचे... आज नाहीये काही अधिक पण बाकी सगळे वजा, वर्गात केलेली मस्ती आणि बाईंनी दिलेली सजा, Computer आणि Calculater च्या युगात अगदी विसरलोय पाढयांची मजा, पाढे पाठ नाही झाले म्हणून कधी घेतलेली रजा... आज ऑफिसच्या कामातून वेळ पुरतच नाही, भंडावले डोके काही कळतच नाही, म्हणून आठवतोय ते शाळेतील खेळ, कधी कब्बडी, कधी खो-खो आणि शाळे समोरील भेळ... जेव्हा नसायचे वर्गात लक्ष, पण परीक्षेत मात्र झोप उडायची, मग एन वेळी मित्राच्या साथीने थोड़ी कॉपी करायची, होइल यावर पास याची खात्री मात्र असायची, पण तरीही पालक सभेला दांडी मारायची तयारीच असायची... शाळेत उशिरा येण्याची तशी सवयच होती, पण शाळा सुटल्यावर पळायची जरा घाईच असायची, त्या घंटेचा नाद आजही अगदी कानात घुमतोय, आज शाळा सूटण्याची नाही तर शाळा भरण्याची वाट पाहतोय, बाल मित्र आणि जुन्या सवंगडयांसोबत हेच गाणे गातोय, आठवनींच्या विश्वामध्ये तेच दिवस पाहतोय.... आणि फ़क्त उरलेल्या आठवणी चाफतोय....!

काल ती मला म्हणाली.,

काल ती मला म्हणाली., "तुला कधी स्वप्न तुटायची भीती नाही वाटत.......? उंच मनोरे तू स्वप्नांचे बांधतोस.........., ते कधी कोसळायची भीती नाही वाटत ...........? ................... ................... मी फक्त हसलो, आणि तिला म्हटले "अगं तुझ्या स्वप्नातच तर माझे जग आहे.... हे आयुष्यच स्वप्नांच्या हवाली केले आहे त्यांच्यातच जगणे आणि त्यांच्यातच विलीन होणे आहे....." "केवळ एकच क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे मग नंतर.... तो स्वप्नांचा मनोरा माझ्या सकट कोसळला तरी चालेल ..........!!!" .............. ................ "इतका कसा रे स्वप्नाळू तू ?........ इतकी सुध्दा स्वप्ने पाहू नयेत कोणाची....... किती रमशील स्वप्नांच्या दुनियेत?" "एक दिवस मी जाईन तुला सोडून..... मग काय करशील हं?..... " "आता अजिबात स्वप्ने पाहू नकोस माझी...... " असं कालच माझ्यावर चिडून मला म्हटली होतीस आणि............................ ........................................ ... ........................................ ....................................... ........................................ ...................... "काल देखील रोज रात्री प्रमाणे तुझी असंख्य स्वप्ने ..... माझ्याकडेच पाठवली होतीस.... ........ ........ अगदी न चुकता..............." :)

सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर

वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर.... कदाचित कधी ङोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दूखः व्यक्त करता आले असते तर कदाचित कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती. आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमत कधी उरलीच नसती!!

फक्त तुझ्याच आठवणींत झुरतो...

आजहि मी... फक्त तुझ्याच आठवणींत झुरतो... तुझ्याशी बोलण्यासाठी, रात्रन- दिस मरतो... गालावरून ओघळणार्या प्रत्येक आश्रू मध्ये, फक्त तुलाच शोधत फिरतो .. अन उगाच्या उगाच त्या चंद्राला पाहून, गालातल्या गालात हसतो ... का कुणाच ठाऊक ?, आजही मी... तुझ्यावर तितकच प्रेम करतो... तू माझी नसूनही .. तुझ्याच नकळत, तुझ्या आनंदसाठी खूप काही करतो... कधी तरी होशील परत माझी हिच आस मनी ठेवतो... अन वाचशील कधीतरी म्हणून, रोज तुझ्यासाठी, एक कविता मी करतो... एक कविता मी करतो.

प्रेम म्हणजे काय असतं

प्रेम म्हणजे काय असतं ? खरचं ........... प्रेम म्हणजे काय असतं ? ... तिच्या डोळ्यांतील अश्रु जेव्हा ......... आपल्या डोळ्यांतुन ओघळतातं .... ते प्रेम असतं ....... तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा ..... तिच्या गालावरील खळीतुन खुलतं ..... ते प्रेम असतं ....... जेव्हा तिच्या आठवणीच ........ तुमचा श्वास बनतातं ....... ते प्रेम असतं ...... जेव्हा तिच्या येण्याची हलकीशी चाहूल ..... तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ..... ते प्रेम असतं ..... तिच्या काजळ डोळ्यांतील काळजी ..... नकळत सांगुन जाते की ...... या जगात आपलं हक्काचं कुणीतरी आहे ..... ते प्रेम असतं ...... जेथे शब्दांची गरज नसतेच कधी ...... एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो ..... न बोलताच भावना व्यक्त होतात ..... ते प्रेम असतं ...... विरहाचा प्रत्येक क्षण जेथे ...... युगांसमान भासतो ..... ते प्रेम असतं ...... चांदण्या रात्रीतील रेश्मी स्वप्नं ..... दोघांच्या पण डोळ्यांत जन्म घेतातं ..... काही हळुवार क्षणांना दोघंही जिवापाड जपतातं .... ते प्रेम असतं ...... जेथे असतात तिच्या नजरांचे तीक्ष्ण बाण ...... अन् त्यांच अचुक लक्ष्य असतात तुम्ही ..... हेच .......... हेच तर प्रेम असतं ......... !

