मन माझे तुझ्याकडे आहे,
कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात
वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.
प्रेमाच्या
गोड गोष्टी करताना
हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार
झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.
क्षण काही जगलोत सोबत
आठवणीत
त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात
माझ्या बुडून बघ.
स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या
तू ते
माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न
पाहून बघ.
जिवापाड प्रेम लावीन
तु थोडे तरी लावून बघ
मी
तर वेडी झालीच आहे
तुही प्रेमात माझ्या वेडा होऊन बघ.
जसा
तू सामावलायस माझ्यात
तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळा
अन् मी वेगळी
एकरूपता तरी जाणवेल बघ.
नाही करणार एवढे प्रेम
दुसरे कोणी
हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला
जगी
तुझ्या मला असू दे बस्स !!

Monday, May 16, 2011
जन्मलो म्हणून जगणार नाही
जन्मलो म्हणून जगणार नाही
अन असाच राखेत विरणार नाही...
ठसे सोडूनी जाईन जीवन काठावरती
आल्या लाटा कितीही , मिटणार नाही ...
खुभी नाही माझ्यात एवढी कि..!
कुणाच्या हृदयात ठाण मांडून जाईल..!
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल..!
असे क्षण देऊन जाईल.......!
अन असाच राखेत विरणार नाही...
ठसे सोडूनी जाईन जीवन काठावरती
आल्या लाटा कितीही , मिटणार नाही ...
खुभी नाही माझ्यात एवढी कि..!
कुणाच्या हृदयात ठाण मांडून जाईल..!
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल..!
असे क्षण देऊन जाईल.......!
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल
ती म्हणाली काल जेव्हा
ती म्हणाली काल जेव्हा
उगवेल ना पहाट ?
मी म्हणालो साथ देत
शोधू या ही वाट ....
ती म्हणाली काल जेव्हा
चालशील संगतीने ?
मी म्हणालो साथ देण्या
आलोय मी सवडीने
ती म्हणाली काल जेव्हा
दु;खे सारी संगतीला
मी म्हणालो दु;खाविना
अर्थ काय जगण्याला ?
ती म्हणाली काल जेव्हा
कसा होईल संसार ?
मी म्हणालो सोड प्रश्न
येईल प्रेमाचा बहर
--
--
चालणारे दोन पाय किती विसंगत असतात
एक पुढे नि एक पाय मागे
पुढच्याला गर्व नसतो
मागच्याला अभिमान नसतो
कारण त्याला माहित असत
क्षणात हे बदलणार असत
याचंच नाव जीवन असत ....
उगवेल ना पहाट ?
मी म्हणालो साथ देत
शोधू या ही वाट ....
ती म्हणाली काल जेव्हा
चालशील संगतीने ?
मी म्हणालो साथ देण्या
आलोय मी सवडीने
ती म्हणाली काल जेव्हा
दु;खे सारी संगतीला
मी म्हणालो दु;खाविना
अर्थ काय जगण्याला ?
ती म्हणाली काल जेव्हा
कसा होईल संसार ?
मी म्हणालो सोड प्रश्न
येईल प्रेमाचा बहर
--
--
चालणारे दोन पाय किती विसंगत असतात
एक पुढे नि एक पाय मागे
पुढच्याला गर्व नसतो
मागच्याला अभिमान नसतो
कारण त्याला माहित असत
क्षणात हे बदलणार असत
याचंच नाव जीवन असत ....
तू कूठेही असलीस तरी
तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस
तू कशही असलीस तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशीवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस.....
--
तू कशही असलीस तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशीवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस.....
--
एक गुपित सांगु का तुला
"एक गुपित सांगु का तुला?
हसायच नाहीस हं..
"ती म्हणली
"सांग..
नाही हसणार" ..
"अरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ...
संततधार पाऊस पडत होता.
मातीचा गंध चहुकडे दरवळ्त होता..
पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब मला वेडावत होता...
मी त्या पावसात ओलेचिंब भिजले होते..
माझ्या रोमा-रोमात जणू ओला प्राजक्त फ़ुलून आला होता..
तो पाऊस काही वेगळाच होता..."
