मावळचे आंदोलन पाण्यासाठी पेटले
मावळचे आंदोलन पाण्यासाठी पेटले
मेलेल्यांना शेवटी दोन घोट पाणी पण नाही भेटले
कोणाला काय भेटले याचा हिशोब होत राहील
निवडणुकांच्या अजेंड्यावर हा हि एक विषय राहील
आणि तेव्हा या विषयावर मोठ मोठी भाषणं होतील
मतांच्या स्पर्धेमध्ये दोन चार फुलेही वाहतील
मेलेल्यांना म्हणतील सगळेच आता हुतात्मे
निवडणुकाच्या वेळी जागे करतील त्यांचे आत्मे
त्याची पूर्वतयारी आताच सुरु झाली
मृतांच्या नातेवाइकाना भेटण्यासाठी गर्दी झाली
सहानुभूतीच्या शब्दांनी त्यांचे आश्रू पुसतील का
मावळ मधले हुतात्मे एवढ्या लवकर मावळतील का
त्यांच्या हुतात्म्याचे मोल तेव्हाच फिटणार आहे
जेव्हा पवनेचे पाणी मावळच्या मातीला भेटणार आहे
No comments:
Post a Comment