आभाळ जेव्हा भरून येत
पावसाने तेव्हा थांबायचं नसत
होईल मोकळ आकाश
म्हणून विजेने गर्जायच नसत
तेव्हा करायची फक्त साथ
मातीने पावलांची आणि
भिजल्या क्षणांनी ......
तुझ्या आठवणींची
पान पान शहारून येत
तेव्हा दवबिंदूने लाजायचं नसत
मरण कुशीत येईल आता
म्हणून पानाने ओसरायच नसत
तेव्हा पहायची फक्त वाट
आसवाने डोळ्यांची आणि
अर्ध्या जागलेल्या स्वप्नाने
तुझ्या आभासांची
होईल वाऱ्याची ओळख
तेव्हा फुलाने दरवळायच असत
अस असत दुख म्हणून
गंधाने वेदनेला टिपायच नसत
तेव्हा मात्र कराययचाच फक्त घात
विव्हळणार्या चांदण्यांनी
क्षय झालेल्या पौर्णिमेचा आणि
अस्तीवाहीन वाऱ्याच्या ओळखीने
तुझ्या जाणीवेचा
पसरतील हात अंगणाचे जेव्हा
तेव्हा करायची अंधाराची मुठ
काळोखाला नसतेच जाग
उजेडातल्या सावल्यांची म्हणून
क्षीतीजाने काजळायाच नसत
त्याने जाळायची वात
सूर्याच्या विभोर स्पर्शाची आणि
काळ्याभोर शाईने तुझ्या कवितांची
बस्स इतकंच मग झाल
आणखीन काय ???
तुझ्याशिवाय इतक बास आहे मला....
No comments:
Post a Comment