ऐकल आणि खूप हसू आल मला...
चिडून ती म्हणाली...
काय रे, हसतोयस काय असा...
तुला पटत नाहिये का? जा, बोलू नकोस माझ्याशी!!!!!!!!!
अग काय सांगु आता..
पटणार नाहीच तुला......
काल मलाही एक स्वप्न पडल होतं..
अगदी वेगळंच....
काल पहिल्यांदाच...........
स्वप्नात मी पाऊस झालो होतो !!!
हसायच नाहीस हं..
"ती म्हणली
"सांग..
नाही हसणार" ..
"अरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ...
संततधार पाऊस पडत होता.
मातीचा गंध चहुकडे दरवळ्त होता..
पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब मला वेडावत होता...
मी त्या पावसात ओलेचिंब भिजले होते..
माझ्या रोमा-रोमात जणू ओला प्राजक्त फ़ुलून आला होता..
तो पाऊस काही वेगळाच होता..."
ऐकल आणि खूप हसू आल मला...
चिडून ती म्हणाली...
काय रे, हसतोयस काय असा...
तुला पटत नाहिये का? जा, बोलू नकोस माझ्याशी!!!!!!!!!
अग काय सांगु आता..
पटणार नाहीच तुला......
काल मलाही एक स्वप्न पडल होतं..
अगदी वेगळंच....
काल पहिल्यांदाच...........
स्वप्नात मी पाऊस झालो होतो !!!
कळत नाही या वाटेवर
कळत नाही या वाटेवर
अस एकट किती वेळ चालायच?
जे नव्हतेच आपले कधीही
त्यांना का आपल मानायाच?
ज्यांना उमगलाच नाही अर्थ विश्वासाचा
त्यांवर विसंबून तरी का रहायच?
ग्रिश्माने होरपळलेल्या मनाने
पुरालाच का चांगल मानायाच?
आहेत शब्द आपणा पाशी पण
इथे नाहीत कुणालाच कान
तेव्हा मनातल्या भावनांना
फ़क्त कागदावरच स्थान द्यायच?
की आपलच कुठेतरी चुकतय
अस मानून गप्प रहायच?
नाही सापडत ना उत्तर
म्हणुन प्रश्न्नानकड़ेच दुर्लक्ष करायच?
की आपणही एक प्रश्नचिन्ह
बनुनच रहायच?
अस एकट किती वेळ चालायच?
जे नव्हतेच आपले कधीही
त्यांना का आपल मानायाच?
ज्यांना उमगलाच नाही अर्थ विश्वासाचा
त्यांवर विसंबून तरी का रहायच?
ग्रिश्माने होरपळलेल्या मनाने
पुरालाच का चांगल मानायाच?
आहेत शब्द आपणा पाशी पण
इथे नाहीत कुणालाच कान
तेव्हा मनातल्या भावनांना
फ़क्त कागदावरच स्थान द्यायच?
की आपलच कुठेतरी चुकतय
अस मानून गप्प रहायच?
नाही सापडत ना उत्तर
म्हणुन प्रश्न्नानकड़ेच दुर्लक्ष करायच?
की आपणही एक प्रश्नचिन्ह
बनुनच रहायच?
एक एक लाट..
एक एक लाट
किनार्याला येऊन भिडते,
वाळूवरती लिहिलेल्या तुझ्या नावाला
ती सहजा सहजी खोडते...
ओल्या ओल्या वाळूवर
शिंपले तुझ्यासाठी सोडते,
मी लिहिलेल्या नावाला
स्वतःच्या नावासोबत जोडते...
भरती आली कि सागराचे पाणी
हळू हळू वाढते,
किनार्यावर बसलेल्या जोडप्यांना घेऊन
साय़ंकाळ त्यांच्या प्रेमासहित बूडते...
नजरेत घेऊन क्षितिजाला
मी लाटांवरती तरंगतो,
पंख पसरवून हातांचे
पक्षी बनून ऊंच ऊंच ऊडतो ...
पून्हा नवे पर्व घेऊन
सकाळ सोनेरी उजाडते ,
पून्हा तुझ्या नावाला खोडण्यासाठी
लाट किनार्याला येऊन भिडते...