बाबू गेनूंच्या उरल्या फक्त आठवणी

एक क्रांतिकारी नेता इंग्रजांच्या जोखडातून देश मुक्त करण्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांचे स्वातंत्र्यदिनी देशभर स्मरण केले जात आहे. स्वातंत्र्यांच्या या चळवळीत अनेकांना प्रणाची आहुती दिली. मुंबईत परदेशी मालाला विरोध करणारे शहीद बाबू गेनू हे असेच एक नाव आहे. बाबू गेनूंचे नाव सध्याच्या तरुण पिढीच्या लक्षात नसेलही. मात्र आजच्या दिवशी त्यांची आठवण महत्वाची आहे. कोण होते बाबू गेनू बाबू गेनूचे पूर्ण नाव बाबूराव गेनू असे होते. सध्या चकाचक मॉलमध्ये रूपांतरीत झालेल्या एकेकाळच्या नावाजलेल्या फिनिक्स मिलमध्ये बाबू कामाला होते. बाबूंचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील महाळुंगे हे होते. त्यांचे लौकीक अर्थाने फारसे शिक्षण झालेले नसले तरी देशप्रेमाची मशाल मात्र त्यांच्या मनात सतत धगधगत होती. १९३० साली महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. मुंबईत परदेशी मालाची विक्री करणा-यांची दुकाने बंद करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. १२ डिसेंबर १९३० रोजी परदेशी मालाला विरोध करत त्यांनी मुंबईच्या काळबादेवी बाजारात कपड्यांनी भरलेले ट्रक अडवले होते. मात्र मालाचा एक ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि त्यात ते चिरडले गेले. या घटनेत बाबू गेनू गंभीर जखमी झाले. त्यांना लगतच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबू गेनू रस्त्याची सद्यस्थिती ज्या रस्त्यावर बाबू गेनूंना परदेशी मालाने भरलेल्या ट्रकने चिरडले होते त्याला नंतर ' बाबू गेनू रोड ' असे नाव देण्यात आले. या रस्त्याची आजची अवस्था काय आहे ? व्यापारी भाग असलेल्या, साधारण २० फूट रुंद या रस्त्याच्या दुतर्फा आज विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली आहेत. मुख्यत : हस्तकलेच्या वस्तू, वैद्यकीय उपकरणे आणि कपड्यांची दुकाने आपल्याला इथे दिसतात. रस्त्यावर अनेक ठिकाणी अस्वच्छता नजरेस येते आणि दिवसभर वाहनांचा कल्लोळ इथे ऐकायला येतो. ' स्वदेशी चळवळीदरम्यान याच रस्त्यावर बाबू गेनूने आपले प्राण अर्पण केले होते, अशी आम्हाला माहिती मिळते. याव्यतिरिक्त आम्हाला बाबू गेनूविषयी फार काही माहिती नाही ' अशी माहिती सध्याच्या बाबू गेनू रोडवरील एका दुकानदाराने दिली. विशेष म्हणजे बाबू गेनूच्या घटनेच्या वेळी या दुकानदाराचे आजोबा येथे व्यवसाय करत होते. बाबू गेनूंविषयी अधिक विचारले असता हा दुकानदार म्हणाला, ' बाबू गेनूंविषयी इथं कधीही फार काही चर्चा केली जात नाही. त्यामुळं त्यांच्याविषयी आम्हाला माहिती मिळत नाही. ' या रस्त्याच्या कडेला एका छत्रीविक्रेत्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला , ' वर्षातून एकदा बाबू गेनूंच्या जयंतीदिनी परिसरातले काही लोक इथं एकत्र येतात. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काही जण भाषणे करतात. आणि निघून जातात. त्याव्यतिरिक्त वर्षभर इथं फारसं काही होत नाही. ' या रस्त्यावर फेरफटका मारला असता बाबू गेनूंची आठवण म्हणून इथं कुठेही त्यांचा पुतळा किंवा प्रतिमा उभारलेली दिसत नाही. १२ डिसेंबर १९३० रोजी मात्र या परिसरातली परिस्थिती एकदम वेगळी होती. बाबू गेनू शहीद झाले त्या ठिकाणी शहरातल्या शेकडो लोकांनी रांगा लावल्या होत्या. पुढचे दोन दिवस या रस्त्यावर बाबू गेनूंच्या रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. बाबू गेनूंना श्रद्धांजली वाहत शहरातल्या नागरिकांनी या जागेवर पुष्पं वाहिली तर काहींनी अगरबत्ती लावली होती. परदेशी मालाचा निषेध करत नागरिकांनी शहराच्या विविध भागात कपड्यांची होळी केली होती. या घटनेनंतर पुढचे काही दिवस मुंबईतील ' टाइम्स ऑफ इंडिया ' , ' नवाकाळ ' , ' बॉम्बे क्रॉनिकल ' , ' मुंबई समाचार ' या त्यावेळच्या नावाजलेल्या वर्तमानपत्रांनी वृत्तांकन केले होते. बाबू गेनूंचा मृत्यू कसा झाला परदेशी कपड्यांचे व्यापारी या परिसरात ट्रकमध्ये माल भरत होते. त्यावेळी स्वदेशी आंदोलन जोरात सुरू होतं. त्यामुळं आंदोलनकर्त्यांचा त्रास होऊ नये म्हणून या इंग्रज व्यापा-याने पोलिसांकडून सुरक्षा मागितली होती. दरम्यान परदेशी कपड्यांचे गठ्ठे भरलेला ट्रक या रस्त्यावरून जात असताना काही स्वदेशीच्या आंदोलनकर्ते ट्रकसमोर आडवे झाले. त्यात बाबू गेनू हेही होते. विठोबा धोंडू नावाचा एक भारतीय ट्रक चालवत होता. आंदोलनकर्त्यांच्या अंगावरून ट्रक नेण्यास त्याने नकार दिला. ट्रकमध्ये बसलेल्या एका ब्रिटीश सार्जंट त्यामुळं रागावला. त्याने ट्रकचा ताबा घेतला आणि थेट आंदोलनकर्त्यांच्या अंगावरून नेला. त्यातच बाबू गेनी शहीद झाले. या घटनेनंतर ब्रिटीश सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत खुलाशात म्हटले आहे की ट्रक चालक जखमी झाल्यामुळं तो बेशुद्ध झाला. त्यानंतर ब्रिटीश सार्जंटने ट्रकचा ताबा घेतला. तोपर्यंत ट्रकवरचा त्याचा ताबा सुटला होता आणि तो आंदोलनकर्त्यांच्या अंगावर आदळला. आंदोलनकर्त्यांना जखमी करण्याचा ब्रिटीश सार्जंटचा कोणताही हेतू नव्हता, असं या खुलाशात म्हटलं आहे. ट्रकखाली सापडलेल्या इतर आंदोलनकर्त्यांना हळूहळू काढण्यात आले. मात्र बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्यानं ते गंभीर जखमी झाले आणि त्याचत मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबईत लोकांचा जनक्षोभ उसळला होता. बाबू गेनूंच्या अंत्ययात्रेसाठी हजारो लोक जमा झाले होते. शहराच्या मध्यभागातून अंत्ययात्रा निघाली. बाबू गेनूंवर गिरगाव चौपाटीवर अंत्यसंस्कार व्हावे अशी लोकांची इच्छा होती. या ठिकाणी पूर्वी स्वातंत्र्य चळवळीतील जेष्ठ नेते बाळ गंगाधर टिळक यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते. टिळकांसारखं सन्मान बाबू गेनूंना मिळावा अशी लोकांची इच्छा होती. मात्र इंग्रजांनी ही परवानगी नाकारली. तेव्हा लोकांचा राग अनावर झाला. परिणामी ब्रिटीश पोलिस आणि मुंबईतल्या नागरिकांमध्ये चांगल्याच झटापटी झाल्या. नंतर स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी लोकांना समजावले. आणि शेवटी इंग्रजांनी ठरवून दिलेल्या जागेवर बाबू गेनूंवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबू गेनूच्या कवटीला मार लागल्यामुळं त्याच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाला असल्याचं वैद्यकीय अहवालात म्हटलं होतं. या घटनेच्या वेळी सर्व आंदोलक जखमी झाल्यानं कोणताही साक्षीदार नोंदवण्यात आलेला नव्हता. बाबू गेनू हा कॉंग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं सांगत कॉंग्रेस कार्यालयात त्याचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. क्वीन्स् रोडवर झालेल्या अंत्यसंस्काराच्यावेळी स्वातंत्र्य चळवळीतील जेष्ठ नेते जमनालाल बजाज, लिलावती मुंशी, पेरीन कॅप्टन आणि जमनादास मेहता या प्रभूती उपस्थित होत्या. बाबू गेनू परळमध्ये राहत होते. त्यामुळं परळच्या कामगार मैदानात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुतळा उभारण्यात आला आहे. पुण्यातल्या एका रस्त्याला बाबू गेनूचे नाव देण्यात आले असून त्यांच्या नावाने एक संस्थाही आहे. स्वदेशीच्या चळवळीत आपले प्राण झोकूण देणा-या या विराविषयी भारतीय स्वातंत्र्याइतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. ज्या मुंबई शहरात बाबू गेनूने देशासाठी आपले प्राण त्यागले तिथं एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र ६२ वा स्वात्रदिवस साजरा करत असताना बाबू गेनूसारख्या शहीदाला आपण विसरत चाललो असल्याची भावना मनात घर करून राहते. आमोल घायाळ ,मुंबई ( सदस्य -हुतात्मा बाबू गेनू सैद युवा प्रतिष्ठान )

