Wednesday, November 16, 2011

असे कसे हे नाते...

असे कसे हे नाते...
जे जुळण्या आधीच तुटून जाते...
दोन मने एक होणार..
त्या आधीच नशीब ते मोडून जाते.


खूप त्रास सहन केल्यावर शेवटी
सहनशक्ती चाही अंत होतो ,
सहन शक्ती संपली कि ,
माणूस कायमचाच शांत होतो .



एक एक चारोळी करत
प्रेमाची मी कथा मांडतो
शब्द पण अपुरे पडतात
चारोळीत जेव्हा भाव सांगतो




एकांतातली कविता
छान जमली
लिहिता लिहिता
मस्तच रचली ...




एक एक दिस काढतोय तुझ्याशिवाय ,

एक एक रात्र सरतेय तुझ्याशिवाय ,

मी तर तुझ्या आठवणीत पुरता वेडा झालोय गं ,

सखे तुला करमत का ग माझ्याशिवाय ?

No comments:

Post a Comment