आठवतंय तुला ..एकमेकांचा
निरोप घेताना मन भरून आलं होतं ..
डोळ्यातले पाणी पापणीआड दडवून ..
खोटं खोटं हसलो होतो ..
नातं टिकवायचं आपण आयुष्यभर ..
असं मनोमन ठरवलं होतं ..!
सोबत आहे आपल्याला
एकमेकावरील विश्वास आणि प्रेमाची ..
पण मधेच आड आली भिंत ..
घरच्यांच्या प्रतिष्ठेची ...
कदाचित ..त्यांचेसाठी तुला ..
दुसऱ्याशी लग्न करावे लागले ..
तुझा सर्वस्व असणाऱ्या मला ..
त्यांचे साठी दुखवावे लागले ...!
सहन झाले नाही मला ..
दुखवू हि नये तुला म्हणून ..
मी मरणाचा विचार केला होता ..
पण तुझा विचार केल्यावर ..
आपोआप पाऊल अडले माझे ..
फक्त ...तुला दिलेल्या वचनांसाठी
मी हेही सहन करेल ...
जगेन मी ...
जगेन कसा ? रोज तिळ तिळ मरेल ...
तू माझी असतानाही ..
तुझा विरह सोसेल ....!
तुझ्या आठवणीत जगताना ..
कधी कधी मी रडतानाही हसेल ..
ओढ असेल तुझ्या मिलनाची ..
वाट पाहत असतील डोळे ..
फक्त तुझ्या येण्याची ...
मला काही कळत नाही
हि माझ्या प्रेमाची हार कि जीत ...
प्रिये ...सांग न मला एकदा ....
पुन्हा.. फुलेल का आपली प्रीत ....?
No comments:
Post a Comment