१२ डिसेंबर ,रक्त आणि गुलाल

१२ डिसेंबर ,रक्त आणि गुलाल आजची परिस्थिती ईतकी गंभीर आहे कि प्रकृती साथ देत नसतानाही अण्णा हजारेंना पुन्हा उपोषणाला बसावे लागत आहे. ते का? याचा जराही विचार न करता,,, १२ डिसेंबर ला लोक ....... नावाच्या ईसमाला जाणता राजा बनवू पाहत आहेत मोठ्मोठ्ठले ब्याणार लावून त्याचे वाढदिवस साजरे करत आहे. खरतर हा दिवस साजरा करायचा असेलेच तर तो क्रांतिकारी दिवस म्हणून साजरा करावा,,, ईतक या दिवसाच महत्व आहे,,,, कारण हि क्रांती होती एका सर्व सामान्य माणसाची ,त्याच्या निधड्या छातीची त्याच्या देशप्रेमाची ,त्या माणसाच नाव होत बाबू गेनू,,,,,, १२ डिसेंबरलाच बाबू गेनू यांनी स्वदेशीच्या चळवळीत स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. (हो तशी .............. दिली बरका,,,पण ................चारणी.) तर,,अत्यंत निर्दयपणे त्या क्रूर सार्जंटने त्यांच्या शरीरावरून विदेशी मालाचा तो ट्रक नेला,,, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या पण दुर्दैव असे,,कि , "स्वातंत्र्या नंतर या रक्ताचा टीळा लावून देशहिताचे कार्य समर्पणाच्या भावनेतून करण्याऐवजी स्वतःचे आणि नातेवाईकांचे पोट भरणाऱ्या राजकारण्यांवर गुलालाची उधळण होवू लागली . आणि या धारेवर सांडलेल्या रक्ताची किंमत संपली." म्हणूनच अण्णा हजारेंना उपोषण करावे लागत आहे, बाबू गेनू कुणी मोठ्ठा पैसेवाला नव्हता, शिकलेलाहि नव्हता, तथाकथीत बुद्धीमंत तर मुळीच नव्हता, हातावर पोट अशी त्याची अवस्था मारतानाही कुटुंबासाठी एक छाद्दाम हि ठेवला नाहता. त्याचाकडे होते या देशाप्रती निर्व्याज प्रेम ,,,,म्हणून तो अजरामर झाला हुतात्मा झाला. अत्यंत गरिबीत वाढलेला हा मुलगा दोन वर्षाचा असतानाच वडील वारले. घरातील एकमेव संमपत्ती म्हणजे एक बैल आणि जमिनीचा वितभर तुकडा, पण काही दिवसातच बैल वारला. आणि बाबू गेनू यांनी आईसह गाव सोडले मुंबईची वाट धरली. मोलमजुरीवर कसेबसे जगात होते पण तरीही ,,, याही परिस्थितीत त्यांच्या मनात स्वदेशीचे प्रेम निर्माण झाले जे काम करायला भर्ल्यापोटीहि कुणी तयार होत नाहि. तिथे हा प्रत्येक स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होत असे. झाल विदेशी मालाची होळी करा असा आदेश आला ,,, सारा देश त्या आंदोलनात सहभगी झाला मग बाबू गेनू कसा मागे राहील,,,, त्याला कळल विदेशी मालाने भरलेला एक ट्रक काळबादेवीतून जाणार आहे . आणि हा पठ्या गेला सगळ्यात पुढे छातीचा कोट करून त्या ट्रकला अडवलं. पोलीस आले त्यांनी आंदोलकांना हटवले पण बाबू गेनू हटनार्यान पैकी नव्हता . ते पाहून त्या संतप्त हरामखोर ब्रिटीश पोलिसाने त्या ट्रक चालकाला बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक न्यायाच आदेश दिला पण ट्रकचा चलाखी हिंदू होता बलबीरसिंग त्याच नाव त्याने ट्रक अंगावर घालणार नाही असे बजावले त्यावेळी, तो ब्रिटीश पोलीस स्वतः त्याला खेचून ट्रक सुरु केला आणि तो ट्रक बाबू गेनू यांच्या अंगावर घातला.,,,,,,,,, गरीब अर्धपोटी,अशिक्षित बाबू गेनू देशप्रेमाचा धडा आम्हाला शिकवून गेला . देशाचा नागरिक कसा असावा याचा वस्तुपाठ घालून गेला आणि आम्ही ????????? भरल्या पोटी ढेकरा देवून पुढच्या सात पिढ्यांचा उद्धार करणाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात मश्गुल आहोत? ज्यादिवशी आम्हाला देशप्रेम काय असते ते कशाशी खातात हे समजेल,, त्या दिवशी अण्णा हजारेंना उपोषणाला बसावे लागणार नाही ,,, त्या दिवशी कुट्ल्याही विदेशी कंपन्या पुन्हा भारतात आणून देशाची आणि समाजाची प्रगती करावी लागणार नाही. आमोल घायाळ ,मुंबई ( सदस्य -हुतात्मा बाबू गेनू सैद युवा प्रतिष्ठान )

माझ तुझावर खूप प्रेम आहे..

माझ तुझावर खूप प्रेम आहे.. खूप काळानंतर कोणासाठी तरी मनात प्रेम जागृत झाल, पण काही कारणांमुळे ते मी व्यक्त ही करू शकलो नाही......... माहित आहे मला तू माझावर’ मनापासून प्रेम करतेस , त्या प्रेमाला जाणूनही मी तुझावर मनमोकळे पाने प्रेम करु शकत नाही........... जीवनाच्या अशा वळणावर मी आलो आहे,जिथे मी तुझा स्वीकारही करू शकत नाही अन तुझाशिवाय राहू शकतही नाही.......... माझा मनातल प्रेम मी कधी तुला समजू देणार नाही, पण मनातून नेहमीच प्रेम तुझावर करत राहणार ओठावरील हास्यामागे हे दुःख मी नेहमी लपवत राहणार.......... अमोल राजे

Monday, April 23, 2012

सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

तुझे सुंदर , नाजूक , मुलायम पाय ..
चिखलाने भिजतील म्हणून ...
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

तू आणि तुझे रूप पाहिचे आहे मला भिजताना ..
बघायचे आहे तुझ्या ...
ओठावरती ते थेंब हि थांबताना ..!
पाहिचे आहे हळुवार तुझ्या ...
केसावरून पाणी ओघळताना ..म्हणूनच ..
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

पण तू आलेवर असा बरस ..
कि उशीर होईल तुला घरी निघताना ..
आणि तू अलगद यावीस बाहूत माझ्या ...
स्वतःला सावरताना ...
कर मोठा कडकडाट विजेंचा आज ..
कि तू सोडूच नये बाहू माझे आज ..
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

बेधुंद होऊन तू बरसत राहा आज ...
तू जवळ असताना ..
जर कमी पडले थेंब आज बरसताना ..
तर घेऊन जा आनंदाश्रू आज जाताना ...!
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

तुझ्या सहवासाठी माझा प्रत्येक श्वास त्याला देईन ..
आणि बदल्यात फक्त त्याच्या श्रावण सरींची वाट पाहीन ...!
सांगितले आहे मी आज त्या पावसाला ...
नको येउस आत्ताच .........!

येतेय ग आठवण.... तुझी आजही ...

येतेय ग आठवण.... तुझी आजही ...
कुणाचीही परवा न करता ..
कोसळणारा मुसळधार पाऊस पाहताना ..
सहजच हात लांब करून ..
तळहातावरील झेललेले पाणी ..
अंगावर उडत असताना .....!

कायम असते मनात ...
अथांग महासागर एकटा ...
बघत असताना ..
त्याच्या लाटा पायाला स्पर्शून जाताना ...
ओल्या चिंब पावसात भिजताना ...!

येते तुझी आठवण ..
संध्याकाळी गरम चहा पिताना ..
आभास होतो मलाच ..
झाला आहे स्पर्श त्याला तुझ्या ओठांचा .....!

येते आठवण तुझी...
जेव्हा जमून बसतात श्रावणातले ढग ...
बरसण्यासाठी ..
वाटते ...कदाचित वाट पाहत असतील तुझीच ..
माझ्या सारखीच ..!
तुला चिंब -चिंब भिजवण्यासाठी ...!

पण आता ठरवलंय ...
एकदा शेवटचं मागे वळून ..
पुन्हा आता नाही आठवायचे
विसरलेल्या आठवणींना ..
नाही फसायचे पुन्हा एकदा ..
चुकार हळव्या क्षणात ..
नाही बाळगायचे अपेक्षांचे ओझे ..
मनावर पुन्हा ....!

जास्त नाही रेंगाळायचं...
त्या नागमोडी रस्त्यावर ..
नाही घसरायचे पुन्हा त्या ...
निसरड्या वाटेवरून ...
स्वतःच्या हाताने स्वतःला ..
सावरायचे ...
आणि स्वतःचे आयुष्य आपण ..
स्वतःच घडवायचे ...!
आणि रंगीन करायचे आपले आयुष्य ...
त्या सप्तरंगी इंद्रधनूप्रमाणे ...!

पुन्हा.. फुलेल का आपली प्रीत ....?

आठवतंय तुला ..एकमेकांचा
निरोप घेताना मन भरून आलं होतं ..
डोळ्यातले पाणी पापणीआड दडवून ..
खोटं खोटं हसलो होतो ..
नातं टिकवायचं आपण आयुष्यभर ..
असं मनोमन ठरवलं होतं ..!

सोबत आहे आपल्याला
एकमेकावरील विश्वास आणि प्रेमाची ..
पण मधेच आड आली भिंत ..
घरच्यांच्या प्रतिष्ठेची ...
कदाचित ..त्यांचेसाठी तुला ..
दुसऱ्याशी लग्न करावे लागले ..
तुझा सर्वस्व असणाऱ्या मला ..
त्यांचे साठी दुखवावे लागले ...!

सहन झाले नाही मला ..
दुखवू हि नये तुला म्हणून ..
मी मरणाचा विचार केला होता ..
पण तुझा विचार केल्यावर ..
आपोआप पाऊल अडले माझे ..
फक्त ...तुला दिलेल्या वचनांसाठी
मी हेही सहन करेल ...
जगेन मी ...
जगेन कसा ? रोज तिळ तिळ मरेल ...
तू माझी असतानाही ..
तुझा विरह सोसेल ....!