किनार्याला येऊन भिडते,
वाळूवरती लिहिलेल्या तुझ्या नावाला
ती सहजा सहजी खोडते...
ओल्या ओल्या वाळूवर
शिंपले तुझ्यासाठी सोडते,
मी लिहिलेल्या नावाला
स्वतःच्या नावासोबत जोडते...
भरती आली कि सागराचे पाणी
हळू हळू वाढते,
किनार्यावर बसलेल्या जोडप्यांना घेऊन
साय़ंकाळ त्यांच्या प्रेमासहित बूडते...
नजरेत घेऊन क्षितिजाला
मी लाटांवरती तरंगतो,
पंख पसरवून हातांचे
पक्षी बनून ऊंच ऊंच ऊडतो ...
पून्हा नवे पर्व घेऊन
सकाळ सोनेरी उजाडते ,
पून्हा तुझ्या नावाला खोडण्यासाठी
लाट किनार्याला येऊन भिडते...
असं प्रेम करावं...........
प्रेम हि एक सुंदर भावना,
हे सदैव जपाव,
पण त्या बरोबर येणाऱ्या वेदनांना पण,
हसतमुखाने सामोरे जाव.
असं प्रेम करावं.
विरह येतील संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील.
पण आपण मात्र खंभीर रहाव,
प्रत्येक परीक्षा पास व्हाव.
असं प्रेम करावं.
कितीही गेलोत दूर तरीही,
एकमेकांच्या कुशीत असाव.
तिला माझ्या डोळ्यात मला तिच्या डोळ्यात,
एकमेकावरच प्रेम दिसावं.
असं प्रेम करावं.
असं प्रेम कारावं........................
हे सदैव जपाव,
पण त्या बरोबर येणाऱ्या वेदनांना पण,
हसतमुखाने सामोरे जाव.
असं प्रेम करावं.
विरह येतील संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील.
पण आपण मात्र खंभीर रहाव,
प्रत्येक परीक्षा पास व्हाव.
असं प्रेम करावं.
कितीही गेलोत दूर तरीही,
एकमेकांच्या कुशीत असाव.
तिला माझ्या डोळ्यात मला तिच्या डोळ्यात,
एकमेकावरच प्रेम दिसावं.
असं प्रेम करावं.
असं प्रेम कारावं........................
असा काही सण असल्यावर
तुझी आठवण ठरलेलीच....
आणि सांजवेळ तर जीवघेणीच रे, रोजची.
तुझी साथ होती तेव्हा प्रत्येक संध्याकाळ
एखाद्या सणासारखीच खुलायची
तुझं भेटणं,
माझ्यावर प्रेम करणं,
मला समजुन घेणं...
माझे लहान-सहान हट्ट पुरवणं...
माझ्या अल्लडपणात स्वतःला विसरणं....
हे सारं सारं अताशा,
प्रत्येक संध्याकाळी आठवतं मला.
मनात जपलेल्या
याच तुझ्या आठवणींचा भार वाहुन,
आयुष्याची संध्याकाळ जवळ आलीये....
सारं काही संपलंय आता....
तरिही या क्षणाला खुप एकाकी वाटतयं....
आधार हवासा वाटतोय.... तुझा.....
खरंतर,
आधार नकोयं कुस हवीये मायेची.....
थकलेल्या संध्येला काळोखाच्या कुशीत हरवुन जायचयं......
सारी कर्तव्य झाल्यावर आता,
स्वतःसाठी दोन क्षण जगायचयं....
ह्या थकल्या जीवाला
मायेची कुस हवीये आज....
थरथरणार्या हातांना
आधाराचा हात हवाय..
डबडबल्या डोळ्यांना
ओंजळ हवी आहे
आणि सांजवेळ तर जीवघेणीच रे, रोजची.
तुझी साथ होती तेव्हा प्रत्येक संध्याकाळ
एखाद्या सणासारखीच खुलायची
तुझं भेटणं,
माझ्यावर प्रेम करणं,
मला समजुन घेणं...
माझे लहान-सहान हट्ट पुरवणं...
माझ्या अल्लडपणात स्वतःला विसरणं....
