सगळ्याच प्रश्नांची उत्तरे असती
तर प्रश्नाची निर्मिती झालीच नसती
दुक्खाचे दिवस भोगल्याशिवाय
सुखाची प्रचीती पण आली नसती
नेहमी आपण दुसर्याला दोष देतो
कधी परिस्थिती ला तर कधी वेळे ला
पण मनात डोकावून कधी पाहत नाही
कारण लोकच पुन्हा बोलतात
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
प्रत्येकाचा स्वतःचा स्वतःला एक प्रश्न असतो
प्रत्येक जन स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार स्वतः असतो
आम्ही तुम्ही फक्त पर्याय देवू शकतो
पण परिणामांना सामोरे तर तोच जाणार असतो
तसे परिणामांची पर्वा न करता पुढे जाणारे खूप असतात
पण त्याचे सावट मात्र स्वतः सह दुसरे पण भोगतात
जो दिवा स्वतःला उजेड देण्यासाठी जळत राहतो
तो स्वतःला तर अंधारातच ठेवतो
आणि ज्यांच्या आयुष्यात उजेड करतो
ते बोलतात मिनमिनता प्रकाश आहे
सूर्य कुठे हा फक्त काजवा आहे....
No comments:
Post a Comment