तुझ्या आठवणीत जगताना ..
कधी कधी मी रडतानाही हसेल ..
ओढ असेल तुझ्या मिलनाची ..
वाट पाहत असतील डोळे ..
फक्त तुझ्या येण्याची ...
मला काही कळत नाही
हि माझ्या प्रेमाची हार कि जीत ...
प्रिये ...सांग न मला एकदा ....
पुन्हा.. फुलेल का आपली प्रीत ....?

जेव्हा कुणीतरी अनोळखी ..

जेव्हा कुणीतरी अनोळखी ..
तुम्हाला समोर दिसते ...
जेव्हा तिची नजर ..
प्रथमच एका नजरेशी भेटते ..
लक्ष फक्त तिकडेच द्या ...
जे तुमचे हृदय बोलते ...!

या प्रक्टीकॅल दुनिया पेक्षा अनुभवा ..
एक वेगळीच दुनिया ...
लक्षात ठेवा ..
Love at First Sight ...पहिल्या प्रेमाची ..
हीच आहे किमया ...
होऊन जा बैचेन ..
तिच्या रम्य आठवणीत
केवळ तिला पाहण्यास ..
हळूच घ्या मिठीत ..
ती स्वप्नात आल्यास ...
अनुभवा तिचा तो उबदार स्पर्श ..
हळूच विचारा मग मनाला ..
किती रे झाला हर्ष ....!

गोड आठवणीत तिच्या होऊन जा बेधुंद
श्वासात तुमच्या दरवळू द्या ..
फक्त तिचाच सुगंध ..
भेटून एकदा तिला निवांत ..
घ्या जवळ तिला ..अन
सांगा एकदा मनातलं...
अशक्य असं काहीच नाहीये ...!

खरच..आता तू खूप बदललीये ...!

आठवतंय मला आजही ...
मी न बोलताही माझ्या ...
मनातले सारे ओळखणारी तू ..
आज सारे समजूनही ...
न समजल्यासारखे करतेस ...
खरच..आता तू खूप बदललीये ...!

मला भेटल्याशिवाय तुझा ..
एक दिवसही जायचा नाही ...
पण आज तुझ्या भेटीसाठी ..
एक एक क्षण मोजलाय..
पण ..दुरावा हाच मात्र रोजचा सोबती झालाय ...!

न चुकता मला माझा आवडणारा ..
गुलाब देणारी तू ..
हल्ली विसरू लागलीस ..
पण जाऊ दे ग ...मी रमेल ..
त्या जुन्या गुलाबी आठवणीत ..
शोधेल मी तेथे माझा सुगंध कधीतरी ..
माझा जीव रमवण्यासाठी ...!

माझा हात हातात घेण्यासाठी ...
किती बहाणे करायचीस ..
अक्षरश: तडफडायेचीस ..
पण आता ...
कुणी बघेल ..हा बहाणा सांगून ...
टाळायला लागलीस ..
दूर राहू लागलीस आजकाल माझेपासून ..
का ग ..एवढे परक्यासारखी वागू लागलीस ?

पण व्हायचे तेच झाले ..
माझे स्वप्नं अधुरेच राहिले ...
माझे डोळे भरून येणे तुला कधी सहन नाही झाले .
पण आज माझे डोळे अश्रू ने ओलेचिंब झाले ..
आणि तू ..
अगदी कोरडी ठणठनीत निघून गेलीस ..
मला एकट्याला सोडून ..
एकदाही मागे वळून न पाहता ..!

कालपर्यंत फक्त माझी असणारी तू ..
आज दुसऱ्याची झालीस ..
काही तक्रार नाही ग प्रिये ..
तू फक्त खुश राहा ..
तुझ्या खुशीतच मी माझा आनंद शोधलाय ..
जाईल मंदिरात पुन्हा एकदा ..
आणि घालील साकडे ....
कसलाही पाझर न फुटणाऱ्या ..
त्या दगडाच्या मूर्तीला ...
फक्त ..तुझ्या सुखासाठी ..खुशीसाठी .

Tuesday, April 17, 2012

तुझी आठवण येते तेव्हा..

तुझी आठवण येते तेव्हा..

देवा एकाच मागणी

तिची पापणी भरू दे

माझ्या नावाचा एक तरी थेंब

तिच्या नयनी तरु दे..

रात अशी ही तंद्रित

पापणिहि बघ लवते आहे

ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे

कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे

तुझी आठवण येते तेव्हा

तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो

तु येणार नाहीस माहित असतं

डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..

एकही क्षण नाही जेव्हा

तिची आठवण येत नसेल,

असा एकतरी क्षण असेल

जेव्हा ती मला आठवत असेल

तू समोर असतेस

तेंव्हा बोलू देत नाहीस |

तू समोर नसतेस

तेंव्हा झोपू देत नाहीस ||

तो ढग बघ कसा

बरसण्यासाठी आतुरलाय

तुझ्या चिंब गालावरुन ओघळला

म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय

माझ्या शब्दांना अजुन तरी

काहीच अर्थ नाही.

जोपर्यंत त्या गीताला

तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.

येणारा दिवस कधीच

तुझ्या आठवणीशिवाय जात नाही

दिवस जरी गेला तरी

तुझी आठवण जात नाही.

आज सारे विसरली तू

नावही न येई ओठांवर.....

कसे मानू तू कधी

खरे प्रेम करशील कुणावर......

तेव्हा सागर किनारी साक्षीने

तू घेतल्यास किती शपथा.....

किती मारल्यास मिठया तू

तो चंद्र ढगात लपता........

नजरेत जरी अश्रू असले

तरी ओठावर हास्य असाव

ओठावरच्या हास्यामागे

नजरेतल्या अश्रूना लपवाव.

कसे करू माफ़ तुला

जे घाव तू मला दिले......

घेऊन माझी फूले

तू काटेच मला दिले......

डोळे पुसण्यास माझे

पाऊस धावूनी आला,

थेंब कोणता तुझा नि माझा

हेच कळेना म्हणाला.

आज पुन्हा तुझी आठवण आली

आणि मी उगीच हसु लागलो

खोटं खोटं हसताना...

कळलेच नाही, कधी रडु लागलो...

तुझ्या नि माझ्या वाटा,

एकमेकींशी नेहमीच समांतर

एकत्रच चालतात खर तर,

पण मिटत नाही अंतर

मनातला प्रत्येक क्षण

ओठांवरती येईल का?

ओठांवरील प्रत्येक शब्द

मनातच राहील का?

आठवण काढू नको म्हणालीस

आठवण काढू नको म्हणालीस
तरी ते शक्य आहे का..??
तुझ्या पासून वेगळं होवून
माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का..??
तुझ्या इतक समजून घेणारी मला
दुसरी कोणी मिळेल का..???
आणि जरी मिळाली
तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम
मी तिच्या मध्ये शोधू शकेल का....??
तुझ्या मध्ये मिळणारा आधार
तुझी माझ्यासाठी असलेली काळजी
ह्या गोष्टी मला दुसरी मध्ये नाही सापडणार
कारण..,
तू ति आहेस जिच्यासाठी मी जगतोय
आणि तू म्हणतेस आठवण काढू नकोस......

तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का..??

ती त्याला नेहमी ओरडते ... "का रे तू अस करतोस ?

ती त्याला नेहमी ओरडते ...
"का रे तू अस करतोस ?

मी रोज खूप बोलते, अन तू नुसताच शांत असतोस ..
मी तुझी काळजी करते, अन तू हि माझी काळजी करतोस...
काहीही झालं मला, तर पूर्ण जग डोक्यावर घेतोस...

मी रोज तुझी वाट बघते, अन तू रोज उशिरा येतोस..
office असो, कि रात्री online,
तू नेहमीच का अस करतोस?....
का कळत नाही तुला माझ्या वागण्याचा अर्थ,
कि कळून हि न कळल्या सारखा करतोस?....

मनातल्या भावनांना माझ्या,
का समजून हि नसमजल्या सारखा करतोस?...
का करतोस रे अस तू ?
माझा असून हि का नाहीस रे माझा तू ?.... "

हे बोलून तिझे डोळे पाणावतात,
आणि तो तिझे डोळे पुसतो,
तिला पाहून हळूच हसतो...
अन तिला जवळ घेत घेत बोलतो..
"शब्दात सगळ कस सांगू ग तुला,
मनात आहे खूप काही...
वागण्यातून सांगतो जे ,
तुला ते कळत नाही...