हे सारं सारं अताशा,
प्रत्येक संध्याकाळी आठवतं मला.
मनात जपलेल्या
याच तुझ्या आठवणींचा भार वाहुन,
आयुष्याची संध्याकाळ जवळ आलीये....
सारं काही संपलंय आता....
तरिही या क्षणाला खुप एकाकी वाटतयं....
आधार हवासा वाटतोय.... तुझा.....
खरंतर,
आधार नकोयं कुस हवीये मायेची.....
थकलेल्या संध्येला काळोखाच्या कुशीत हरवुन जायचयं......
सारी कर्तव्य झाल्यावर आता,
स्वतःसाठी दोन क्षण जगायचयं....
ह्या थकल्या जीवाला
मायेची कुस हवीये आज....
थरथरणार्या हातांना
आधाराचा हात हवाय..
डबडबल्या डोळ्यांना
ओंजळ हवी आहे
फ़ुलपाखरु
अशाच एका संध्याकाळी
फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले
येऊन सुदर, स्वछंदी, ऊनाड
कानी माझ्या दु:ख सागुन गेले...
ओळख नाही त्याची नि माझी
पहिल्याच भेटीत इतक्या जवळ आले
मीही मित्र म्हणून दु:ख तुझे आहे ते माझे
सागुनी प्रेमळ स्वप्णी त्यास वचन दिले...
दिवस रात्र झटलो
दु:ख त्याचे दुर करण्यामागे लागलो
माहित होती व्यथा त्याची मला
स्वत:ला विसरुन त्याजवळ जाऊ लागलो...
हसत रहवे त्याने सतत
म्हणून स्वत: रडत राहिलो
कळत-नकळत मन माझे त्यासी जुडले
स्वछंदी मन माझे मला सोडुनी गेले...
दिवस तो मग असाच एक
न सागताच आला
फ़ुलपाखरु ते उडुन दूर गेले
आहाकार मनी माजला...
फ़ुलपाखरुच ते, नाही बंधनात कुणाच्या
उगाच मन हे भ्रमात होते
कधी न कुणाचे झाले ते
मन माझे त्याच्या साथ होते...
कधी न ह्रुदयाच्या "बीट" त्या
आज त्यासाठी पडू लागल्या
लळा लाऊनी ते इतके गेले
आठवणी स्वप्णी येऊ लागल्या...
नेहमीच ते माझे-माझे
म्हणत राहिलो
पण त्याचा कधी
मी झालोच नाही....
फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले
येऊन सुदर, स्वछंदी, ऊनाड
कानी माझ्या दु:ख सागुन गेले...
ओळख नाही त्याची नि माझी
पहिल्याच भेटीत इतक्या जवळ आले
मीही मित्र म्हणून दु:ख तुझे आहे ते माझे
सागुनी प्रेमळ स्वप्णी त्यास वचन दिले...
दिवस रात्र झटलो
दु:ख त्याचे दुर करण्यामागे लागलो
माहित होती व्यथा त्याची मला
स्वत:ला विसरुन त्याजवळ जाऊ लागलो...
हसत रहवे त्याने सतत
म्हणून स्वत: रडत राहिलो
कळत-नकळत मन माझे त्यासी जुडले
स्वछंदी मन माझे मला सोडुनी गेले...
दिवस तो मग असाच एक
न सागताच आला
फ़ुलपाखरु ते उडुन दूर गेले
आहाकार मनी माजला...
फ़ुलपाखरुच ते, नाही बंधनात कुणाच्या
उगाच मन हे भ्रमात होते
कधी न कुणाचे झाले ते
मन माझे त्याच्या साथ होते...
कधी न ह्रुदयाच्या "बीट" त्या
आज त्यासाठी पडू लागल्या
लळा लाऊनी ते इतके गेले
आठवणी स्वप्णी येऊ लागल्या...
नेहमीच ते माझे-माझे
म्हणत राहिलो
पण त्याचा कधी
मी झालोच नाही....