चल शब्दात न सांगितलेलं,
आज मी तुला सांगतो,
मनातला गुपित माझ्या ,
आज तुझ्या पुढे मांडतो,
कळत नकळतच जुळल,
नात आपल्या प्रेम, आज मी हे मानतो..
अन तुझ्यावर खरच ग खूप प्रेम करतो मी ...
घे आज मी हे तुला सांगतो...
घे आज मी हे तुला सांगतो... "

हे ऐकून ती स्तब्ध होते,
अन तो तिला मिठीत घेतो..
आयुष्भर साथ देण्याच वाचन,
आज तो तिला देतो..

ll शुभ प्रभात ll

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो , ती एक देवाची सुंदर कलाकृती असते . तो अंधारावर मिळविलेला

विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते . आणि आपल्या

आयुषातल्या नव्या दिवसाची आणि नव्या ध्येयाची सुरवात असते .
ll शुभ प्रभात ll

आठवतेय ती शाळेची घंटा...

***आठवतेय ती शाळेची घंटा...
घंटा वाजली की मन असे फिरायचे,
जाऊन बसावे परत त्या बाकांवरती असा हट्ट करायचे,
ती वेळ आणि ते वय परत नाही येणार कधी,
मग एकटेच ती खंत करत बसायचे...

आज नाहीये काही अधिक पण बाकी सगळे वजा,
वर्गात केलेली मस्ती आणि बाईंनी दिलेली सजा,
Computer आणि Calculater च्या युगात अगदी विसरलोय पाढयांची मजा,
पाढे पाठ नाही झाले म्हणून कधी घेतलेली रजा...

आज ऑफिसच्या कामातून वेळ पुरतच नाही,
भंडावले डोके काही कळतच नाही,
म्हणून आठवतोय ते शाळेतील खेळ,
कधी कब्बडी, कधी खो-खो आणि शाळे समोरील भेळ...

जेव्हा नसायचे वर्गात लक्ष, पण परीक्षेत मात्र झोप उडायची,
मग एन वेळी मित्राच्या साथीने थोड़ी कॉपी करायची,
होइल यावर पास याची खात्री मात्र असायची,
पण तरीही पालक सभेला दांडी मारायची तयारीच असायची...

शाळेत उशिरा येण्याची तशी सवयच होती,
पण शाळा सुटल्यावर पळायची जरा घाईच असायची,

त्या घंटेचा नाद आजही अगदी कानात घुमतोय,
आज शाळा सूटण्याची नाही तर शाळा भरण्याची वाट पाहतोय,
बाल मित्र आणि जुन्या सवंगडयांसोबत हेच गाणे गातोय,
आठवनींच्या विश्वामध्ये तेच दिवस पाहतोय.... आणि फ़क्त उरलेल्या आठवणी चाफतोय....!

"मी आज खूप थकून आलोआहे,

मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून
घरी आलेला.
त्याच्या वडिलांना दम्याचाआजार
असतो, ते वि...चारतात "बेटा माझे औषधं
आणली काय, काल पासून संपली आहेत."
... मुलगा : "मी आज खूप थकून आलोआहे,
मी उद्या घेवून येईन."
बाप: "ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप
थकला असशील..!"
(रात्री अचानक
त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो...घरी
औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई
पर्यंत त्यांचा मृत्यू होतो...)
काही दिवसांनंतर मुलाला त्याच्या रूम
ची सफाई
करतांना जुनी डायरी सापडते.ती त्याच्या वडिलांची असते.
त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक
लिहिलेली नोंद सापडते, ती असते..
"आज माझ्या सोन्याला ताप आला होता,
'Taxi' न मिळाल्यामु ळे व दवाखान्याच
ी लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर
नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ
आता शांत झोपी गेला आहे..(वेळ : रात्री २
वाजता..)"
त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले
पण ...आता सर्व संपले होते.
प्लीज नेवर हर्ट युअर पॅरेंटस... .व्हाटेवर यु
आर...इज ओन्ली बिकोझ ऑफ देम...!

हृदय स्पर्शी प्रेम कथा............ ♥♥♥

कुठे होतास तू, तुला अक्कल आहे का, गेले दोन तास मी सारखी तुला कॉल करतेय,
बघ तुझ्या मोबाईल वर ७०-८० मिस-कॉल असतील.तुला कशी रे जरासुद्धा माझी काळजी नाही.
काय समजतोस तू कोण स्वताला? अग हो हो हो, किती ओरडशील मी तरी काय करू मला नाही जमल फोन उचलायला, काही प्रोब्लेम होता... मला माहित आहे रे, तुला नेहमीच प्रोब्लेम असतात, खोटारडा आहेस एक नंबरचा, हल्ली खूप खोट बोलतोस माझ्याशी बसला असशील मित्रांबरोबर टवाळक्या करत आता लग्न झालाय तुझ लहान नाहीस अजून. सोड न राग आता ये न मिठीत, मला माहित आहे तुझा राग माझ्या मिठीत आल्यावर पटकन पळून जातो...चुमंतर..... मी नाही येणार, सोड मला, मला नाही यायचय मिठीत... सचिन आणि सवी... एका वर्षापूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला,प्रेम खूप होत दोघांच एकमेकांवर पण सतत अशीच भांडण चालू असायची, जास्त गंभीर नसायची पण. कॉलेजपासून सचिन सवी वर खूप प्रेम करत होता, तिचाही त्याच्यावर खूप प्रेम होत, शिक्षण संपल्यावर सचिनला एक चांगली नोकरी मिळाली, स्वताच्या पायावर उभा राहिला आणि त्याने सविला डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली. तिने त्याला होकार दिला आणि त्याचं लग्न झाल. "अग मला वाटल आपल्या सकाळच्या भांडणा नंतर तू आज तुझ्या आईकडे जाशील, आणि मग मी एकटाच असीन घरात, म्हणून मी तुला ऑफिस मधून निघताना कॉल नाही केला. आणि ज्यावेळी तुझा फोन येत होता मला वाटल अजून भांडशील त्यापेक्षा डायरेक्ट घरी जावूनच तुझा राग घालविण म्हणून हे बघ किती डेरी-मिल्क्सची चोक्लेट्स आणलीत तुझ्यासाठी." "मला नकोयत ती...आणि मी काय सारखी भांडतच असते कारे तुझ्याशी? मला काही दुसरे उद्योग नाहीत का? मला वाटल मी सकाळी जरा जास्तीच नाटक केली, तू रागावला असशील माझ्यावर म्हणून मी पण तुझ्या आवडीची चायनीज डिश बनवण्याची तयारी करून बसली होती, मला वाटल विचारव तुला, कि तू कधी येतोयस म्हणजे तुझ्यासाठी गरमागरम बनवल असत." "आता हे मला माहित होत का, तूच एक एसमेस करून सांगायचास ना हे. मग मी ऑफिस मधून लवकर निघून आलो असतो माझ्या लाडक्या बायकोसाठी, आतातरी ये ना मिठीत. नाही म्हणजे नाही.... मी नाय येणार जा." "त्यासाठी तर मी आलोय ना इथे..." "काय? तू मला मिठी मारण्यासाठी इथे आला आहेस का? मला आधी संग तू कुठे होतास इतका वेळ ते, अन तेही खर खर संग..... "बर मग आईक. मी ऑफिस मधून थोडा अर्धा-पावून तास उशीरच निघालो, निघायच्या आधीपासूनच तुझा कॉल येत होता, मला वाटल तू आता रागावशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भाद्क्शील, म्हणून मी फोन नाही उचलत होतो. मी विचार केला फटाफट drive करून अर्ध्या तासात घरी पोहचेन हे चोक्लेट्स घेवून. पण काय करू नेमका पावूस सुरु झाला. पावसाचा जोर इतका वाढला कि मला पुढच नीट दिसतही नव्हत, आणि तेवड्यात अचानक समोर एक ट्रक रस्त्यात बंद पडलेला दिसला पण मला काही कळायच्या आत माझी कार त्या ट्रक वर जावून जोरात आदळली. माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला आणि काचा माझ्या तोंडात आणि बाकी शरीरात घुसल्या, त्यावेळी पण तुझा फोन वाजत होता पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता पण माझे हात निकामी झाले होते मी प्रयत्न करून सुद्धा फोन उचलू नाही शकलो. आणि पुढच्या पाच मिनिटात काय झाले मला काहीच कळले नाही... कोणी एक भला मोठा माणूस माझ्याजवळ आला आणि मला त्यातून अलगद उचलून वरती वरती खूप वरती घेवून गेला." सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली, तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होत. सवी खरोखरच झोपताना सचिनशी भांडून झोपली होती आणि तिला अशीच सवय होती जर भांडण झाली असतील तर खूप फोन करत बसण्याची आणि अजून ते भांडण वाढवण्याची. तिने सचिनला एक घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली, तो झोपेतून जागा झालाच होता तिची किंकाळी आईकून. तो हि घाबरला होता आणि तिला विचारात होता... "अग सवी काय झालाय, तुला बर नाही वाटत आहे का? काही खराब स्वप्न पडल का? अग शोना बोलना....काय झाल? थांब मी पाणी आणतो तुझ्यासाठी." "हे घे पाणी, पी. आता संग काय झाल?" मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी, आणि तुही नको माझ्याशी वाद घालू, आणि कधी झालाच ना एखाद भांडण तर त्या वेळी आपण ते फोन वर अजिबात नाही बोलायचं, खरतर मीच नाही करणार यापुढे कधी कॉल जर भांडण झालाच तर. सामोरा समोर बसून आपण भांडण मिटवू.... "
i love u मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा" असे बोलत तिने पूर्ण स्वप्न सांगितले सचिनला... "i love u tooo .......मी राहु शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय...बावळट कुठली." ♥♥♥

आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल

एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबा......त आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.

एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही . रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.""कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.''वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.

त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.

एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो,""कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,''असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
तो वाचू लागतो,

""... मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही."तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,'असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस...''

पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता??

मित्रानो आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.
पण..
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका;
कारण जीवनात
एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल;
... पण

आई -वडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल

काल ती मला म्हणाली.,

"तुला कधी स्वप्न तुटायची भीती नाही वाटत.......?
उंच मनोरे तू स्वप्नांचे बांधतोस..........,
ते कधी कोसळायची भीती नाही वाटत ...........?
...................
...................
मी फक्त हसलो, आणि तिला म्हटले
"अगं तुझ्या स्वप्नातच तर माझे जग आहे....
हे आयुष्यच स्वप्नांच्या हवाली केले आहे
त्यांच्यातच जगणे आणि
त्यांच्यातच विलीन होणे आहे....."


"केवळ एकच क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे
मग नंतर.... तो स्वप्नांचा मनोरा
माझ्या सकट कोसळला तरी चालेल ..........!!!"


..............
................
"इतका कसा रे स्वप्नाळू तू ?........
इतकी सुध्दा स्वप्ने पाहू नयेत कोणाची.......
किती रमशील स्वप्नांच्या दुनियेत?"
"एक दिवस मी जाईन तुला सोडून.....
मग काय करशील हं?..... "
"आता अजिबात स्वप्ने पाहू नकोस माझी...... "


असं कालच माझ्यावर चिडून मला म्हटली होतीस
आणि............................

......................
"काल देखील रोज रात्री प्रमाणे
तुझी असंख्य स्वप्ने .....
माझ्याकडेच पाठवली होतीस....
........
........
अगदी न चुकता..............." :)

Tuesday, March 20, 2012

ती होती साडीत,

ती होती साडीत,
मी होतो गाडीत..

ती होती साडीत,
मी होतो गाडीत..

प्रेम केलं वाडीत,
जीव दिला खाडीत.......



विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.






एक मुलगा एका मुलीला प्रपोस करतो
ती त्याला नकार देते
पण तो दुखी होत नाही..............
मित्र त्यला विचारतात तुला काही भावनाच नाहीत का ??????
तुला दुख झाले नाही का ???????????
मुलगा : मी कशाला दुखी होवू ?
मी एकीला हरवलं जी माझ्यावर प्रेम करत नव्हती .....good morning!!!!!!!!!!!!!!!!!!1
पण
तिने तर असा एक माणूस हरवला जो तीचावर खप प्रेम करतो
बरोबर असेल तर like मारा ...

...killer...chiller....joke....::

पोरगी पटली की नाही हे ओळखायचं कसं?
तिच्यामागून गुपचूप जा. ''भौ...'' करून तिला घाबरवा.
ती नंतर हसली, तर समजा पटली...
... ... आणि संतापली, तर लगेच म्हणा...
...'' दिदी घाबरली!!!!!'



एकदा मक्या आणि त्याचा मित्र swimming करत
असतात..
मक्याचा मित्र : यार मक्या, तू तर एकदम
भारी पोहतोस राव !!!... कुठे शिकलास?....
मक्या (खूप विचार करतो) : अं SSSSSSSSS ....
हां आठवलं.....
मक्याचा मित्र : कुठे ???....
>
>
>
>
>
मक्या : पाण्यात !!!!

जोक आवडला का नाय..??



प्रेयसी
प्रियकराच्या छातीवर डोके ठेवून,
"जानू, किती कठीण आहे रे तुझे ह्रदय.."
... प्रियकर- "प्रिये,
ते माझे ह्रदय नसून,
खिशात
ठेवलेली चुन्याची डबी आहे.."





GIRL: जानु मला की नाही आजकाल झोपच लागत
नाही फार बैचेन झालय मन जगावस वाटत
नाही तुझ्या प्रेमात पुर्ण वेडी झालीये मी .

BOY: ए तुझ्या आईची कटकट डोक्याची आई बहीण एक नको करुस.....
DOCTOR कडे जा ही डेँगु ची लक्षणे आहेत.




जोशी सर : बंड्या मी आता काहीही प्रश्न विचारला की तू त्याचं उत्तर पटकन द्यायचं, काय?.

बंड्या : हो सर.

जोशी सर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
...
बंड्या : पटकन..!!!




एक सरदार आपल्या प्लॅटूनचं नेत्तृत्व करीत सिमेवर लढत
होता. अचानक त्याच्या एका जवानाने घाई घाई येवून
त्याला एक बातमी सांगीतली -

जवान - '' सर एक वाईट बातमी आहे... ''

सरदार - '' काय बातमी आहे ?''

जवान - "" सर दुष्मनांनी आपल्याला चारही बाजुने घेरले आहे ''

सरदार - '' अरे हे तर अजुनच चांगलं झालं, आता आपण
चारही बाजुने कुठेही गोळीबार करु शकतो.

आहे एक वेडी मुलगी

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?

आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते
मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!

माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?

''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

तुझी आठवण कधी, खूप रडवते..

तुझी आठवण कधी,
खूप रडवते..

जे कधी घडणारचं नाही,
असे स्वप्न देते..

आसवांचे असंख्य,
ठिपके डोळ्यांत देते..

अलवार जाणीवेच्या झुल्यावर,
एकटे सोडून जाते..

वेदनेच्या जंगलात हृदय हाती,
घेऊन फिरावे लागते..

काही नाही जरी बोलली तरी,
तू खूप काही बोलून जाते..

आणि.

हात पुढे करण्याआधीचं,
तू खूप दूर खूप दूर गेलेली असते.. ♥♥♥

तिने नाही केले प्रेम म्हणून

तिने नाही केले प्रेम म्हणून
मी का प्रेम सोडावे

असेल ताकद माझ्या प्रेमात तर
तिला पण माझ्यावर प्रेम जडावे


चोरी करायला आलेल्या चोरांनी तिजोरीवरील पाटी वाचली, अन हसू लागले.

पाटी अशी होती. “लक्षात ठेवा, पैसा हा घरचा पाहुणा आहे !”

एका चोराला गंमत करण्याची लहर आली.

त्याने पाटीखाली लिहिले, “काळजी करू नका ! तुमचा पाहुणा आमच्याकडे खुशाल आहे.”

एका मुलीने देवाला विचारलं प्रेम काय असत

एका मुलीने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला
बागेतून एक फुल घेऊन ये.
ती मुलगी फुल आणायला गेली ,
तिला एक फुल आवडल ,
... पण तिला त्याचापेक्षा सुंदर फुल हव होत ,
ती पुढे चालली गेली ,
पण तिला चांगल फुल नाही मिळाल ,
जेव्हा ती परत तेच फुल आणायला गेली ,
तेव्हा ते फुल तिथे नव्हत ,
तिला खूप पश्चाताप झाला ,
तिने देवाला येऊन सांगितलं ,
तेव्हा देव म्हणाला ," हेच आहे प्रेम "
जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असतं ,
तेव्हा त्याची कदर नाही करत ,
पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय
असत ....!!!

वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे

वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे. ♥
१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥
१५ वर्षाची मुलगी ...:- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा. ♥
१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥
२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट. ♥
... ... ... २६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी. ♥
३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक. ♥
५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद. ♥
६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार असते....