***कार्ट प्रेमात पड़लय***
हळूच हसतय
कधी कधी रुसतंय
जेवताना उठतय
ग्यालरीत बसतय
विचारात असतय
गुपचुप हसतंय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधळ पट्टी करतय
घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना
बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लॉक करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षणं दिसली की समजायच……
.
.
.
.
***कार्ट प्रेमात पड़लय*** :
कधी कधी रुसतंय
जेवताना उठतय
ग्यालरीत बसतय
विचारात असतय
गुपचुप हसतंय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधळ पट्टी करतय
घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना
बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लॉक करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षणं दिसली की समजायच……
.
.
.
.
***कार्ट प्रेमात पड़लय*** :
आई फ़क्त तुझ्यासाठी
बांधून मनाशी खुणगाठी
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......
कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा
बस stop वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या बस च एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...
प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...
इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...
ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....
थकलेलं माझं शरीर, लगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...
सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...
अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....
सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार.मी .पुन्हा कधीही ....
निघालो धावत स्वप्नांपाठी
कचरते मन, अडखळते पाउल
आई फ़क्त तुझ्यासाठी.......
कशी राहशील सोडून मला
सतावेल आठवण क्षणाक्षणा
रडन्यासाठी तुला आता
न लागेल कांद्याचा बहाणा
बस stop वर तुझा हात सोडवताना
माझं उसणं अवसाण...गळून गेलं होतं
शेवटच्या क्षणी जर बाबांनी तुला माघे खेचलं नसतं...
त्या बस च एक सीट नक्कीच रिकामं गेलं असतं...
प्रत्येक वेळी तुला फोनवर बोलताना
गळा अगदी दाटून येतो.....
थांबवून हुंदका कसाबसा मी..
balance संपल्याचा बहाणा करतो..
कळुन ही न कळल्यासारखी तू..
मग माझंच सांत्वन करतेस...
पण मलाही माहित आहे आई..
फोन ठेवताच तू रडतेस...
इथे रोज pizza आणि burger खाताना...
तुझ्या भाकर भाजीची आठवण येते..
अशी तुझी आठवण काढून जेवताना मग..
का कुणास ठावूक..प्रत्येक गोष्ट खारटचं लागते...
ऑफिसातुन थकुन घरी आल्या नंतर, तोंडातून
"आई चहा दे गं " अगदी सहज निघून जातं
आणि तू इथे नसल्याचं लक्षात येताच...
घर अगदी भकास भकास वाटू लागतं...
चहा पिण्याची इच्छा जाते मरून...
शरीर बोजड अन मन खिन्न खिन्न होतं.....
थकलेलं माझं शरीर, लगेचच...
स्वताःला निद्रेच्या ताबी देतं...
सताड जागं माझ मन मात्र, तुझा ..
केसांतून फिरणारा...गोंजारणारा हात शोधत राहतं...
सकाळी उठल्यानंतर पुन्हा मगं
माझी रोजचीच धावपळं सुरू होते...
आणि मग मनात विचार येतो...
तू असलीस की सर्व कसे सुरळीत होते...
अशा या माझ्या busy दिनचर्येत...
तुझी उणीव जाणवत राही क्षणोक्षणी
धावत येईन परत तुझ्यापाशी आई,
पहिली संधी मला मिळता क्षणी....
सरतील दिवस बघता बघता
परत येईन मी तुझ्याचपाशी...
ठेवून पायावर डोई, मागेन तुझी माफ़ी
सोडून तुला नाही जाणार.मी .पुन्हा कधीही ....
कवीता म्हणजे
कवीता म्हणजे ......