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुरावू जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते....
... ...
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुखवू जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त
जपते......'

|| जय जय रघुवीर समर्थ |

||सार्थ मनाचे श्लोक || ||२२||
मना सज्जना हीत माझे करावे |रघूनायका दृढ चित्ती धरावे ||
महाराज तो स्वामि वायुसुताचा |जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ||२२||

अर्थ : - मागला खोटेपणा टाकून देताना नवी काही तरी शुध्द वस्तु त्याला लावावी लागते.सुवर्ण अग्नीने शुध्द करतात. पाणी तुरटीच्या स्पर्शाने शुध्द करतात. पण अशी कोणती वस्तु आहे की, ती मनाला लावली म्हणजे ते शुध्द होईल? मनाचे पाप चंचलतेत असते. त्याच्या शुध्दीसाठी बलवान, अचंचल, दृढनिश्चयी विचाराचे प्रतीक जोडावयास हवे. ते प्रतीक म्हणजे राम.
श्रीरामदासांनी या श्र्लोकातील पहिली ओळच सूक्ष्म सत्याला भिडविली आहे. मनाला त्याच्याही पलीकडल्या गाभ्यात जाऊन रामाचा स्पर्श पोहचविण्यास संागितले आहे. आपल्या मनाला आपणच बजावायचे, ‘आता आपले हित आपणच करून घ्यावयाचे आहे. ‘ मनाच्याही मुळाशी राघव नेऊन ठेवला म्हणजे बाकी फळापर्यंत राघवच पोहचणार.
श्र्लोकाच्या तिसर्या ओळीत श्रीरामबलाचा एक पुरावा दिला आहे. वायुपुत्र बलवंत हनुमान म्हणजे तेज आणि शक्तीचे प्रतीक. त्या हनुमानानेच रामाला स्वामी मानले आहे, शक्तिदाता मानलेले आहे. यावरून रामाची शक्ती केवढी थोर, केवढी मूलभूत आणि महान असेल! स्वर्ग असो, पृथ्वी असो, पाताळ असो, उंचापासून खोलापर्यंत कोठेही रामशक्तीचा आश्रय शुध्द करील. त्रासापासून सोडवील. हे चौथ्या ओळीचे कथन आहे. त्याची तर्करेषा पहिल्या तीन ओळींशी सुसूत्रच आहे

|| जय जय रघुवीर समर्थ |

माझी आठवण कधीतरी येईल तुला'

माझी आठवण कधीतरी येईल तुला'
माझी आठवण कधीतरी येईल तुला
जुन्या आठवणीत मग तू शोधशील मला.....
कुणालातरी माझी आठवण सांगतानातू हसशील
पण त्या आठवणीत मला पाहताच तू रडशील.....
आठवेल तुला समुद्र किनारी आपल्या दोघांच फिरन
तुझ्या थरथरत्या स्पर्शात मी स्वता हरवून जान.....
तू माझा हातात हात घेउन अनेक स्वप्न सजवन
माझ्या डोळ्यात पाणी येताच मला हसवण.....
आठवेल तुला आपल्या प्रेमातला तो जुना पाउस
एकाच छत्रीत पाउसात भिजणारी ती आपली हाउस.....
ओल्या चिम्ब तुझ्या स्पर्शात अंगावर येणारे शहारे
काळ्या गर्द वातावरणात मोहरूनगेलेले ते अंग सारे.....
माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल
तुझ्या डोळ्यातून निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब मी असेल.....
तू एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रतेक क्षण
त्या क्षणांमधे दिसेल तुला माझ तडफडणार मन.....
माझी आठवण कधीतरी येईल तुला
व्याकुळ होउन तुझ मन शोधेल मला

एक मैत्री नावाचे गाव

नितळ नि:स्वार्थी पारदर्शक
तिथे नसतो कपटाला वाव
एकमेकांचे सुख वेचतात जिथे
आहे असे एक मैत्री नावाचे गाव

काही मित्र कट्ट्यावर बसलेले असतात,

काही मित्र कट्ट्यावर बसलेले असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल
वाजतो....
मुलगा : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे,
... मी ५००० रु. पर्यंतची सिल्क सुट घेऊशकते
का!
मुलगा : हो जानू घेणा.
गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ
कारे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझा क्रेडीट कार्ड
माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
मुलगा : होग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू... बाय... (फोन कट)
सर्व मित्र : साल्या तूला वेड लागलय
कि तु चडलाय???
कि तूला आम्हाला दाखवायचे आहे,कि तू
तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेम करतो ???
मुलगा : ते सोडा रे, हे सांगा हा मोबाईल
आहे कोणाचा ???
"हर एक फ्रेंड कामिना होता है":))

तुझा messsssage...***

*** तुझा messsssage...***
कधी कधी मला तुझी खूप आठवण येते..
मग तुझ्या आठवणींनी व्याकूळ होऊन..
मी..
मी.. दुसरं काही नाही,
तुला एक message करते..
आठवण करुन देण्यासाठी,
की मी इथेच आहे..
पॄथ्वीतलावर..,
मग तुझ्या msgची वाट पाहण्याचा सुरु होतो खेळ..
जेव्हा जेव्हा msg beep होतो..
वाट्तं,
तुला आलीच शेवटी माझी आठवण..
मी वेड्यांसाऱख अधीर होऊन,
लहान मुलाच्या उत्साहाने inbox पाहावा तर..
तुझा msg नसतोच..
मग पुन्हा तुझ्या नावाचा जप(की शिव्यांच्या लाखोल्या?)..
messages येतच राहतात..
पण त्यातला एकही नसतो तुझा..
आणि मग पारा चढत जातो माझा..
जेव्हा अगदी टॉकाला पोहोचतो..
तेव्हा एक मस्त msg beep होतो.,
अन् मग निराश मनाने शेवट्चं पाहावं तर...
तर..
...
तर..
तो offersवालाच message असतो,
शेवटी अनावर होतो माझा राग..
अन् रुसून बसते मी तुझ्यावर..
आणि थोड्या वेळाने ..
तुझ्यावरला राग विरघळायला लागतो..
तेव्हा येतो ..
तुझा messsssageeee..

** परीक्षा***

** परीक्षा***
Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो?

जे आवडत असत ते कधी मिळत नसत

जे आवडत असत ते कधी मिळत नसत
हिसकावून घेऊन ते आपल कधी होत नसत

प्रयत्न केला मागण्याचा
पण यश मागून मिळत नसत
...
शेवटी नशिबात आहे तेच होते
म्हणून नशीब खोटे आहे असे माणूस म्हणत नसतो

जिंकण्यासाठी प्रयत्न प्रत्तेकाकडे असतो
म्हणून प्रयत्न तो कधी सोडत नसतो

वाहणा-या मनाला थांबवणार

वाहणा-या मनाला थांबवणार
भरकटलेल्या जिवनाला दिशा देणार.
कोणीतरी आपलं असावं ..........

रुतताच काटा पायात पाणी डोळ्यात यावं
व्याकुलेल्या नजरेने गर्दीत शोधावं.
कोणीतरी आपलं असावं..................

वाहणा-या अश्रूला डोळ्यातच थांबवणार
चुकलेल्या पावलांना पायवाट दाखवणार.
कोणीतरी आपलं असावं .......................

दूर असूनसुद्धा जवळ भासणार
मृगजलागत डोळ्यासमोर दिसणार.
कोणीतरी आपलं असावं.....................

जिवनाच्या शेवटपर्यंत सोबत असावं
मरण सुद्धा मिठीत त्याच्या यावं.
कोणीतरी आपलं असावं ............................ ♥
शूभ प्रभात..♥

किती साधी ग तू, ना सजनं ना मुरडनं,

किती साधी ग तू,
ना सजनं ना मुरडनं,
ना लटके झगडणं,
किती सच्ची ग तू..
जे काही असेल ते आतून सजलेलं,
सकाळचं ऊन जसं पावसात भिजलेलं..
किती मन लाऊन जगणारी तू,
किती जीव लाऊन जगणारी तू,,
तुझे ओझरते देखावे जगणं शिकवून जाणारे..
तुझे हसते नजारे हसणं शिकवून जाणारे...
किती वार्यासारखी तू,
किती पाण्यासारखी तू,
वाहत जाणारी .. आपल्याच कलेनी,
वाहावत नेणारी .. स्वैर ओढ्यासारखी..
एवढा का हेवा वाटावा,
तुझ्या जगण्याचा..
तुझं जग बघण्याचा..
एकदा तुझ्या डोळ्यांनी ही दुनिया बघावी म्हणतो..
ती सुंदर भासेल.. नव्हे असेलच!
तुझ्या हातात हात घेउन डोळ्यात हसावं म्हणतो..,
पाणी गालांवर असेल.. किंवा रुसेलच...
तुझ्या असण्याचा आनंदोस्तव जगायचाय..
तुझ्या हसण्याने, तुझ्या सोबत असण्याने...

तुझ काय गं

तुझ काय गं
तु येऊन पुन्हा जाशील
सुखावलेल्या जखमां वरच्या खपल्या
पुन्हा काढुन जाशील.....!
तु दिलेल्या जखमांदेखील
हव्या हव्याश्या वाटतात
कदाचित त्या जखमांमुळेच
तुझ्या आठवणी ताज्या राहतात...
तुस्व:त बद्दल किती सहज सांगुन गेलीस
अन् माझ्या बद्दल आयकायचं विसरुनच गेलीस...
माझ ह्दय तर घेऊन गेलीसच
पण तुझ माञ घ्यायचं विसरुन गेलीस..

सगळ्यांना हसवतो,अन नेहमीच तो उदास असतो

सगळ्यांना हसवतो,अन नेहमीच तो उदास असतो...
सगळ्यांचे डोळे पुसतो, पण नेहमीच तो रडत असतो...
विचारात हरवलेल्याला दिशा दाखवतो,
पण स्वतः दिशाहीन विचारात फिरत असतो...
दुख असेल तर जाणून घेतो,
दुखी त्या चेहऱ्यावर थोड हसू हि देतो,
पण स्वतःच दुख नेहमीच तो लपवतो..
धावतो तो सगळ्यानसाठी,
अन सगळ्यांचा आवडता हि तोच असतो...
पण तरी हि आयुष्यात,
तो नेहमीच ...
....
एक एकटा एकटाच असतो...
एक एकटा एकटाच असतो...

गरज आहे आज मला………

गरज आहे आज मला………
त्या तुझ्या आधाराची
अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची

… … गरज आहे आज मला………..
त्या तूझ्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची

गरज आहे आज मला…………..
त्या तुझ्या कोमल प्रीतीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची

गरज आहे आजहि मला……….
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या जाणिवेची

गरज आहे मला
खूप गरज आहे….

तुझ्या लपलेल्या आठवणीना

तुझ्या लपलेल्या आठवणीना
परत कधी शोधणार नाही
तुझ्या जपून ठेवलेल्या
त्या अनमोल शिदोरीला
आता कधी सोडणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

ती देलेल्या प्रत्येक क्षणांना
परत कधी डिवचणार नाही
तू उराशी बाळगलेल्या
त्या जिरकाल क्षणांना
आता कधी छेडणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

तू भेटलेल्या स्थळांना
परत कधी भेटणार नाही
त्यांच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या
आपल्या त्या गोड गाठी-भेटीना
आता कधी कडवठ करणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

तू जागवलेल्या भावनांना
परत कधी झोपवणार नाही
त्यांनी भरून आणलेल्या
दोघा मधल्या अतुठ प्रेमाला
आता कधी तोडणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

तू जाणवलेल्या जीवनाला
परत कधी विसरणार नाही
त्याने भोगायला लावलेल्या
त्या नियतीच्या सत्वपरीक्षेत
आता कधी नशीबवान ठरणार नाही
काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

तुला दिलेली वचनं

तुला दिलेली वचनं

मी माझ्या मनापासून पाळले होते......

तू नाही ठेवली किम्मत त्यांची

म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते......

झाली होती गर्दी फार

जळतान्ना मला पहायला...

काही जनांना घाई फार

राख़ नदित वहायला...

आग पूर्ण विझली तरी

प्रेत माझे जळतच होते...

राख़ वेचनार्यांचे काल

हाथ आगिने सलत होते...

राख़ अजूनही गरम होती

'' उद्या वाहू '' म्हणुन गेले...

अश्रु दोन गालुन

मागच्या मागे वलुन गेले ....

मग भल्या पहाटे कुणीतरी

तिच्या स्पर्शासम उब देत होतं...

मी उठून पाहिले तर

शेजारी एक प्रेत जळत होत्तं...

आलेत मागोमाग राख़ वेचनारे

वेचुन मला त्यांनी घरी नेले...

सोबतच वाहुया आतातरी

अनोळखी कुजबूज करून गेले ...

नदिकाठी आज माझ्या

एक राख़ मडकी होती शेजारी...

माझ्या सारखेच तिचे रूप

जणू काही म्हणत होती बिचारी ...

नदीमधे मग त्यांनी

वाहिली दोन्ही मडकी होती ...

त्या राखेचा स्पर्श होताच कळल

दूसरी राख़ तिची होती ...........

माझ्या प्रियेची....

Friday, February 24, 2012

मी असाच आहे,एकटा एकटा जगणारा...

मी असाच आहे,एकटा एकटा जगणारा....
सर्वात असाताना देखील,स्वतःहाच्या शोधात फिरणारा.....
मी असाच आहे,खुप प्रेमाने बोलणारा....
आपल्या सरळ वागण्याणे ,कुणालाही सहज आपलसं करणारा......
मी असाच आहे,जीवानाच मर्म जाणणारा....
साध्या मैत्रीच्या नात्यालाही,आपला धर्म मानाणारा.....
मी असाच आहे,दुखाःतही नेहमी हसणारा....
अन हसत हसतानियतीला लाजवणारा....
मी असाच आहे,इतरांना सतत प्रकाश वाटणारा....
पण स्वतःहा मात्र,काळोखात आठणारा.....
मी असाच आहे,सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा..
जाताना मात्र सगळ्यांच्या मनातघर एक करुन राहणारा........

Sunday, February 19, 2012

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय
करणार आहेस?

मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन,
लग्न करीन. आणखी काय करणार..??

बाबा :बेटा योजना चांगल्या आहेत..
फक्त जे काही करशील ते
योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं...!!!

एक विनंती आहे....

एक विनंती आहे........
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नको,
busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर
वेळच देऊ नका.....
... ... एक विनंती आहे.....
साथ सोडुन जायचचं असेल तर
हाथ पुढे करुच नका .....
मनातुन नंतर उतरवायचचं असेल तर
मनात आधी भरुच नका.....
एक विनंती आहे....
चौकशी भरे,call,काळजी वाहू,sms
यांचा
कटांळाच येणैर असेल तर
कोणाला नंबर
देऊ नका,....
Memory full झालिये सांगून
delet च करायचा असेल तर
नंबर save च करु नका.
एक विनंती आहे......
मौनर्वत स्वीकारायचं असेल तर
आधी गोडगोड बोलूच नको...
Secrets share करायचीच नसतील
तर
मनाचं दार उघडूच नको.......
एक विनंती आहे......
माझ्या काळजी करण्याचा ञासच
होणार
असेल तर......
अनोळखी होऊनचं वागायचं असेल
तर
माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं
नको.........
एक विनंती आहे......
अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर.....
आधी डाव मांडूच नको...
रागावून निघून जायचचं असेल
तर........
आधी माझ्याशी भांडूच नको....
एक विनंती आहे.....
सवयीच होईल म्हणून तोडायच असेल
तर...
र्कपया नातं जोडून नका
फाडून फेकून द्यायचं असेल तर....
माझ्या मनाचं पान उलगडूच नको.. ♥♥♥

एकदा ती माझ्याकडे आली

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत

सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची

तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात

काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !

येशील सांजवेळी

.....येशील सांजवेळी
साद देती सखे गं या सागरी लहरी
येशील सांजवेळी या सागरी किनारी ।।धृ।।

येती किती तरी गं या सागरा उभारे
केस कुरवाळताना उठती किती शहारे
बोल छपवू नको गं ओठांच्या तिजोरी ।।
......येशील सांजवेळी

क्षितिजावरी अभाळ धरेवरी झुकले
प्रेम या सागराचे किनारी धडकले
भेटीस साक्ष देईल चांदणे रुपेरी ।।
......येशील सांजवेळी

रेंगाळला इथे गं हा रेशमी समीर
जात्या क्षणासवे होतोय जीव अधीर
आहे तुझ्याचसाठी हा श्वासही अखेरी ।।
......येशील सांजवेळी

जीवनातली नाती........

जीवनातली नाती........

जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......

जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना.....

" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं...."

हे अगदी खंरच आहे

आयुष्यात प्रेम करायचय मला ..

आयुष्यात प्रेम करायचय मला ...
दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला..!!!!!