मनावरउमटलेले भावनांचे सुरेख प्रतिबिंब
अवचीत मिळणारा एखादा भावक्षण
स्वतःला हरवण्याचा नाजुक क्षण
भावनांच्या हिंदोळ्यांवर खेळणारे मन
जे कवीता करतात
ते आपल्या भावना त्यातुन व्यक्त करतात
कधी दुःख, कधी सुखः व्यक्त करतात
मनातले भाव ते त्या द्वारे व्यक्त करतात
कवीता असतात,नाजुक फुलासारख्या ,
फुलल्या की आनंद देणारया
सुंदर दवबिंदुंसारख्या
मनाला सहजच भावणारया ,
कवीता विचार करायला लावतात
काही थोडेफार रडायलाही लावतात
काही मने जूळवतात
काही नाती बनवतात
काही भावना व्यक्त करतात
काही रोष व्यक्त करतात
समाजातील वाईट गोष्ठींवर काही वेळा प्रहारही करतात
कवीता शब्दांपासुन सुरु होतात
व शब्दांवरतीच संपतात
पण
संपता संपता ते
आयुष्याला एक ध्येय देऊन जातात
भावनांचे रंग मनावर असे चढतात की
ते संपुर्ण आयुष्यच बदलून जातात
म्हणुनच ते रंग मला कवीतेचे नव्हे तर भावनांचेच वाटतात.
मनावरउमटलेले भावनांचे सुरेख प्रतिबिंब
अवचीत मिळणारा एखादा भावक्षण
स्वतःला हरवण्याचा नाजुक क्षण
भावनांच्या हिंदोळ्यांवर खेळणारे मन
जे कवीता करतात
ते आपल्या भावना त्यातुन व्यक्त करतात
कधी दुःख, कधी सुखः व्यक्त करतात
मनातले भाव ते त्या द्वारे व्यक्त करतात
कवीता असतात,नाजुक फुलासारख्या ,
फुलल्या की आनंद देणारया
सुंदर दवबिंदुंसारख्या
मनाला सहजच भावणारया ,
कवीता विचार करायला लावतात
काही थोडेफार रडायलाही लावतात
काही मने जूळवतात
काही नाती बनवतात
काही भावना व्यक्त करतात
काही रोष व्यक्त करतात
समाजातील वाईट गोष्ठींवर काही वेळा प्रहारही करतात
कवीता शब्दांपासुन सुरु होतात
व शब्दांवरतीच संपतात
पण
संपता संपता ते
आयुष्याला एक ध्येय देऊन जातात
भावनांचे रंग मनावर असे चढतात की
ते संपुर्ण आयुष्यच बदलून जातात
म्हणुनच ते रंग मला कवीतेचे नव्हे तर भावनांचेच वाटतात.
असा कोणी असेल का
असा कोणी असेल का?
आयुष्याच्या नवीन वळणावर,
माझा हाथ विश्वासाने पकडणारा,
असा कोणी असेल का?
जीवनाच्या काटेरी रस्त्यावर,
प्रेमाचे फुल पडणारा
असा कोणी असेल का?
पावसात भिजताना ,
पावसातून माझे अश्रू ओळखणारा
असा कोणी असेल का?
माझ्या डोळ्यात पाहून ,
माझे अन्तः करण ओळखणारा
असा कोणी असेल का?
माझ्यातली मी शोधून देणारा,
आणि माझ विश्व होणारा,
असा कोणी असेल का ?
कळत नकळत झालेली माझी चूक,
हक्काने सांगून ती सुध्रावणारा
असा कोणी असेल का ?
मी रडत असताना ,
स्वतः चा खांदा भिजवणारा
असा कोणी असेल का?
आणि आणि मला माझ्या
ह्या स्वप्नातून उठवणारा ,
असा कोणी असेल का ?
आयुष्याच्या नवीन वळणावर,
माझा हाथ विश्वासाने पकडणारा,
असा कोणी असेल का?
जीवनाच्या काटेरी रस्त्यावर,
प्रेमाचे फुल पडणारा
असा कोणी असेल का?
पावसात भिजताना ,
पावसातून माझे अश्रू ओळखणारा
असा कोणी असेल का?
माझ्या डोळ्यात पाहून ,
माझे अन्तः करण ओळखणारा
असा कोणी असेल का?
माझ्यातली मी शोधून देणारा,
आणि माझ विश्व होणारा,
असा कोणी असेल का ?
कळत नकळत झालेली माझी चूक,
हक्काने सांगून ती सुध्रावणारा
असा कोणी असेल का ?
मी रडत असताना ,
स्वतः चा खांदा भिजवणारा
असा कोणी असेल का?
आणि आणि मला माझ्या
ह्या स्वप्नातून उठवणारा ,
असा कोणी असेल का ?
Subscribe to:
Posts (Atom)